तुझ्या डोळ्यांच्या दुनियेत आज मला सगळे विसरावे वाटते
आठवलेच तर आपल्या पहिल्या भेटीच्या आईसक्रीम ची चव अनुभवावी वाटते
क्षण न क्षण नेहमीच अवीट राहिला
तू जवळ नसताना सुद्धा श्वास तुझाच राहिला
माझ्या रागाला तुझ्या प्रेमाची फुंकरच आवरू शकेल
तुझ्या किनाराच माझ्या मुक्त लाटेला सावरू शकेल
आज ना ती सुवासिक बकुळीची फुले नाहीत गुलाब आणले
बस हृदयातील दोन शब्द कवितेत माळून तुला वाहिले
जयदीप भोगले
१४.०१.२०११
कसा रे गड्या झाला, कुणी रे गड्या केला, राधे तुझा सैल अंबाडा!
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेचा मतितार्थ कळला नाही .. माझ्या ब्लॉग वर आल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteवाचत राहा . कळतील अशा प्रतिक्रिया देत रहा