तुझा गाव सोडतो आहे
तू नसशील परी मन तुझा निरोप घेऊ पाहे
आता दिसणार नाही ती साउली
फ़क्त स्वप्नात शोधणार आहे
आयुष्याच्या उंब-यावर जणू तुझी वाट पाहणार आहे
मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल झाली
आता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे
तू काचेच्या महालात मी फुलांच्या कुंपणात आहे
दोघे जणू मुक्त पण मन बंदिवान आहे
आता विचार नको प्रिये काय होते काय होणार आहे
जुनी पाने गळतात तेव्हा नवीन पालवी येणार आहे
जयदीप भोगले
१० मे २००२
No comments:
Post a Comment