Friday, July 30, 2010

जेव्हा



जेव्हा काळजाची तार कुणी छेडत
एकवाचून दुसऱ्याचं जेंव्हा अडतं
दोघांच्या नकळत हे जेंव्हा घडतं
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं
      नेमकं त्या व्यक्तीतच काय नडत
       त्याचं नावडतं सुद्धा आवडतं
ज्याच्या एका क्षणाच्या भेटीसाठी 
दिवसच्या दिवस जेंव्हा कुणी मोडतं.
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं..
रात्रभर जागरण ही घडतं 
आपल्याबद्दल सुद्धा विचार करणं कुणी सोडतं
 त्याच्या दु:खासाठी आपला आनंद जेंव्हा  ही कुणी सोडतं 
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं
      आता हेच प्रेम त्याच्याशी कधी भांडत
त्याच्याशी केलेल्या आणाभाका कधी मोडतं 
पण जेंव्हा हे उमजतं
त्याला जोडताना जगाशीही नातं जेंव्हा कुणी तोडतं
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं

Thursday, July 29, 2010

सारं कसं शांत शांत

सारं कसं शांत शांत 
गोंगाटामध्ये सुद्धा निवांत
मुक्त आकाशामध्ये लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे
मंद .. पण नसे त्यास देहांत 
   सारं कसं शांत शांत 
मुबलकता नसून नव्हे कशाची भ्रांत 
पावसाच्या वेड्या चातकासारखे 
पावसाचे दोन थेंब ही पुरेसे
तहानेची नसे कसली खंत
सारं कसं शांत शांत 
तू नसून दिसे तू नखशिखांत
स्वप्नातल्या सुंदर ललनेसमान
मनाइतक्या अंतरावर
पण तुझ्या भेटीचा प्रवास आहे अनंत
सारं कसं शांत शांत 
कवितेतल्या ओळींसारखं
रेखाटतात अशक्यास
करतात निस्तेज शिशिरास वसंत
जयदीप भोगले
ऑक्टोबर २००२ 

खुण

खुण

काही वाटा अशा असतात कि त्यांचा अंत होत नाही
पण पुन्हा त्यावर जाता खुण कधी मिळत नाही
    काही व्यक्ती अशा भेटतात कि मन हेलावून जातात
पण निघून गेल्या तरी मनात घर करून जातात
काही थेंब असे असतात कि नेहमी विरून जातात
पण विरल्यानंतर वेडे डोळ्यातून गळत राहतात
   काही आशा आशा असतात की नेहमी पल्लवित होतात
पण न सांगता खट्याळ त्या निराशेला घेऊन येतात
काही शब्द असे असतात की वेलीसारखे लांबत जातात
पण वाढल्यावरच कळते की कविता ही फुलत असतात
जयदीप भोगले
१५ सप्टेम्बर १९९९ 

Wednesday, July 21, 2010

तसवीर सी चिट्ठी

आँसू भरी कलम से ममता भारी हथेली पे
माँ तेरी चिट्ठी  लिखती है
घर राह देखे तेरी लाल मेरे ये आखें तेरी राह तकती है
            जबसे तू गया बिदेस सुने पड़ गए आँगन
            जब खेले छोटे बच्चे याद आये तेरा बचपन
            दूध के प्याली में तस्वीर तेरी झलकती है
ममता के मोम को बनाया था पत्थर मैंने
माथे पे विजयी टिका सजा के विदा किया था मैंने
एक माँ की इच्छा थी की लाज रखे तू जन्मदात्री की
पर माँ की ममता अब "पत्थर" से लहू रुलाती है
खेल रहा है तू खून की होली
पर बहु के रंग अब सजाते नहीं रंगोली
हाथों से अपने सिन्दूर तेरा वो  अपनी मांग में भरती है
पर लाज भरी वह आखें अब आंसू भरी रहती है
उस अबला की पवित्रता इन्तजार तेरा करती है
            पर देश की आन का समय है यह
तो दूध का कर्ज तुम्हें उतरना होगा
शहीद भी हुआ अग़र तू विजयी तुम्हे होना होगा
भावनओं के फूल कर्तव्य के काटों से  ही सजते है
एक तू ही नहीं है वहां हर माँ के बेटे रहते है
            पर फर्ज के ऊँचे  के पहाड़ो के पीछे
            प्यार की कुटिया में माँ भी तेरी रहती है

जयदीप भोगले
जून १९९९
हिंदी
      

25 must see bollywood movies my count 23 how much is yours .. i am going to watch garam hava and pyasa soon check the link





1.     Black (2005)
2.     Lagaan (2001)
3.     Satya (1998)
4.     Dilwale Dulhania Le Jayenge (1995)
5.     Qayamat Se Qayamat Tak (1988)
6.     Mr. India (1987)
7.     Jane Bhi Do Yaaron (1983)
8.     Arth (1982)
9.     Deewaar (1975)
10.   Sholay (1975) .
11.   Bobby (1973)
12.   Garam Hawa (1973)
13.   Pakeezah (1972)
14.   Anand (1970)
15.   Padosan (1968)
16.   TeesriManzil (1966)
17.   Guide (1965)
18.   Sahib Biwi aur Ghulam (1962)
19.   Mughal-e-Azam (1960)
20.   Pyaasa (1957) .
21.   Mother India (1957) .
22.   Do Aankhen Barah Haath (1957)
23.   Devdas (1955)
24.   Do Bigha Zameen (1953)
25.   Awara ( 1951) 

so                                    source .. thanks to indiatimes

Tuesday, July 20, 2010

नफरत की आंधी


ये कविता अपनी भारत माँ के बटवारे की खिन्नता में कारगिल युद्ध के समय पर लिखी है . १२ साल बाद इसको इस ब्लॉग में पब्लिश करने की कोशिश की है  
आपके अभिप्राय की अपेक्षा

एक माँ की थी दो संतान
फूलो सी थी उनकी मुस्कान
प्यार था उन दोनों में ऐसा 
कम थी कुबेर की सोने की खदान 
       बच्चे थे जब वे छोटे
बोल बोलते मीठें  मीठें
दोनों जब सो जाते 
अखियाँ मींचे माँ की आँचल के नीचे 
      जब वे दोनों किशोर हुए
विचार भी उनके भिन्न  हुए
पर दिल कभी अलग न हुए
सिर्फ उमंग के थे मन में दिए जले
       एक दिन एक व्यापारी आया
उसने उनको हीरों का लालच दिखलाया
साथ में नफरत की आंधी आई 
बात न उनके समझ में आई 
दोनों थे भाई भाई 
मनो बन गए निर्दय कसाई 
        दोनों गए वह माँ के पास
दोनों को थी माँ की आस
बोल रहे थे वे इतराके 
माँ जायेगी तू मेरे साथ
     दिल दहल उठा माँ का
 उसने उन दोनों को देखा
खून जल रहा था उसका
 पर समझाना नहीं था उसके बसका
         उसने एक कुल्हाड़ी लायी
कट गयी वह पावन माई 
बोल रहा था दिल उसका 
मेरे प्यारो मेरे दुलारों 
ना मारो एक दूजे पर
घाव न करो मेरी कोख पर 
               दोनों थे वे पागल
            एक ले गया मन माँ का कोमल
एक ने तन वह घायल
             पर मन तन साथ तो है ये काया 
             पगलो की ये समझ में आया
             पछतावे ने ना दोनों को मिलाया
             उठ गया माँ की आंचल का साया
अब दोनों रहते है पास पास
बीच काटों की दिवार है ख़ास
खेल हो गया वह व्यापारी का
भस्म हो गया वो पावन निवास 


जयदीप भोगले
मे    १९९९  

Monday, July 19, 2010

रुसवा

रुसण्यात काय हर्ष  आहे हसण्यात ही फसून जा

गुलाम आहे तुझाच मी  राणी पुन्हा बनून जा

आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा
लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा 

विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन  कशाला
एकाकी या जीवाला  जगण्याचे कुंपण कशाला 
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा 

Friday, July 16, 2010

प्रेमिका

.
 तुझ्या समवेत सखे आयुष्याची स्वप्न पाहिली
तूच आहेस माझी प्रेमिका पहिली वहिली
      स्वप्न पाहण्यासाठी तुझ्याशिवाय पर्याय नव्हता
तू नसता जवळ माझा वेळ ही जात नव्हता 
तुझ्या सहवासासाठी दिवसाचीही  तमा न ठेविली
        स्वप्नपुर्ततेसाठी शरीराची साथ हवी होती
पण मी होतो वेडा खुळा कारण आपली प्रीत नवी होती
पाऊले पुढे टाकतानाही तुझ्या साथीची वाट पहिली 
मी एकटाच नाही तुझा दिवाणा नंतर मला जेव्हा कळाले
बंद डोळ्यांनी मला आयुष्याचे गूढ मिळाले 
आता स्वप्न दिसायची राहूनच गेली 
खडतर जगणे सामोरे ठेवून सखे तू एकटीच   निघून गेली     
 निद्रा नको कोणाची प्रेमिका
ती गोड भासे जशी नाचे क्षणभर गणिका
झटकून निद्रा पुढे पाउल टाका
हीच स्वप्नपुर्ततेची पायरी पहिली 
जयदीप भोगले 
डिसेम्बर १९९९


Monday, July 12, 2010

मरगळलेली मालिका ..... बाजीराव मस्तानी ...

वाहिनी - इ टीवी
वेळ- ९ ते ९ ३०
कलाकार- माहिती नाहीत , ( नावात काय आहे ?)

 इ टीवि वर नुकत्याच प्रक्षेपित होणा-या बाजीराव मस्तानी   मालिके बद्दल नुकताच भ्रमनिरास  झाला .
 सुरवातिपासून बाजीराव व मस्तानी . पेशवेकालीन वैभवशाली सुवर्णयुग  याबद्दल मला कुतूहल होते आणि दुर्दैवाने त्यांच्या बद्दल विकिपीडिया  व काही  जुन्या निय्त्कालिकान्मध्ये आलेल्या  लेखांशिवाय मला फारशी माहिती सुद्धा नव्हती.म्हणुनच ही मालिका  म्हणजे मला एक पर्वणी वाटली. नितिन देसाई निर्मित असल्यामूले   मला नुकत्याच प्रदर्शित राजा शिवछत्रपति या मालिकेतला त्यानी दिलेला अनुभव आठवला अणि अपेक्षा अजुनच उंचावल्या.
आणि पहिला भाग पाहिल्यावर मला कुणीतरी उन्चावरून फेकून दिल्यासारखे वाटले.
बाजीराव इतके प्रभावी व्यक्तिचित्रण तितकेसे भूमिकेत आलेले नाही. पटकथा व संवाद हे ऐतिहासिक मालिकांचा पाया समजला जातो पण तो येथे पायमल्ली होताना दिसतो .
नेपथ्य आणि सेट्स हे राजा छ्त्रपतिचिच आठवन करून देतात कारण कदाचित देसाई नि काटकसर करून तेच सेट्स वापरून  सर्व कसर भरून काढली आहे.
एक अमराठी मुलगी मस्तानीची करत आहे आणि ती दिसण्या शिवाय सर्व ठिकाणी कमी पड़ते.
शीर्षक गीत सुद्धा शंकर महादेवन यांनी म्हणावे तसे केले नाही.
बाजिरावची कणखरता, काशी बाईंची शालीनता , मस्तानिचे सौंदर्य , चिमाजी अप्पंचा धुरंदर पणा या सर्व गोष्टी या मालिकेत एका भक्कम खांबाजोग्या वाटायला हव्या हे निर्मात्यानी ध्यानात घ्यायला हवे.  पण कदाचित आधी कलस मग पाया या तत्वाचे ते वाटतात ( उपरोधात्मक)
ऐतिहासिक मालिका ही सु संशोधित असणे ही तितकेच महत्वाचे आहे.
आज मला ही मालिका पाहताना प्रत्येक वेळी " स्वामी " ही मालिका आठवते ही खेदाची गोष्ट आहे  . क्षयाने आजारी असलेले माधवराव - रविन्द्र मंकनी, १६ वर्षांच्या रमाबाई - मृणाल देव ," नाही माधवा !!! नाही " असे म्हणणारे  राघोबा काका - श्रीकांत मोघे  , दया डोंगरे  किती आठवू  ? ही माझ्या लहानपनिची मालिका पण अजूनही लख्ख लक्षात आहे. पूर्वीची निर्मिती प्रणाली तंत्रज्ञान हे सर्व कमी दर्जाचे असून नाट्य अणि अभिनयाने निपुण मालिका किती प्रभावी ठरू शकते याचे ते उत्तम उदहारण आहे .
या सर्व टिकांचा जर कुणी विचार केला तर कदाचित आपण एक नवीन स्वामी निर्माण करू  शकू बाकी आपण प्रत्यक्ष दर्शनी हे ठरवावे .
जयदीप भोगले

Friday, July 2, 2010

मेघना


 स्वप्नातल्या प्रेम पाखरा सत्यात कधी येशील का
माझ्या मानस ललनेची प्रतिमा मूर्तिमंत कधी करशील का 

मधाल तुझा स्वर भासे
पण मजसाठी सुर कधी छेडशील का 

मयुरपंखाचे सौंदर्य तुला लाभले 
एक मोरपीस माझ्यासाठी मोड्शील का

कल्पनातीत जगात कविच विहार करतो
पण या जगात स्पर्शाचा आभाव राहतो
रातराणीच्या सुगंधाने मी मुग्ध झालो
त्याचा बहर माझ्या अंगणात कधी आणशील  का 

हाय हे स्वप्न आहे 
गोड रात्रप्रहरातुन दिवस डोकावून पाहे
त्या दिवसाच्या प्रकाशात एक सत्य भेट देशील का 

मेघांच्या या दाटित पावसाची सर लपून आहे
त्या सरीला समीर दूर नेऊ पाहे
या चाताकाच्या तृषार्ततेची मेघना बनुन येशील का 

कवी जयदीप
१५ सप्टेम्बर २००६ 

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...