काही वाटा अशा असतात कि त्यांचा अंत होत नाही
पण पुन्हा त्यावर जाता खुण कधी मिळत नाही
काही व्यक्ती अशा भेटतात कि मन हेलावून जातात
पण निघून गेल्या तरी मनात घर करून जातात
काही थेंब असे असतात कि नेहमी विरून जातात
पण विरल्यानंतर वेडे डोळ्यातून गळत राहतात
काही आशा आशा असतात की नेहमी पल्लवित होतात
पण न सांगता खट्याळ त्या निराशेला घेऊन येतात
काही शब्द असे असतात की वेलीसारखे लांबत जातात
पण वाढल्यावरच कळते की कविता ही फुलत असतात
जयदीप भोगले
१५ सप्टेम्बर १९९९
No comments:
Post a Comment