Wednesday, March 7, 2018

माध्यमे आणी बोली भाषांचे वाढते महत्त्व


पूर्वी साहित्य म्हटले की प्रमाण भाषा, शुद्ध भाषा किंवा पुणेरी भाषा असेच गृहीत धरले जायचे
मग त्या साहित्यात फक्त कविता ,कथा कादंबरी नाही तर टेलिव्हिजन युगात कार्यक्रम आणी
सिरिअल सुद्धा बनवल्या जायच्या.
ज्याप्रमाणे पुस्तकांमध्ये नवसाहित्य, मुक्तछंदात्मक कविता ,सामाजिक लेखन, दलित साहित्य
अशी हाताळणी विविध लेखकांनी केली ती तितक्या सहजपणे टीव्ही नवीन आल्यावर सहज
येऊ शकली नाही.
टीव्ही हे कदाचित नवीन माध्यम असल्यामुळे त्यात येणारे कलाकार त्यांना अप्रोच होणारे
निर्माते कलाकार हे सगळे पुण्या मुंबईचे असायचे . टीव्हीवर दूरदर्शन ही एकच वाहिनी
असल्यामुळे साहजिकच त्याचा सर्वप्रथम प्रसार व उपलब्धता ही याच शहरांमध्ये झाली
व या लोकांपर्यंत पोहीचतील असेच कार्यक्रम निर्मात्यांनी बनवले .
हे कार्यक्रम गुणवत्तेनुसार नक्कीच उत्तम होते यात काही शंका नाही पण सर्वसामान्य जनतेच्या
बाजू मांडणारे त्यांच्या घरचे वाटणारे कार्यक्रम कमीच किंवा विरळ असायचे.
आता मी लहानपणी “चाळचाळ नावाची वाचाळ वस्ती “हा कार्यक्रम आवडीने बघयचो पण
आमच्या गावातले जीवन व या शहरी जीवनात खूप फरक असायचा . मला त्यावेळी नक्कीच
चॉईस नसल्यामुळे मी सर्व पाहत होतो पण त्याकाळात बाकी बोली भाषेत नवीन कार्यक्रम
लोकप्रिय होऊ शकतील असे बऱ्याच जणांना कदाचित वाटलेच नाही
मराठी सिनेमा मध्ये सुद्धा ग्रामीण म्हणजे फक्त कोल्हापूर पुरते मर्यादित होते पण महाराष्ट्रात
28 जिल्हे आणि किमान 6 ते 7 अगदी भिन्न म्हणता येतील अशा बोलीभाषा असून सुद्धा
त्याबद्दल त्याचा विचार कधी झाला नाही
पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये प्रसार माध्यमे व चित्रपट यामध्ये बोली भाषा व त्यांचे सौन्दर्य
त्यातील खास विनोद ,त्या भागातील व्यक्तिविशेष या सर्व गोष्टींचा जास्त सखोल विचार होऊ
लागला आहे
नोकरी व शिक्षणानिमित्त लोकांचे होणारे स्थलांतरण , टीव्ही ची सहज उपलब्धता, जुन्या
साहित्यामधील नावीन्य चा अभाव व कालाबाह्यता , आणी इतर महाराष्ट्रातून येणारे कलाकार
व त्यांना जनतेने दिलेली पसंती या सर्व पूरक कारणामुळे अशा पद्धतीने नवीन प्रयोग यशस्वी
होऊ शकतात याचा निर्माते व चॅनेल चे कार्यकारी निर्माते व चित्रपट निर्माते यांना वाटते आहे
हा बदल महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण भारतभर याचा प्रभाव होतो आहे असं मला गेल्या दहा
वर्षांपासून नक्कीच जाणवत आहे

मी 2005 ला पाहिलेला खोसला का घोसला ने दिल्ली मधल्या खास भाषा शैलीला सुरेखपणे
हाताळले होते. मी दिल्लीत शिक्षणानिमित्त असल्यामुळे अशी भाषा मी जवळून अनुभवलेली
त्यामुळे त्याचे खास कौतुक व authenticity नक्कीच मला जाणवली .
मग ओंकारा, बंटी आणि बबली , बँड बाजा ते अगदी अलीकडच्या दंगल पर्यंत प्रत्येक भाषा
आणि तिथल्या व्यक्ती आणी वल्ली आपण पाहत आहोत पसंत करत आहोत.
धाकड म्हणजे काय हे शब्दशः समजले नाही तरीही सिनेमामध्ये असलेल्या वातावरणात
आपल्याला उमजून जाते आणि याला प्रमाण भाषेतला पर्यायी शब्द कोणता हे आपण विचारत
नाही
हाच धागा ना आना इस देस लाडो , अफसर बीटीया, बालिका वधू ते थेट तारक मेहता या हिंदी
मालिकांमध्ये सुदधा हाताळलेला आपल्याला दिसला असेल
मराठी मालिका हा माझा स्वतः चा जिव्हाळ्याचा विषय ...यात सुद्धा असे कित्येक प्रयोग
यशस्वी पद्धत्तीने झी मराठी ने सुद्धा केलेले आहेत
अवंतिका पासून ते रात्रीस खेळ चाले व तुझ्यात जीव रंगला पर्यंत तिने केलेला प्रवास हा
बोलीभाषेने माध्यमात केलेला प्रवास दाखवतो
सैराट हा इतका ग्रामीण भाषेचा सिनेमा असून सुद्धा 100 करोड चा टप्पा गाठू शकतो याचे श्रेय
निर्माते यांनां तर द्यावेच लागेल पण बोली भाषा प्रमाण भाषेतकीच लोकांना आवडते याचा एक
हा मैलाचा दगडच आहे की काय असे म्हणावे लागेल.
अमेरिकन संस्कृती आणि ब्रिटिश संस्कृती मध्ये सुद्धा स्कॉटिश व कृष्णवर्णीय बोलीभाषा
तितक्याच सशाक्तपणे प्रमाण भाषेबरोबर जाऊन बसलेल्या आपल्याला दिसतात
म्हणूनच की काय आजकाल तरुण पिढीला want पेक्षा waana जास्त जवळचे वाटते हे बोली
भाषेचे जिव्हाळ्याचे नातेच म्हणावे लागेल
पण मराठी मध्ये खूप मस्त आणि उत्कृष्ट हे शब्द लै भारी ने कधी रिप्लेस होतील का हे मात्र
कदाचित येणारी वर्षे ठरवू शकतील.
मकरंद अनासपुरे , भारत गणेश पुरे, संकर्षण कराडे, भाऊ कदम ही सर्व वेगवेगळ्या बोली
भाषा बोलणारी पण तितकीच लोकप्रिय मंडळी बोली भाषांचा झेंडा फडकवत ठेवताना
दिसतात. यांच्या अभिनयाबरोबर आपण बोली भाषेचे सुद्धा कौतूक करायला हवे.
धातू ज्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात कार्बन घातल्यास पोलाद ते अगदी बीड बनतो पण दोघे
तितकेच उपयोगी व सुंदर असतात .अगदी तसेच शुद्ध अशुद्ध भेद न ठेवता प्रत्येक भाषा हा
वेगळ्या धातूच्या रुपाप्रमाणे मानला तर नक्कीच त्याचे सौंदर्य जास्त उत्तम पद्धतिने कळू
शकेल.

लेखनामध्ये काही मर्यादा येण्यामुळे बऱ्याचदा वर्तमानपत्रे अजूनसुद्धा बोली भाषेचा वापर
लेखामध्ये करत नाहीत पण व्हिडीओ माध्यमे ही जास्त प्रभावी असल्यामुळे ती ही जबाबदारी
उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत
येत्या काळात आपण एखादी सामाजिक चर्चा न्यूज वाहिनीवर सुद्धा मराठवाडी भाषेत पाहू
शकलो तर मला त्यात काही गैर वाटणार नाही
भाषा ही माणसाच्या मनातले लोकांना समजण्यासाठीच असते आणि ती वेगळ्या बोली
भाषांतील शब्दसिद्धीमुळे जास्त समृद्ध होऊ शकते
ज्याप्रमाणे दोन राग मिश्र राग बनवू शकतात तसेच दोन बोली भाषा या नक्कीच नविन मिश्र
भाषा तयार करू शकतात मग त्याला आपण जसे अनवट रागानां स्थान देतो तसे त्या भाषेला
सुद्धा दिले तर काय हरकत आहे
अगदी पनीर टिक्का पिझ्झा असं काहीतरी बनू शकते आणि तो किती छान लागतो हे मी
तुम्हाला नक्कीच सांगायला नको
-- 
जयदीप भोगलेटीप हा लेख  मराठी कल्चरस अँड फेस्टिव्हल या इ दिवाळी अंकात छापून आला होता

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...