Thursday, September 30, 2010

जिस बला में जिंदगी अटकी .

मित्रांनो , गेले पाच दिवस मी लिहले नाही मग आता मला फार खुमखुमी आली आहे म्हणून लिहितो आणि ते ही थोडेस वेगळे
ही गोष्ट पुण्याची साल २००३ .. मी एका छोट्या ऑटोमोबाईल कारखान्यात कामाला होतो . तसे पहिले तर मी एक योग योगाने झालेला इंजिनिअर .. ( तसे बरेच जण माझ्याच गटात येतात पण कबूल कमी जण करतात .. असो )
 कारखाना छोटा होता आणि मी नवशिका त्यामुळे सुरवातीला सी एन सी मशीन वर काम करयचो .. आता सी एन सी ही एक स्वयंचलित मशीन असते यापलीकडे फार काही सांगत नाही .. इंजिनिअर आणि तत्सम लोकांना ती की आहे हे  कळेल आणि इतरांना जाणून घ्यावे असे काही त्यात नाही म्हणून ..सी एन सी . आता साहित्यात कवितेत लोकांमध्ये रमणारा मी .. मला मशीन बरोबर काही मजा यायची नाही..कदाचित म्हणून मी काही संगणक क्षेत्रात काम केले नाही .. (असो विषयांतर नको)..
मला या मशीनचा जाम राग यायचा पण एम बी ए च्या परीक्षांसाठी लागणारा पैसा साठावा.. उगीच लोकांनी बेकार म्हणू नये .. आणि काही नाही तर पाट्या टाकत कुठेतरी जाऊन नक्कीच पोहचू म्हणून मी एक एक दिवस पुढे जात होतो ...
मी कविता करतो हे माझ्या इतर कामगार मित्रांना माहिती होते .. त्यांनी मला आमच्या सी एन सी मशीन बद्दल काहीतरी लिहायला सांगितले .पण मी मात्र सी एन सी ची  खुन्नस डोक्यात ठेउन कविता केली .कविता हिंदीत होती  . 
मी इंजिनिअर महाराष्ट्राबाहेर झाल्यामुळे माझ्यावर हिंदी भाषेचे तितकेच संस्कार झाले कारण तीच बोली भाषा होती .. म्हणून मी हिंदी कविता केली (तश्या मी मराठी मध्ये ही कविता केल्या)  ..
कदाचित या कवितेमधली  खरी मजा एखादा मेकानिकल इंजिनिअर किंवा तांत्रिक क्षेत्राचे लोक आधी घेऊ शकतील पण कवितेचा आस्वाद सर्व वाचक घेतील अशी अशा बाळगतो ..

जिस बला में जिंदगी अटकी ..
उसका नाम सी एन सी
स्पिंडल की स्पीड ने
टरेट की फीड ने 
अत्याचारों की भीड़ लगा दी 
जिस की आवाज से 
एक आग से दिल में भड़की 
उसका नाम सी एन सी 
                        भावनओं पे कट इसने निकाल दिया 
                         उसमे एक लम्बे ग्रूव का घाव भी जड़ा दिया 
                          साइकल टाइमिंग लगा के जवानी को कुरेद दिया
                           और इस सोच में पड़ गया तो 
                           जो  धम से पार्ट पे धडकी 
                         उसका नाम सी एन सी
सरफेस फिनिश ने सपनो को फिनिश किया
आर ए के नाम से दिल में डर सा आ गया
जब सब को बदल दिया तो ,
जिसकी रेडिअस स्टेप जैसे खटकी 
उसका नाम सी एन सी
                             कभी टार्गेट की मार से
                             तो कभी क्वालिटी के वार से
                             करिअर के ग्राफ को टेपर सा आ गया
                             जो इस सोच में पड़ गया 
                              तो मेनेजर बोला .. तेरे प्रोसेस कंट्रोल की लाइन नीचे कैसे अटकी 
                              जो इतने करतब दिखा के ना अटकी 
                              उसका नाम सी एन सी
कभी फानुक कभी मझाक
ये सीनुमेरिक भी ना आये बाज 
कंट्रोल सब अलग अलग
मगर सब की एक ही आवाज
इनके प्रोग्राम से पूरी सेटिंग ही भटकी
उसका नाम सी एन सी
                                   पर जब मैंने सोचा 
                                    जिसने सौ बेकारो को निवाला दिया 
                                    मुझ जैसे बेसहारा को सहारा दिया 
                                      एक्स्पिरिएन्स  ना होके आसरा दिया 
                                      उसका नाम सी एन सी
                                       जिसने डूबती जिन्दगी कंट्रोल की 
                                        उसका नाम सी एन सी उसका नाम सी एन सी...

त्या रात्रि संध्याकाळी सेकंड शिफ्ट ला मशीन पेक्षा माझ्या सगळ्या मित्रांच्या टाळ्याचा आवाज जास्त होता ...
तितक्यात आमचे म्यानेजर आले .. काय रे भाऊ ? काय करत आहात ? ..
तात्या ... याने बघा किती चांगली कविता केली आहे ...साहेबानी त्या कागदाकडे कसपट असल्यागत पाहिले ...
अरे पण यासाठी २० मिनिटे मशीन बंद ठेवली तेवढा वेळ कोण भरून काढणार.. जरा टाइमपास कमी कर आणि  काम कर म्हणजे पुढे जाशील ..
त्यादिवशी टाळ्याचा डोहात कुणीतरी वास्तववादी चिखालाचा दगड टाकुन पाणी गढूळ   केले असे वाटुन गेले  ...
आणि काही दिवसात मी हे क्षेत्र  आपला प्रान्त नाही हे उमजुन पाउल पुढे टाकले आणि पाणी वाहते केले ...
पण आजही आठवणीच्या शेंगा खाताना एखादी  खवट शेंग असल्यागत तो प्रसंग आठवतो ...  

टीप - टरेट - ( मशीनवर धारधार टूल लावण्यासाठी असलेले रिंग )
फीड - या परिमानाने पोलाद कट केले जाते 
प्रोसेस कंट्रोल चार्ट  - सान्खिक्की पद्धतीने काढलेला आलेख 

जयदीप भोगले
३०- ०९-२०१० 
कविता - १८ -१०-२००३
   


                   

मला भावलेले मराठी चित्रपट- का पाहावेत ( भाग -३)

अशी  ही  बनवा बनवी १९८८ 
दिग्दर्शक - सचिन
कलाकार- अशोक सराफ, सचिन , लक्ष्मीकांत बेर्डे 
अशी ही बनवा बनवी म्हणजे सचिन च्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम सिनेमा .. आणि कदाचित कॉमेडी काळामधील सर्वोत्तम म्हणावा असा .
उत्तम शाब्दिक विनोद . स्त्री रूप असून कुठेही पाचकळ न होऊ देता साकारलेली भूमिका . अगदी छोट्या छोट्या सुद्धा  पण लक्षात राहणा-या भूमिका .
आणि उत्तम गाणी .. त्यामुळे प्रफुल्लीत करणारी कॉमेडी म्हणून संग्रही असावा असा सिनेमा ...

धाकटी सून १९८६ 
दिग्दर्शक - राजदत्त 
कलाकार- सविता प्रभुणे , उदय टिकेकर, स्मिता तळवलकर ,शेखर नवरे 
हा सिनेमा फार उत्तम अगदी वेगळी कथा असे काही नाही पण जेव्हा मी कौटुंबिक सिनेमा म्हणून अवलोकन करतो तेव्हा माहेरची साडी .. लेक चालली या पेक्षा मला हा चित्रपट जास्त आवडतो .
तीच जुनी स्टोरी मोठी सून वाईट .. मोठा मुलगा बैकोच्या ताटाखालचे मांजर .. छोटा मुलगा परागंदा .. पण श्रवणीय गाणी . शरद तळवलकर , स्मिता तळवलकर आणि सविता प्रभुणे यांनी हा सिनेमा पेलून धरला आहे ..
मला यातले... सांग तू माझाच ना हे गाणे फार आवडते ... 
माझ्या पत्नीने हे गाणे शिकावे असे मला फार वाटायचं मग तिने मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला  ही सी डी दिली .. म्हणून हा चित्रपट संग्रही ...

उंबरठा १९८२ 
दिग्दर्शक - जब्बार पटेल
कलाकार- स्मिता पाटील , गिरीश कर्नाड , 
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलात्मक सिनेमा म्हणून या चित्रपटची गणना करावी वाटते .
स्मिता पाटीलने केलेली भूमिका मला विशेष लक्षात राहते .
काळजाचा ठाव घेणारी गाणी .. स्त्री उंबरठ्याबाहेर पडल्यानंतर तिचे बदलणारे जीवन .. महिलाश्रम या संस्थेचे भयानक वास्तव .. असा हा चित्रपट विस्कटून टाकतो ..
jaydeep bhogale 

Thursday, September 23, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट का पहावेत? भाग-२

मित्रानो आज दूसरा भाग सादर करतो .. जरा वेळ कमी असल्यामुले चार सिनेमांबद्दल सांगतो . 
मी या प्रतिक्रिया चित्रपट समीक्षक म्हणून न देता मला काय वाटत्ते ते सांगतो .. म्हणुनच कदाचित काही कलाकारांचा उल्लेख यात राहून जातो पण जे कलाकार लक्षात राहतात त्यांच्याबद्दलच लिहावे नाही का ... नाहीतर उगाच एक ना धड असे होईल ..
आवडल्यास  इतराना वाचायला सांगा ..नाहीतर आपण टिका करण्यास समर्थ आहातच ...
सरकारनामा -१९९८

दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- यशवंत दत्त , दिलीप प्रभावळकर , अश्विनी भावे
एक वेगवान चित्रपट अशी या चित्रपटाची पंच लाईन होती .. आणि हा चित्रपट त्याला खरा उतरतो .
राजकारण आणि त्यातील नाट्यमय घडामोडी ते ही मुख्यमंत्र्याच्या मुलाचे लग्न या विषयातून अतिशय तडाखेबाज संवाद असलेला हा चित्रपट
हा चित्रपट  फक्त श्री यशवंत दत्त आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पाहावा.
राजकारणी लोक किती धुरंदर असू शकतात ते हे दोघे दिग्गज हुबेहूब सादर करतात.
चित्रपटाच्या संकलन आणि सादरीकरणासाठी  सलाम ...

लपंडाव १९९३
दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- अशोक सराफ , विक्रम गोखले , वंदना गुप्ते , सविता प्रभुणे ,आणि इतर सर्व जन प्रभावी
संवाद - मंगेश कुलकर्णी 
तीन फुल्या आणि तीन बदाम यावर आधारित भन्नाट कॉमेडी .. निखळ मनोरंजन 
पुणेरी जीवनाबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे आहे. जे जुन्या काळी पुणे विद्यापीठात शिकत होते. 
अशोक सराफ यांचे संवाद आणि संवाद फेक ज्यांना आवडते त्यानं हा चित्रपट संग्रही ठेवावाच .
विरोधी व्यक्तिमत्व, पुणेरी नावे, त्यांचे लाईफ स्टाइल दाखवण्याची पद्धत   इतक्या बारकाईने मी दुसऱ्या कुठल्या चित्रपटात लिहिलेली बघितली नाही 
पटकथा आणि हलके फुलके पण लक्षात राहणारे संवाद यासाठी रविवार दुपार नेहमीच यासाठी राखून ठेवावी असा चित्रपट 

कळत नकळत - १९९१
दिग्दर्शक - कांचन नायक 
निर्माती - स्मिता तळवलकर 
कलाकार- विक्रम गोखले , सविता प्रभुणे , अश्विनी भावे , अशोक सराफ आणि दोन बाल कलाकार 
गंभीर विषय गंभीर रीतीने कशे हाताळले जातात हे दाखवून देणारा चित्रपट
१९९१ च्या काळात पुरुषाच्या नकळत झालाल्या गंभीर चुकीला क्षमा हवी का नको यावर प्रकाश टाकणारा ..
विक्रम गोखले आणि सविता प्रभुणे यांनी केलेला अभिनय . अश्विनी भावे यांची छोटी पण प्रभावी व्यक्तिरेखा .. आणि बाल कलाकारांची  लक्षवेधी भूमिका यासाठी हा चित्रपट पाहावा.
मला हा चित्रपट कधी कधी अभ्यास म्हणून पाहावा वाटतो .. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात या चित्रपटाच्या कथा आणि त्यातील व्यक्तींबद्दल मला वेगळा दृष्टीकोन मिळाला आणी मिळत राहतो ..
असे चित्रपट विरळेच ... 

थरथराट- १९८९
दिग्दर्शक आणि निर्माता - महेश कोठारे
कलाकार - लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे , राहुल सोलापूरकर 
मसाला चित्रपटातून कसे मनोरंजन करावे हे महेश कोठारे यांना नेहमीच जमले .. आणि त्याचा उत्कर्ष म्हणजे हा सिनेमा.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची धमाल भूमिका .. आणि कॉमेडी आणि त्यात राहुल सोलापुरकारची लक्षवेधी व्यक्तिरेखा ..
तिकीटबारीवर हा चित्रपट जोरात चालला होता ..
महेश कोठारे सिनेमाचा मनमोहन देसाई सारखा एक फोर्मुला होता .. तो यात एकदम यशस्वी ..
त्यांचे बाकी चित्रपट ही अगदी याच सांगाड्यावर आधारित होते 
पण कॉमेडी किंग लक्ष्याचा सुपर स्टार जमान्याचा कल्ला चित्रपट.... 

जयदीप भोगले 
२३-०९-२०१० 

Wednesday, September 22, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट - का पहावेत ?(भाग १)-


मित्रांनो कामाच्या गराड्यामुळे मी काही दिवस लिहू शकलो नाही . तुम्ही मला फार मिस केले असेल असे म्हणत नाही .. पण तरीही जे आजकाल माझा ब्लॉग वाचतात हे फक्त त्यांना उद्देशून ...
मी २५  उत्तम मराठी चित्रपट याची एक लिस्ट सांगितली होती आता चित्रपट प्रदर्शित झालेल्या सालाप्रमाणे ते का चांगले ते मी लिहणार आहे .
त्याचा पहिला भाग लिहिला आहे . आवडल्यास नक्की कळवा. न आवडल्यास टीका करा .. 


जोगवा - २००९
दिग्दर्शक - राजीव पाटील 
कलाकार - उपेंद्र लिमये , मुक्त बर्वे, किशोर कदम  
एक मन हेलावून टाकणारा अनुभव .. संवेदनशील दर्शकांना हा चित्रपट नक्कीच बेचैन करून टाकतो. अप्रतिम छायाचित्रण , भेदक आणि वास्तव संवाद आणि उपेंद्र लिमये व मुक्त बर्वे यांचा उत्तुंग अभिनय या मुळे हा चित्रपट व्यावसायिक नसून मला आवडून गेला. अजय अतुल यांची समर्पक गाणी हे सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू होती. जोगती समाज आणि त्यामध्ये माजलेली अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून राजीव पाटील यांनी या चित्रपटाचे सोने केले.
सर्वसाक्षी आणि इतर काही चित्रपट ही अंधश्रद्धेतून होणा-या पिळवनुकीवर  आधारित होते पण जोगवा हा चित्रपट जोगतिणीची दुर्दशा जास्त उत्तम रीतीने दाखवून जातो.
आजच्या भांडवलवादी प्रगतशील भारतीय  जगामध्ये अजूनही  दु:ख किती भयाण स्वरुपात जगत आहे हे जर आपल्याला हवे असेल तर हा चित्रपट आपल्या संग्रही हवाच .
नटरंग - २००९
दिग्दर्शक- रवी जाधव
कलाकार- अतुल कुलकर्णी , किशोर कदम ,
छायाचित्रण - महेश लिमये
जाऊ द्या ना घरी 
हिंदी चित्रपटाशी स्पर्धा करणारे छायाचित्रण , उत्तम संकलन , अप्रतिम संगीत आणि गीते याने नटरंग हा चित्रपट नटलेला होता.
चित्रपटातील विषय कलात्मक पठडीकडे झुकणारा असूनही व्यावसायिक दृष्टीने हाताळणी करून चित्रपटाच्या कथेला धक्का न लागू देणे यात दिग्दर्शक रवी जाधवांना यात यश आले आहे.जुन्या आणि कृष्णधवल जगात बंद असलेल्या तमाशाप्रधान चित्रपटाला पुन्हा एकदा नवतारुण्य देण्याचे काम या चित्रपटाने केले.
उत्तम बनवलेला  ग्रामीण चित्रपट हा शहरातही हाउसफुल्ल चालू शकतो हे याने दाखवले.
अतुल कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी घेतलेली मेहनत ही आणखी एक जमेची बाजू .
हा चित्रपट गीतांसाठी आपल्या संग्रही नक्की हवा


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय  २००९ 
दिग्दर्शक- संतोष  मांजरेकर
कलाकार- सचिन खेडेकर, महेश मांजरेकर 
स्फुरण फक्त ऐतिहासिक आणि युद्धपटांनी चढू शकते अशी जर आपली धारणा असेल तर हा चित्रपट आपण पहावाच. दिनकर मारुती भोसले या व्याक्तीचीत्रातून प्रत्येक मराठी माणसाला विचारलेला सवाल म्हणजे मी शिवाजी राजे बोलतोय . 
उत्तम विषय , अप्रतिम हाताळणी , उत्कृष्ट एक खांबी - सचिन खेडेकर यांचा अभिनय यांनी नटलेला हा एक व्यावसाईक चित्रपट .
मराठी चित्रपटातील आजतागायत सर्वात अधिक व्यावसाईक यश मिळवलेला . 
हा चित्रपट हा मला त्याच्या काल्पनिक जगतातून वास्तवाकडे कसे बोट दाखवता येते याचे उत्तम उदाहरण वाटते . प्रत्येक संवादातून आपल्याला मराठीपणाची जाणीव आणि अभिमान पुन्हा एकदा जागृत करून देणारा चित्रपट .
पटकथा आणि संवाद यासाठी हा चित्रपट संग्रही असावा 

कायद्याच बोला ..२००५ 
दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार - मकरंद अनासपुरे , सचिन खेडेकर
एका कॉमेडी सम्राटाचा उदय अशी या चित्रपटची ओळख करून द्यावी लागेल .
हा चित्रपट हा निखळ विनोदी पण कुठेतरी उत्कंठा वाढवणारा आणि अतिशय सुटसुटीत पटकथा असणारा चित्रपट आहे.
चित्रपटाने व्यावसाईक यश तर मिळवलेच पण हळू हळू शहरी प्रेक्षक मल्टीप्लेक्स दर्शक मराठी चित्रपटांना जाऊ लागला .
जुन्या द्वैअर्थी , अंगविक्षेप प्रधान  विनोदांना बाजूला ठेऊन भाषाप्रधान विनोद या चित्रपटाने उचलून धरला आणि त्याचा उदय म्हणजे मकरंद अनासपुरे 
मकरंद अनासपुरेच्या निखळ विनोदासाठी हा चित्रपट संग्रही हवाच .

अगं बाई अरेच्चा ... २००४ 
दिग्दर्शक - केदार शिंदे 
कलाकार - संजय नार्वेकर , दिलीप प्रभावळकर 
संगीत - अजय अतुल 

हा चित्रपट एका इंग्रजी ( व्हाट वूमन वांट ?) या वर आधारित असूनही मराठी मातीचा सुगंध जपणारा असा आहे . चांगले कथानक आपल्या पद्धतीने फार कमी चित्रपटात उतरवलेले असते तसा एक चित्रपट. उत्तम गाणी  ' मन उधाण वा-याचे ' आणि दुर्गे दुर्गट भारी ही तर अविस्मरणीय आहेत .
अजय अतुल यांच्या सांगीतिक प्रवासाचा महत्वाचा टप्पा असे याला सांगावे लागेल.
हा चित्रपट तुम्ही कधी कुठही कुठूनही पहिला तरी तुम्ही पाहू शकता असे मला वाटते . आणि पुरुषाच्या मनातील सुप्त इच्छा ' मला बाईच्या मनातले कळले तर ' म्हणून गालातल्या गालात हसून स्वप्न रंगवण्यासाठी हा चित्रपट मला फार आवडतो .
स्वप्नकथेचे वास्तववादी मराठमोळे ' मुंबईकरी ' चित्रण म्हणून हा चित्रपट आपल्या संग्रही हवा . २ तासात नक्कीच फ्रेश व्हाल ....






जयदीप भोगले
२२-०९-२०१० 

Thursday, September 16, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट - तुम्ही पाहिलेत ?


मित्रांनो, आठवणीतले चित्रपट, आवडती गाणी आपल्याला कायम हवेहवेसे वाटतात . आपण पुन्हापुन्हा त्यांच्याबद्दल बोलतो वाचतो , ते कुठल्या वाहिनीवर येत असतील तर अगदी थोडावेळ देवदर्शनासाठी थांबल्यागत थबकतो , आणी दर्दी लोक तर त्यांचा संग्रह ही करतात . असेच काही चित्रपट ते ही अस्सल मराठी.बर का !!
माझ्या मते हे चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासात नक्कीच एक मनाचे स्थान बनून राहतील . या पंक्तीमध्ये तुम्हाला काही चित्रपट अजून जमा करावे वाटतील, कुठले तरी चित्रपट वादातीत म्हणून वजा करावे वाटतील पण हे चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडतील , आवडलेले असतील याची मला खात्री आहे. 
इंडिया टायीम ने अग्रणी असलेल्या उत्तम बॉलीवूड चित्रपटाची लिस्ट जाहीर केली होती .. त्यामुळे मला वाटले आपल्या मराठी चित्रपटांमध्ये नक्कीच असे काही चित्रपट नक्कीच आहेत जे अत्युत्तम आणी न सोडण्याजोगे आहेत त्याची लिस्ट मी या पोस्ट मधून सांगणार आहे . आवडल्यास दाद अपेक्षित आणी हे चित्रपट बघणे ही अपेक्षित आहे आणि ते ही ओरिजिनल सी डी घेऊन बर का !! 





1 जोगवा2009


2 नटरंग2009


3 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2009


4 कायद्याच बोला 2005


5अगं बाई .. अरेच्चा2004


6 सरकारनामा 1998


7 लपंडाव1993


8 कळत नकळत 1991


9 थरथराट1989


10अशी ही बनवा बनवी1988


11 धाकटी सून 1986


12 उंबरठा1982


13 सिंहासन1980


14 हा खेळ सावल्यांचा 1976


15 सामना1974


16पिंजरा1972


17 सोंगाड्या 1970


18 मुंबईचा जावई1970


19 एकटी 1968


20 हा माझा मार्ग एकला1963


21 जगाच्या पाठीवर 1960


22 सांगते ऐका1959


23 श्यामची आई 1953


24 कुंकू( प्रभातचा)1937


25 संत  तुकाराम १९३६ 





आहेत ना जबरदस्त हे चित्रपट?हे चित्रपट  वेगवेगळ्या पठडीतले आहेत . काही विनोदी ,काही गंभीर, काही कौटुम्बिक काही श्रवणीय आहेत पण सर्व चित्रपतानी  तिकिटबारिवर , समीक्षकांच्या लेखणीवर त्यांच्या काळात राज्य केले आहे . कालाबरोबर ते जुने होत नाहीत. अगदी कृष्णधवल असले तरीही ... या प्रत्येक चित्रपटाचे चार भागांमध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे ,की हे  का चांगले आहेत. शक्य झाल्यास विडियो पण टाकेन.
आवडल्यास प्रतिक्रिया जरूर सांगा.. ( कदाचित याजसाठी केला होता अट्टहास ... :)

जयदीप भोगले
१५ -०९-२०१०
  





बचपन


छलक रही है कुछ तसबीरे पुरानी 
पुरानी है पर उसकी रंगिनीयत सुहानी 
जिम्मेदारी की दहलीज पे खड़ी है जवानी
कुछ याद है बचपन की यादे रूमानी 
           


  बन गयी फूल वो नन्ही सी कली
    पर खुशबू छोड़ गयी उसकी निशानी
   लगा ऐसे की जैसे हो गयी अनोहोनी
    पर कुदरत है ये,
   बचपन बीता लो आ गयी जवानी 
  
 कोमल था तन चंचल था मन
   खुशियों से भरा था जिंदगी का चमन
शोख सा लगता था अल्लड पवन
बचपन के थे ख्वाब आसमानी
सच्चाई से परे थी सोच ये दीवानी
कुछ याद है बचपन की यादे रूमानी


जयदीप भोगले
२५/०२/९९

Wednesday, September 15, 2010

आशा की किरन

ए दिल तू बता तू क्यों  उदास है
अश्क तेरे पास है फिर तुझे क्यों प्यास है
क्यों है मन में शोर
जब चारो और सन्नाटा है
जब आग ही लगी है दिल में
तो चिरागों की रौशनी की आस है
जब बह रहा है खून तो
हाल ए दिल सुनाने को कलम की क्यों तलाश है
ना ढूंढ़ तू दवा जब दर्द तेरे पास है
कलेजे का टुकड़ा चला गया
तो क्यों उठी घाव से वह कराह?
अरे ये महज एक खराश है !
बेवफाई से हुआ तू घायल
तो वफ़ा की क्यों फरमाइश है?
पत्थर की कियी थी आजमाइश तुने
तो पत्थरदिल से यह कैसी कशिश है ?
मीठे जहर से हुआ था बेहोश
इसलिए मुझे अफ़सोस है
देख जिंदगी को ख़ुशी से
तो चमन ए जन्नत तेरे साथ है
नाही तो सब वीरान और ख़ाक है

जयदीप भोगले
२६ -०२-९९

Tuesday, September 14, 2010

सुहाना सफ़र--(हिंदी आरी इल्ला ... मल्यालम आरियो?)

मित्रानो ,प्रत्येक कविता लिहिताना काहीतरी पार्श्वभूमी असते आणि कोणीतरी प्रेरणा असते असे म्हणतात आणि ते काही खोटे नव्हे .
ही माझी अगदी पहिली वहिली म्हटली तरी चालेल अशी कविता आहे . पण हा प्रसंग अगदी मजेशीर आहे . आता मी मजेशीर म्हणतो आहे पण त्यावेळी काही तसा वाटला नाही..  
 मी कालिकत ला शिकायला होतो इन्जिनीरिंग ला  . जयंती एक्सप्रेस ने जायचो सोलापुरहून.. म्हणजे लातुरहून सोलापूरला ट्रेन पकडायला जावे लागायचे .. .
मी साइड लोअर बर्थ वर होतो  ३ जानेवारी १९९९ ची गोष्ट  .. सकाळ झाली.. गाड़ी केरळ मध्ये आली होती . आपल्या भारतीय रेलवे मध्ये पद्धत आहे की स्लीपर क्लास सकाळी अचानकपणे जनरल डब्या प्रमाणे वागायला लागतो.अचानक ७२ जनाचा डबा १७२ जनांचा भासु लागतो ..पण भारतात नेहमी ( प्लीज अडजस्ट..)  करावे लागते. मला पायाला काहीतरी लागल्यासारखे जाणवले म्हणून उठून बसलो आणि अचानक उठल्यानंतर होणारी चीड चीड  एकदम नाहीशी झाली ( समोर टी सी किंवा पोलिस होता म्हणून नव्हे ) पण एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी म्हणजे पायाशेजारी बसलेली होती.ही अनुभूति मी किती तास घेत होतो कोण जाणे..
 मी हळूच पांघरलेल्या शालित लपवत चिमटा काढला ( स्वत:च्या  हाताला ) की हे स्वप्न तर नव्हे ?. एरवी एकदम ओस असणारी रेलवे आज एकदम पावसाळ्यात हिरवी झाली होती. पण मला एकदम त्या यौवनाचे म्हणतात तसे चटके बसत होते . अहो वयाच्या १९ वर्षी असे होणार नाही का?  .. रेलवे ला आगगाडी का म्हणतात आता मला कळू लागले होते.
मी पटकन पाकिजाचा सीन आठवला.. पण हा काही पाकीजा नव्हे असे काही मला जाणवले नाही  आणि फार जास्त स्वप्नाळू  बनुन लेखणी हातात घेउन ख़ाली लिहलेली कविता खर खर लिहून काढली मला वाटले आता मी राजकुमार का कोण होणार ...पकिजातला..कविता हिंदी मध्ये लिहिली होती  


ये जर्द है आँखे 
बेदर्द हो तूम
पास होके भी क्यों  दूर हो तुम
चुपचाप हो क्यों गुमसुम हो तुम 
   
ये शीतल सी नजर
पर शोला हो तुम
ठंडी जलन सी है
पर चन्दन हो तुम
सात सुरों की बौछार हो तुम
मगर,चुपचाप हो क्यों गुमसुम हो तुम

अँधेरे का कोई आफताब हो तुम
सेहरा की हरियाली हो तुम
सोने में जादा हीरा हो तुम
सफ़र में घायल हो गए हम
मगर दवा हो तूम दवा हो तुम 

 आता ही कविता लिहली पण कवितेला दाद मिळाल्याशिवाय मला काही चैन पडेना. आता मी एकटाच प्रवास करत होतो मला एकदम कविता सुचली, ही टिमकी गाजवण्यासाठी मित्र ही जवळ नव्हते. मग मी एकदम धाडस करून त्या ललनेला सांगायचे ठरवले. जरा इकडे तिकडे अंदाज घेतला की तिचा भाऊ , मामा , वडिल काही दिसत तर नाही ना ... पण तशी खत्री पटल्यावर मी जरा गाल मागे करून ( उगीच रिस्क नको ) हलों म्हणालो .. मग कुठे जाणार वगैरे विचारपूस केली .. आणि मग जीव मुठीत घेउन घाबरत म्हणालो .'मैडम मैंने आपसे इंस्पायर होके एक कविता लिखी है क्या आप सुनना चाहोगी ?'


मैडम थोड्या हसल्या आणि सुंदर स्वप्नात असताना ,अचानक पाणी फेकल्यासारखे म्हणल्या ( हिंदी आरी इल्ला ... मल्यालम आरियो ?) अचानक मला काय सांगावे, हसावे का रडावे असा प्रश्न पडला .. मी पचका झाल्याचा हावभाव ना आनु देता तिला म्हणालो इट इज ओके ... आणि या सकाळी झाल्येल्या औट घटकेच्या देवदासाने चहाचा कप हातात घेतला .
अजुन सुद्धा मी कविता करण्याचा प्रयत्न करतो पण आगगाडी मध्ये बसल्यावर लोअर साइड बर्थ कधीही बुक करत नाही .
जयदीप भोगले
  

Monday, September 13, 2010

ठिकाना


कभी ख्वाबो में कभी खयालो में
कभी ढूंढती निगाहों में तुम रहती हो
पर हमने नहीं जाना की तुम कैसे लगती हो?





एक आवाज कानो में दस्तक दे जा रही है
एक आहट  सी  हर कदम पास आ रही है
पर हर पल इंतज़ार है तेरे वजूद का
क्या हकीकत में भी तुम इस जहाँ में बसती हो?

 तेरी जुल्फों के बादलों से अँधेरा सा छाया है
तेरी चेहरे की चांदनी से उजाला सा आया है
अब अँधेरा पाऊं या उजाला चाहूँ
क्या इसका जवाब तुम जानती हो?

आज क़ाफ़िर  खुशनसीब लगते है
मोहोब्बत नहीं तो बुत का दीदार तो पाते है
कहाँ ढूंढे तुम्हे इस जहाँ में
क्या तुम अपने ठिकाने का पता जानती हो?
जयदीप भोगले
१७-०२-२००३

Saturday, September 11, 2010

कुछ खोया कुछ पाया

इस प्यार के सौदे में हमने
कुछ खोया है कुछ पाया है
दिल तो हमने खोया है
पर जान को हमने पाया है
नींद हमने खोयी है
और कुछ सपनो को हमने पाया है
सीधी सादी शख्सियत  हमने खोयी है
और दीवानगी को पाया है
    प्यार की कश्ती हमने पायी है
     तो साहिल को हमने खोया है
अब कुछ खोना है कुछ पाना  है
ये तो जिन्ग्दगी का साया है
ये सौदा नहीं तो मोहोब्बत की माया है
कुछ शिकवा नहीं खोने से हमें
जब खुद को हमने खोया है
तब उस हसीन दीदार को हमने पाया है

जयदीप भोगले
१२-०९- ०३

Friday, September 10, 2010

सल्लू मियाचा रमजानी शिरखुर्मा - दबंग



चित्रपट- दबंग 
भाषा- हिंदी
कलाकार- सलमान खान , नवतारका - सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान , सोनू सूद, आयटम बॉम्ब- मलायका अरोरा
दिग्दर्शक - अभिनव कश्यप 
संगीतकार- साजिद वाजीद 
पाहवा की नाही - पाहिल्यास मजा येईल
मित्रानो , डोक्याला त्रास देणारे , डोके धरून बघावे लागणारे , आणि डोके बाहेर ठेऊन जाऊन बघायचे अशी मी नवीन वर्गवारी केली आहे. आजच प्रदर्शित झालेला दबंग हा चित्रपट डोके बाहेर ठेऊन जायच्या पठडीतला चित्रपट आहे .
हा एक हाणामारी चित्रपट या धाटणीचा आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी हा चित्रपट शिट्या वाजवणारे , मजा करणारे तरुण , आणि सलमान खान चे पंखे यांना विचारात ठेऊन सर्वेषाम दर्शकांसाठी बनवलेला दिसतो आणि तो प्रयत्न अगदी चोख या चित्रपटात यांनी बजावला आहे.
चित्रपटात कथानक हे फार महत्वाचे ( आजकाल कुठे असते म्हणा) नसल्यामुळे चित्रपट कथावस्तू अशी आहे आणि तशी आहे असे मी सांगणार नाही .
पण तरीही आता हे परीक्षण लिहायचा घाट घातला आहे तर सांगतो, रॉबिनहूड चुलबुल पांडे ( सलमान खान) हा लहानपासुनच त्याचा सावत्र भावाबद्दल( अरबाज खान ) खार खाऊन असतो कारण त्याचे सावत्र वडील प्रजापती पांडे ( विनोद खन्ना) याला कधीच मायेचा हात देत नाहीत .. पण त्याची आई ( डिम्पल कपाडिया ) त्याला समजावून पुढे रेटत असते पुढे हाच मुलगा पोलीस अधिकारी बनतो .. त्याचे उत्तर प्रदेश राजकारणातील गुंडांबरोबर भांडण , एका कुंभार बालेशी  ( अतिशय नीटनेटकी आणि माती न लागलेली ) गुळ घालणे आणि ... बस्स  बस्स ...मला वाटते आता तुम्हाला कथा कशी असेल हे पुसटसे उमजले असेल.
 पण आता अशा कथानकात जर सलमान खानची स्टायील, वेगवान अशी साहस दृश्ये , श्रवणीय गाणी , भन्नाट टाळ्या वाजवायसारखे संवाद जर एखाद्या मसाल्यासारखे घातले तर हेच कथानकाचे सुरण कसे सुरण कबाब बनते हे बघणे मजेदार आहे.
आपल्या ( म्हणजे अरबाझच्या- अशी म्हणायची पद्धत आहे  ) मलायका अरोरा - ' मुन्नी बदनाम हुई - मै झंडूबाम हुई ' आयटम साँग घेऊन थेटर कसे  डोक्यावर घेता येईल याची काळजी घेतात
 तेरे मस्त मस्त दो नैन, हून दबंग  ही गाणी सुद्धा अगदी श्रवणीय आहेत
सोनू सूद या नव्या चेहऱ्याने आपली डावी भूमिका चोख बजावली आहे . बाकी सर्व ठीक .. आता मी बाकीच्या लोकांबद्दल जास्त सांगितले तर भाजिपेक्षा कढईचे कौतुक केल्यासारखे होईल . 
चित्रपटाची जाहिरात बऱ्याच दिवसापासून सर्वत्र धडाक्यात चालू होती आणि वोन्तेड चित्रपट हिट झाल्यापासून सलमानबद्दल प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आज जवळ जवळ सल्लू भाईनी  पूर्ण केल्या आहेत.
 'वान्तेद' इतकी जास्त रक्तरंजित दृश्ये नसल्यामुळे हा चित्रपट सुखावह वाटतो. शिवाय सवंग प्रसिद्धी साठी अश्लील दृश्ये बरबटलेले संवाद असे यात काही सापडणार नाही त्यामुळे आपण कुटुंबाबरोबर बिनधास्त हा चित्रपट बघू शकतात.सलमान खान हां यामध्ये  अत्यंत लक्षवेधी भूमिका साकार करतो अणि कदाचित हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील एक चांगला चित्रपट म्हणावा लागेल .
.चित्रपट हा मनोरंजन करण्यासाठी असावा त्यातून आपला तीन तास टाईमपास व्हावा ,अशी माफक अपेक्षा असणा-या प्रेक्षकांना हा चित्रपट पर्वणी आहे आणि तो नक्कीच सुखावून जाईल. रमजान च्या या लॉन्ग वीकेंड साथी दबंग हा शीर्खुर्म्या सारखा मेजवानी ठरेल हे मात्र नक्की 
बाकी आपण प्रत्यक्ष पाहून ठरवावे ...

जयदीप भोगले 
 
 
   
 
 

Thursday, September 9, 2010

कोण होतास तू ...काय झालास तू.. बातमी छापण्या विसरून गेलास तू

गेले दोन दिवस मी लोकसत्ताचा मुंबई  अंक पाहतो आहे . आणि मला आश्चर्य वाटले ते त्याचे मुखपृष्ठ पाहून ...

पहिल्या पानावर फक्त जाहिराती ... महाराष्ट्रातील बातम्यांना , ज्वलंत विषयांना आता उघड करण्याची गरज उरली नाही कि अचानक सगळे ज्वलंत प्रश्न थंड झाले त्यामुळे आपल्याला  छापावे असे वाटत नाही.
मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता असल्यामुळे जाहिरातीबद्दल मला तितकीच आस्था आहे . कदाचित त्या मिळाल्याशिवाय माध्यमांना चालवणे त्यांना जास्तीत जास्त चांगले बनवणे हे कठीण आहे याची मला संपूर्ण कल्पना आहे. पण हे म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले ... अशी गत झाली .
लोकसत्ता या बद्दल मला विशेष आदर आहे . कदाचित या प्रकारामुळे माझा आदर कमी झाला नाही पण हे त्यानी  केले याबद्दल खेद जरूर वाटतो
या घटनेचा विचार मला संपादकीय आणि जाहिरातदार या दोन बाजूनी करावा वाटतो . संपादकीय बाजूने तर मुखपृष्टावर प्रमुख बातमी सोडून जाहिरात असणे म्हणजे वृत्तपत्रीय संस्थेबद्दल अनास्था दाखवाण्याजोगे वाटते. आणि जाहिरातदारांना आज जरी वाटत असेल कि अशा पद्धतीने त्यांची प्रसाधने, नाव हे लोकांच्या लक्षात येईल तर कुठेतरी गल्लत होईल . कारण जाहिरात ही  योग्य त्या संपादकीय वातावरणात छापल्यास ती नकळत वाचली जाण्याचा जास्त संभाव असतो . जर तुम्ही पहिल्या पानावर जाहिराती त्याही  ४ ते ५ जाहिरातदारांच्या .. तर एक ना धड असे मानून वाचक तडक दुसरे पान उलटत असेल.
शिवाय मी असे ऐकले आहे की जाहिरातदार पहिल्या पानावर जाहिरात देण्यासाठी आगाऊ रक्कम मोजतात आता जर सर्वच जाहिराती असतील तर त्यांनी ज्यादा रक्कम देणे सयुक्तिक वाटत नाही.आता कदाचित गणपती जवळ असल्यामुळे कदाचित त्यांना हा निर्णय घ्यावा लागत असेल पण सण संपल्यानंतर जाहिरातदार, भटाला दिली ओसरी ... असे ही वागू शकतात आणि तसे न वागल्यास त्यांच्या नंतर छापल्या जाणार-या जाहिराती वाचक दुर्लक्षित करू शकतात कारण पहिल्या पानावर थांबण्याची त्यांना सवयच राहणार नाही .
लोकसत्तामधील संपादकीय गुणवत्ता, त्यातील बातम्या देण्याचा दृष्टीकोन , भाषा या बद्दल मला कुठलाही रोष नाही कारण मला तो आजही तितकाच आवडतो चतुरंग ही पुरवणी आणि संपादकीय पान हे तर न चुकावण्यासारखे असते. पण आपल्या श्रद्धास्थानाबद्दल काही न पटणारी घटना घडली तर वाईट वाटते आणि यातूनच अशा प्रतिक्रिया निर्माण होतात. बातमी वाहिन्यांवर चालणारी बंडाळी आपण जाणतोच त्यामुळे वृत्तपत्र माध्यमांनी कुठेतरी संहिता बाळगावी नाहीतर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी वाचकांची अवस्था होईल  
आपल्याला  असा अनुभव आला आहे का कधी? असल्यास जरूर कळवा ... कळावे
 


मौन



जब मौन बोलने लगता है
तो अनकही से एक कहानी शुरू होती है
एक ख्वाब की हकीकत से टक्कर होती है
एक लब्ज की नज्म से यारी होती है
                  
जब मौन साज छेड़ता है
तो बारिश की हर बूँद गाने लगती है
हर सांस की लय गुनगुनाने लगती है
दिल की धड़कन कुछ सुनाने लगती है

जब मौन देखने लगता है
तब सूरज सी चमक आने लगती है
एक तमस के बाद सुबह मानो शरमाने लगती है
एक आँखों की किरन प्यारी लगने लगती है

पर ये मौन जब खामोश रहता है
मन ही मन में तकरार शुरू होती है
सच और झूठ में दीवार खड़ी होती है
एक मुस्कान में आसुंओ की लड़ी बुनी होती है

इसीलिए मौन बोले तो अच्छा है
उसका साज छेड़ना ही सच्चा है
उसकी एक नजर काफी है
एक जिन्दगी बीतने के लिए ये बहाना अच्छा है

जयदीप भोगले
२९/०५/०५

Wednesday, September 8, 2010

साया

 परछाईयो के इस बाजार में
कोई साया अलग होता है
कुछ  धूप से बिखर जाते है
मगर कोई सच्ची तसबीर होता है

फूलों के इस शहर में
कोई गुल अलग होता है
किसी की छुहन भी चुभती है
मगर किसी के कांटो से भी मीठा दर्द होता है

                                    
                                      नजरों के इस कमान में
कोई तीर अलग होता है
कोई टकराके टूट जाते है
मगर कोई दिल चीर देता है

अब किसको क्या बताये
कब कारवाँ में  कोई अकेला  होता है
कोई जिन्दगी के साथ ख़त्म होता है
मगर किसी के साथ एक पल भी जिन्दगी होता है

जयदीप भोगले
२९-०४-०५

युद्ध










गवाक्ष्याच्या पलीकडून नयनतीरानी मला घायाळ करशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
      
प्रेमवीरानी नेहमी निडर असावे मग लोकांच्या नजरा चुकवीत तू वार का करावे 
  मी निधड्या छातीने तुझ्यासमोर  आहे एकाच रामबाण कधी सोडशील का
    ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का

शीतयुद्धात कधी प्रश्न सुटत नसतात
त्यात बरेचसे तीर आपल्यालाच बोचत असतात
मनाच्या अश्वावर आरूढ़ होऊं
कधी सामोरे मला जाशील का
     
 अशी मनात  धुमसत राहू नकोस
      आग लावलीच  आहेस तर एकटीच जळत राहू नकोस
           एकदाच अशी पुढ्यात येउन द्वंद्व कधी करशील  का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
                                        
 युद्धात आणि प्रेमात बरेच कही साम्य असते
                              म्हणुनच दोघाना सर्व काही क्षम्य  असते
                               मी समर्पनास  तयार आहे ,
                                तुझ्या प्रेमात कधी अमर मला करशील  का
                               ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का


 जयदीप भोगले 
१२.१०.२००२

Tuesday, September 7, 2010

गुलाबी हलचल


एक रुकी हुई जिंदगी
जब समय पे सवार होती है
एक साहिल पे पड़े पत्थर में
लहरों से दरार होती है
कोयले की खदान में
जैसे हीरे से निखार होती है
उसी तरह किसी गुलाबी हलचल के आने से
जिन्दगी में बहार होती है
                              
                          
                                एक सहमे हुए सच से
                                जैसे झूठ की हार होती है
                                 एक दबी हुई आवाज से
                                 कभी ख़ामोशी बेजार होती है
                                 एक झुकी हुई नजर में भी
                                   तलवार की धार होती है 
                                 उसी तरह किसी गुलाबी हलचल के आने से
                                  जिन्दगी में बहार होती है
एक गर्म सांस से 
ठण्ड में भी जलन होती है
एक मीठे अहसास से भी
कड़वाहट में मार होती है
एक सुहानी याद से भी
जिन्दगी की कहानी बन जाती है
उसी तरह किसी गुलाबी हलचल के आने से                
   जिन्दगी में बहार होती है 

          
जयदीप भोगले
१४/०४/०५

    

Monday, September 6, 2010

मास्तर



एक दीपस्तंभ जनसागरात जळतो
तो अखंड आयुष्य वाट दाखवतो
कुणी त्याची वाटाड्या म्हणून हेटाळणी करतो
तरी कुणी सहानुभूती म्हणून 'मास्तर' म्हणतो
रक्ताचे पाणी करून तो लोकांना शिकवतो 
    पण तरीही लोक म्हणती मास्तर भारी फसवतो
    कुणी त्याची ५०० रुपये म्हणून किंमत करतो
  तरीही दरवर्षी काही मास्तरांना ' आदर्श शिक्षक ' हा
   कागदी  फुलांचा गुच्छ  जरूर मिळतो 
        
     पण मास्तराच्या मनाचे कोण विचारतो
    त्याच्या निष्काम उपासनेबद्दल दखल कोण घेतो
                                      डॉक्टर इंजिनिअर ला बनवणारा मूर्तिकार हा नेहमी मुर्तीमागेच लपतो
                                                     पण त्याच्या मूर्तीची मात्र आपण फार वाहवा करतो
मास्तर हा नेहमी अल्पसंतोषी राहतो
मूर्तीची वाहवाच आपले गुणगान मानतो
चिंतनाचा पुजारी हा पण शाळेतच बंद राहतो
शाळेच्या घंटेबरोबर आपले घड्याळ लावून घेतो
एका नवीन पिढीच्या शिल्पासाठी खडू हे हत्यार हातात घेतो 
जयदीप भोगले
१९-१०-९९  

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...