या गोष्टीला एक १५ वर्ष झाली असतील ... मी इंजिनीरिंग च्या फर्स्ट इअर ला होतो .. आमचे कॉलेज एक मोठा कॅम्पस होता .. १२० एकर चा ..त्यावेळी रॅगिंग ही बरेच असायचे .. डिसेंबर चे दिवस
आमचे पहिल्या युनिट टेस्ट चे दिवस होते . परीक्षा कधी असणार केव्हा होणार सर्व डेट बोर्डावर लागल्या होत्या .. आणि युनिट टेस्ट नंतर आम्हाला नाताळ च्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यावेळी इंटरनेट रिजर्वेशन वगैरे भानगड नव्हती त्यमुळे रीतसर २ तास कुरतडून ,चिडून, घामेघूम होऊन आम्ही आमची तिकिटे १५ दिवस अगोदरच काढली होती .. नेत्रावती एक्स्प्रेस . कॉलेज ला अडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदाच घरी जाणार असल्यामुळे ते तिकीट रोज एकदा उघडून दहा वेळा पाहून पाहून होत होते .. उगाच वाटायचे की कदाचित लवकर दिवस संपतील आणि तो दिवस जवळ येईल ..असेच दिवस अभ्यासात, रॅगिंग सहन करत मी टेस्ट ची वाट पाहत होतो .. अभ्यास करत होतो का नाही ( आठवत नाही ) न बोललेले बरे
शुक्रवारचा दिवस तो .. केरळ मध्ये असल्यामुळे थंडी वगैरे नव्हती पण थंड गार वारा नारळाच्या झाडांमधून येऊन ओशट वाटत होता ... आम्हाला शनिवार रविवार सुट्टी होती .. इंजिनीरिंग ची मुले अभ्यास किती करतात याची कल्पना सगळ्या इंजी नरांना असेलच ...असो . तर आम्ही सगळी मित्र मंडळी शुक्रवार असल्यामुळे एकत्र ३२४ रूम मध्ये होतो .. मी निखील श्रीकांत गौरव सुनील कश्यप आणि हं संतोष असे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो .. सुरवातीला रॅगिंग,नंतर येणारे सिनेमे , डंब शेरॅट आणि हळू हळू रात्र झाल्यानंतर मुलांचा आवडीचा विषय ( मुली नाही ) भुतांच्या गोष्टी चालू झाला . मग राजस्थान मध्ये दुधू च्या हाय वे वर कसे चकवे असतात
हळू हळू .. सगळेजण जवळ जवळ सरकून हळूच शालीमध्ये शिरून आखडून घेऊन सगळ्यांची हवा टाईट होते आहे हे दाखवू लागली ..
मग मधेच मुन्नालाल मीना एकदम रात्री १.३० वाजता अळोके पिळोखे देत रात्री उठला आणि त्याने आमच्या रूममध्ये डोकावून त्याच्या टिपिकल स्टाइल मध्ये विचारले ' आज सोना नाही क्या .. ये घाटी लोग बडे पढ रहे है .. ..मग संतोष ने एक शिवी हासडत त्याला सांगितले. हमने किताब क्या ? फुल्या फुल्या ...xxx .. तो रात्री ज्या कारणाने उठला होता त्यासाठी तडक बाथरूम च्या दिशेने पळाला.. एक हशा पिकला.
मग एक विषय निघाला प्लानचेट .. त्यावर चर्चा झाली .. श्रीकांत नागपुरी भाषेत' साले मजाक मत करो इधर पहले ही कबसे मुतने जाना है लेकीन जा नाही राहा हु' मग त्याला फट्टू वगैरे चिडवून झाले .. सगळ्यांनी मग उसने अवसान आणून सार्वजनिक मुत्र विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला .. आणि रूम मध्ये येताच लाईट गेले
केरळ मध्ये पावर कट नेहमीचे होते पण आजचा पावर कट जरा जास्तच सिचुएशन ला साथ देणारा होता . मग निखील .. " शीट यार मेरेको पढने का था " तितक्यात गौरव डोक्यावर मेणबत्ती घेऊन " कही दीप जले कही दिल करत आला .. आणि मग संतोष ने एक बॉम्ब टाकला .. तुम्हाला माहित आहे मला प्लॅनचेट येते? .. मग थोडा हशा .. कोणी... सही मे? क्या ?मजाक मत कर... असे सर्व उद्गारवाचक प्रश्न चिन्ह दाखवीत सगळेच अचंभित झाले होते
मग त्याने एक कॉईन आणले एका पेपरवर ए ते झेड अक्षरे १ ते ९ आकडे एका ठिकाणी येस एका ठिकाणी नो असे काढून एक पट तयार केला .. सगळ्यांना हे नवीन होते त्यामुळे त्याला हे जमते हे हळू हळू वाटायला लागले होते. मग ती मेणबत्ती पटाच्या मधोमध ठेऊन तो डोळे मिटून कॉईन वर हात ठेवून ध्यान धरून बसला .. सगळे शु शु करत गप्प बसून अंधुक प्रकाशात तो अनुभव घेऊ लागले .. २.३० वाजले होते
मग अचानक संतोष चा हात लवकर लवकर फिरू लागला .. कदाचित कोणी तरी स्पिरीट आले होते वाटते ..
मग त्याने सांगितले तुझे नाव सांग ... त्याने ...हळू हळू एका एका अक्षरावर नाणे नेऊन सांगायला सुरवात केली
त्याचे नाव अनप्पा आहे हे कळले ..आम्हाला वाटले केरळ मध्ये पंजाबी भूत थोडीच येणार .. ट्रेन चे तिकीट तर मिळायला हवे ना ...
मग संतोष म्हणाला आता याला हवे ते विचार मग आम्ही हळू हळू आम्हाला जी माहिती आहे ते विचारायला चालू केले आणि ब-याच वेळा उत्तर खरे येऊ लागले .. आम्हाला आश्चर्य आणि भीती एकत्र वाटू लागली
मग आम्ही उगीच त्याला जे आम्हाला नक्की माहिती आहे ते विचारावे आणि भुताची परीक्षा घ्यावी असे ठरवले ...
मी आणि श्रीकांत यांनी हळूच म्हटले याला विचारू आम्ही घरी कधी जाणार? .. १७ डिसेंबर ची तिकिटे झालेली होती १७ ला टेस्ट संपणार होती तरीही विचारले ..
त्याने हळू हळू कॉईन फिरवायला चालू केली .. आकड्यावर कॉईन आली .. १ आणि नंतर मी कंटाळलो म्हणून उठायला लागलो तोच श्रीकांत म्हणाला अबे ये ३ पे क्यो आ रहा है ?
त्याच्या मते आम्ही १३ ला घरी जाणार होतो .. पण परीक्षा १३ ला चालू होणार तर कसे १३ ला जाणार बर सर्व मुले मध्यमवर्गातून असल्यामुळे टेस्ट नक्कीच देणारी होती .. आम्ही पुन्हा एकदा विचारले तरीही तेच उत्तर आले १३ डिसेंबर .. चार वाजले होते .. सुनील पेंगाय लागला होता .. संतोष म्हणाला अरे स्पिरीट गेले चार वाजल्यानंतर ते थांबत नाही .. गौरव म्हणाला... क्यो उसको ३.५६ दादर लोकल पकडना रहता है भाजी बेचने ? संतोष म्हणाला मैने ऐसेही सिखा है मानना है तो ठीक ..
मग सगळे त्याचा विचार करत करत कधी झोपलो कळले नाही .. हळू हळू दिवस लोटले .. टेस्ट जवळ आली होती .. पहिलीच परीक्षा असल्यामुळे उत्कंठा आणि भीती दोन्हीही होती ..
सिनिअर- ' फेल हो गया तो बहुत पिटेगा अशी दमदाटी करून अजून टेन्शन देत होते .
. १३ डिसेंबर आला ... पहिला पेपर मेकॅनिक्स होता पेपर बरा होता ..पास नक्की होऊ खात्री झाली .. पेपर १२ वाजता संपणार होता ..
मी १५ मिनिटे लवकर पेपर दिला आणि होस्टेल वर येत होतो .. अचानक दोन तीन मुले होस्टेलच्या जिन्यावर पळताना दिसली .. लगबग नेहमीची नव्हती .. मी सुद्धा वर पळालो आणि १०- १२ मुले ३३३ रूम च्या समोर उभी होती मी पळालो .. पहिले ते दृश्य ना विसार्ण्यासारखे आणि भीषण होते .. एक मुलगा पंख्याला लुन्गीने लटकला होता जीभ बाहेर आली होती .. होस्टेल वार्डन सुद्धा पळत आले सगळयांना त्यांनी हाकलायचा प्रयत्न केला पण कुणीही जागचे हलले नाही . मी थोडे पुढे जाऊन पाहिले की कोण मुलगा आहे आणि धक्का बसला .. माझ्या शेजारी , बेंच वर बसणारा अजित नावाचा मल्याळी मुलगा होता .. त्याने लटकून आत्महत्या केली होती.
त्या नंतर त्याच्या खोलीत असणा-या दोन रूममेट ना हलवण्यात आले .. त्या रूम मध्ये उदबत्त्या लावल्या होत्या ..त्या उदबत्त्याचा वास मला अजूनही काटा आणतो
हळूच सगळी मुले होस्टेल वर आरडा ओरडा करायला चालू झाली की आम्हाला इथे राहाचे नाही .. परीक्षा पुढे ढकला आमची मनस्थिती ठीक नाही .. मग प्रीन्सिपोल आले आणि त्यांनी परीक्षा पुढे ढकलून नाताळच्या सुट्टीनंतर ५ जानेवारीला ठेवल्या ..
सगळे जन ब्यागा भरून तयार झाले होते .. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळ जवळ सर्व होस्टेल रिकामे झाले होते .. आम्ही आमचे १७ तारखेची तिकिटे कॅनसेल करून जनरल डब्यात बसून नेत्रावती एक्स्प्रेस ने प्रवास चालू केला
आम्ही सगळे त्या प्लॅनचेट च्या भुताच्या भाकीतामुळे सुन्न झालो होतो .. त्याची भुताटकी कुणाचा प्राण घेऊन आम्हाला घरी पाठवणार होती हे कळले असते तर कदाचित हे कधीच होऊ दिले नसते .
संतोष अचानक म्हणाला यार गलती झाली ... मी प्लान चेट चे नाटक केले होते त्या दिवशी भूत फीत कोणी आले नाही .. मला माहित होते की आपण १७ ला जाणार म्हणून मी १३ ही तारीख ठोकून दिली होती ...
मग बाकीची उत्तरे?? .. बस क्या यार आपण दोस्त लोक ना आपल्याला एकमेकांच्या गोष्टी माहित नसतात का.. हसावे का रडावे तेच कळेना ..
या अगम्य जगात बरेच योगायोग होतात तसा हा भयानक योगायोग झाला होता .. मला राहून राहून अजित त्याचे पालक , परीक्षांचे टेन्शन का अजून काही असे अनेक प्रश्न येत होते...
थोड्याच वेळात सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या चालू केल्या ... ' आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू ' आणि आमच क्षणिक सुतक मागे पडले ...
.जयदीप भोगले
.
मस्त लिहिलंय..! आवडलं लिखाण!
ReplyDeleteआभारी आहे .. कथा लिहिण्याचा पहिला प्रयत्न आहे ..
ReplyDeleteवाचत रहा
1 no gr8 I liked it very much
ReplyDeleteTHRILLING!!
ReplyDeleterahul
ReplyDeleteआभारी आहे .. बहुतेक मला कथा लिहायला हव्यात
Bharich Mitra.. Ajun Lihit ja..
ReplyDeletevery nice story.
ReplyDeleteछान कथा आहे..
ReplyDelete