Friday, June 23, 2017

जुमेरात ची इफ्तारी .... सुखन











दर रमजान मध्ये काही मुंबईकर खास वेळ काढून मोहमद अली रोड ला जातात आणि मालपुआ कबाब यावर मनसोक्त ताव मारतात.काही जण खास दिल्ली आग्रा फतेहपुर सिक्री आणि “शहर ए तहजीब” लखनऊ ला भटकतात या सगळ्या जागी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मुगल मुगलाई आणि त्या  काळापासून वाढलेली एक मधुर अशी भाषा उर्दू !!!
काही जणांना आजकाल उर्दू म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजाची भाषा आहे असा गैरसमज आहे
तर काहीजण “फ्रेंच माझी सेकंड लँग्वेज आहे” असे म्हणून त्यांना सगळ्या  आपल्या भाषा घरकी मुर्गी आहेत
म्हणूनच का काय ही उर्दू एकदम मोडी जवळ जाऊन बसली आहे . मोडीत काढणे म्हणजे काय याचा अर्थ मला हळू हळू समजू लागलाय
१९७० १९८० मध्ये उर्दू आपल्या काही सिनेमातून जिवंत राहिली . साहिर साहेब व मजरूह साहेब यांनी तिला थोडे गुणगुणत ठेवले. १९८० नंतर जगजीत सिंग व पंकज उधास यांनी गजल मधून ही आम करून दिवाने खास मध्ये तरी खिळवून ठेवली. पण आता उर्दू आजकालच्या ओढून ताणून बनवलेल्या संवादात धडपडत असते . इर्शाद व मुकर्रर याचे “ शॉर्ट फॉर्म” नसल्यामुळे whatsaap मधून सुद्धा तिची हकालपट्टी होते
या अशा इतक्या मधूर व खुसरो ने “ अमीर “ केलेल्या उर्दू ला वाचवायला “ सेव्ह टायगर “ असा उपक्रम  सुद्धा करता येत नाही त्यामुळे संस्कृत मोडी उर्दू या ... आपल्या पूर्वजांच्या फोटो प्रमाणे धूळ खात पडतात. आपण वर्षामधून त्यांचे पितारांसारखे दिवस सुद्धा घालतो म्हणा !!!


तर अशी ही उर्दू एखादि  मराठमोळी  मंडळी आपल्या समोर आणतात असा म्हणालो तर तुम्ही मला कदाचित वेड्यात काढू शकाल पण या अशा औलिया लोकांचा लौकिक प्रयत्न म्हणजे “ सुखन”
हा काल मी ठाण्यात गडकरी रंगायतन ला पाहिला . बुक माय शो मधून परीक्षण वाचून गेलो होतो तरीही तिथला अनुभव म्हणजे पावसाची कविता वाचणे आणि पावसात भिजणे यात काय फरक असतो  इतका सुंदर व जिवंत होता
सुखन मधले प्रत्येक कलाकार अगदी (सारंगी व हार्मोनियम सहित)  म्हणजे  गजल बनवण्यासाठी लागणाऱ्या शायरी मध्ये जसे  रदीफ काफिया वजन असं काहीतरी लागतं म्हणतात व त्याच्या हव्या तितक्या प्रमाणात असण्यानेच एक आविष्कार घडतो तसे आहेत .
 मग मखमली आवाजाची अवंती पटेल असो कि सुफी अंदाज असणारा जयदीप वैद्य.प्रत्येक कलाकार आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. या कार्यक्रमाचे दोन कलाकार म्हणजे शरीर आणि आत्मा असल्यागत आहेत ते म्हणजे ओम भूतकर आणि नचिकेत . पुणेरी श्रीखंड खाऊन इतक्या उच्च प्रतीची उर्दू कोणी बोलू शकतो  याची देही याची डोळा प्रचीती घायची असेल तर ही कलानिर्मिती पाहणे एकदम Must!! आहे
जसं गर्द हिरवळीची मजा घेत  आपल्या धुंदीत जगण्यासाठी स्वतः वनस्पत्तीशास्त्रज्ञ असण्याची गरज नसते तसच “सुखन” पाहताना उर्दू यावीच अशी नक्कीच अट नाही व गरज तर नक्कीच नाही
इरूवर सिनेमामध्ये मला ऐश्वर्या राय ची तमिळ “ न समजता” जितकी गोड वाटली तितकीच प्रत्येक गजल व कव्वाली (उर्दू फार जास्त  न समजता ) मला तितकीच हविहवीशी वाटली.
हे या कार्यक्रमाचे परीक्षण म्हणून मी नक्कीच लिहिलेले नाही .  काही लोक या जगात किती चाकोरीबाहेर जाऊ शकतात  त्यांना किमान पहावं ,त्यांचे कौतुक करावं व त्यातून एक निखळ आनंद मिळवावा, व जमलं तर त्यांच्यासारखं आपणही कधी वेडे व्हावं  म्हणून लिहिलं आहे
उर्दू म्हंटल कि गालिब, मीर, मोमीन इतकच काही जणांना आठवत पण यांच्या खजिन्यात अशी असंख्य रत्न आहेत  तर आज म्हणे ते दिनानाथ मंगेशकर पार्ल्यात सुखन घेऊन येतायत ... तर तुम्ही अवश्य जा खुल जा सिमसीम म्हणा !!! आणि जमल नाहीच तर हे सुखनवर मुंबई व पुण्यात असेच येत राहो अशी सदिच्छा तर नक्कीच असू देत
है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे
कहते है के “ ओम भूतकर” का अंदाजे बयान और

जयदीप भोगले

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...