रडवून गेला पण तो हसवू कधी शकला नाही
शारदेच्या पायावरती फूल मी वाहिले होते
निर्माल्यात गेले अगतिक पण मला कधी उमजले नाही
उमेदीची शिदोरी घेऊन जगप्रवासास मी निघालो
सागरात मी वल्व्ह्त राहिलो पण पाणी कधी संपले नाही
जणू भुकेल्या मुलाच्या समाधानासाठी मनाने पाणी खुप शिजवले
जेवणाच्या आशेवर भूक माझी शमली नाही
जीवनाच्या गणिताची पाने मी उलटत आहे
वजाबाकित पक्का झालो पण बेरीज कधी जमली नाही
जयदीप भोगले
२० ऑक्टोबर १९९९
No comments:
Post a Comment