Friday, December 16, 2011

सवयीचा गुलाम



मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे
           गुन्हेगार ती माझ्यापेक्षा ,
 एकटेच मी का मरावे
जर  मी अपराधी बेधुन्धीचा 
मग पाण्याने सुरा का बनावे 
देव म्हणतो श्रद्धा ठेवा
मग दगडात त्याने का लपावे
मीरेला जर विष देती दुनिया
कृष्णा तुझसी का पूजावे
सवाल माझा सवयीला या,
श्वासाला का सवय म्हणावे ?
असेल जर ती सवय जगाची
श्वास आणि जग मग बंद पडावे .
मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे


जयदीप भोगले 
१५.१२.२०११ 

Tuesday, March 8, 2011

उलझन या सुलझन



लग्न कदाचित स्त्री च्या आयुष्यातला सर्वात रोमांच आणणारा क्षण .. कदाचित हे आरेंज मंरेज साठी जास्त लागू पडेल ..
पण जेव्हा स्त्री आपले सर्व आप्तेष्ट सोडून एका नवीन संसारात जाते त्यावेळी लग्न कुठल्या पद्धतीन झाले त्याला कदाचित काही महत्व आहे ..
अशा लग्नाच्या आधीच्या रात्री नव वधू च्या मनात काय विचार येत असतील हे या हिंदी कवितेत लिहण्याचा प्रयत्न मी केला होता
ऐन तारुण्यात , पुरुषाचा जन्म घेऊन अशी कल्पना करणे मला खरच खूप अवघड गेले .. कवितेचा प्रासाद तितका चांगला आहे का नाही ते आपण ठरवाल .. पण मला हि कविता  माझा एक वेगळा प्रयत्न म्हणून खूप जवळची आहे .. आवडल्यास प्रतिक्रिया .. न आवडल्यास चर्चा  नक्की आवडतील ..

जे डी



किस सोच मे पडी है आज तू 
जा रही है कल परदेस
पराया हो जाएगा बाबुल का घर
अपनाना है पिया का देस




कितनी ख़ुशी की है यह घडी
पर समय क्यों नहीं बताती है ये 'घडी'
विचारमंथन में अटकी हूँ मै
दुल्हन का अहसास जी रही हूं मै

हर्षोल्हास में है  रिश्ते मेरे
पर जीवन की शुरवात है मेरी
हर्षित पराये क्यों है सारे
लहरा रही फुल की मालाएं
चमक रही है साड़ी दिशाएं 
लाडोरानी थी इस घर की मै
संवारना होगा मुझे पहनके लाज का भेस

एक सपने जैसी है कल की भोर 
मंगल वादन होगा चारो ओर
सात फेरे कल चलूंगी मै
जिसके दम पे जीवन यात्रा आरम्भ करुँगी मै

सुशोभित होंगे सारे
सजायेंगे मुझे मेरे अपने प्यारे
मेहँदी भी कल रंग लाएगी
मोती की माला भी चमक जायेगी
पर क्या जीवन का हल होंगे ये सारे
इस प्रश्न ने किया है मन में प्रवेश 

एक अजनबी के साथ
बसर करना है मुझे 
परमेश्वर की प्रतिमा होगा क्या वह
या मानूंगी मै पति परमेश्वर उसे
सुहाने सपने सभी के मन को प्यारे
पर सपने यूँही सच होते है क्या सारे 
क्या इसका मुझे हो सकेगा अंदेश ?

स्वर्ग का सपना सभी को रहता है
पर स्वर्ग आज तक किसने देखा है
यह आजमाना है मुझको
जब मै करुँगी मै एक नया गृहप्रवेश 

एक जीवन की शुरवात है ये
ये है एक मेरे मन की बंदिश
एक स्त्री को तरल मन का सन्देश
दुल्हन बनूँगी मै 
हो जाएगा देस .... परदेस 
पराया होता ही है बाबुल का घर
अपनाउंगी  मै पिया का देस 

जयदीप भोगले 
२९/०६/९९


Thursday, March 3, 2011

..वॅक्सीऩ (कथा )



वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक पोलिसाच्या चेह-यावर दिसत होती .
'मला अभिनव सपकाळ ला भेटायचे आहे' ती उद्गारली ...
 बाई त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही  मीनलकडे न बघता हवालदार म्हणाला  .. पण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर  आहे .. बाई कशाला त्या नागाला भेटता आहात ..खुनी आहे तो आणि ते सुद्धा तीन तीन 
पाणीप्रश्न , भ्रष्टाचार , नवीन सिनेमे ,इकडे लक्ष द्यायचे सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या वार्ताहराने इकडे यायचे आणि उगीच फुकट वेळ घालवायचा .. शासनाचा आणि तुमचा .. 
बर आता तुमच्या शासनानेच पत्र दिले आहे ना... मग सोडता का मला मीटिंग रूम मध्ये ? बर तुमच्या झडती वगैरे फोर्म्यालिटी  करून घ्या .. तसे आम्हाला आमचे पेन हे शस्त्र पुरेसे असते साहेब आणि मी शस्त्र बाळगत नाही ..
घुगे बाई , बाईंची झडती घ्या आणि त्यांना मीटिंग रूम मध्ये बसवा आणि त्या अभिनव सपकाळ ला आणा आणि हो... बेड्या तशाच ठेवा लई बाराचा आहे तो .
परब हवालदार दुरून मीनलचा  आढावा घेत, तंबाकू चोळत  कोठावळे हवालदाराला म्हणाला ..' आयला बाई वरपासून खालपर्यंत कसा आयटम बॉम्ब आहे आणि म्हणते की माझ्याकडे काही शस्त्र नाही ' 
मीटिंग रूम मध्ये दोन लाकडी खुर्च्या आणि एक मोठे टेबल होते दोन खुर्च्यामध्ये बरेच अंतर .. एक छोटा ६० चा दिवा आणि तो जवळजवळ १५ फूट उंच त्यावर सुरक्षा टोपी आणि जाळी लावलेली ..
एक पंखा ... आयुष्याची शेवटची घटका मोजत असल्यासारखा फिरत होता 
..बाई बसा .. आणि हो नुसते बसा आरोपीच्या जवळ वगैरे जायचे नाही .. तशी ऑर्डर आहे ... 
साहेब मी एक जबाबदार नागरिक आहे .मला माझे काम करायचे आहे ..मी गप्पा मारयला नाही आले सपकाळ कडे ..मीनल पोलाईट अशी हळुवार बोलली . ' नाही म्हटले नियम सांगितलेला बरा'... परब टोपी सावरत म्हणाले .
अभिनव आला .. मिनलच्या बरोबर समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला ...
 हातात बेड्या .. चौकडा शर्ट , जीन्स , चौकोनी मेटल फ्रेम  चष्मा. ..पोलीस कोठडीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळे  थोडीशी खुरटलेली दाढी ..५ फुट १० इंच उंची .. सोल्जर कट केस कापलेले ...स्थिर दृष्टी आणि
 चष्मा नाकाला खाली आल्यानंतर थोडेसे वर करण्याची सवय . कुठल्याही माणसाला हा बाहेर भेटल्यास हा एक हुशार सी ए  किंवा इंजिनीअर आहे असेच वाटले पाहिजे आणि टी डी एच कॅटेगरी मध्ये येणारा असल्यामुळे 
ब-याच मुलीनाही तो हवा हवा वाटेल असा ... हा मनुष्य खुनी .. काही पटत नव्हते
एम एस सी बायो केमिस्ट्री फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव सपकाळ खुनी ... काही मनाला पटत नव्हते म्हणून आले ..' हाय 'आय अॅम...'.... मीनल जोग ना? अभिनव उद्गारला ..
तुम्हाला माझे नाव कसे माहिती? मीनल थोडी आश्चर्याच्या धक्का लागून न दाखवता म्हणाली .. अहो माझे शिक्षण तुम्हाला माहिती .. मार्क माहिती .. मग मला तुमच्यासारख्या पब्लिक फिगर  चे नाव नको माहिती ?
पण मी एक वार्ताहर आहे दर वर्षीचा युनिवर्सिटी चा  निकाल मला माहित असतो .. आणि तडफदार लोकांबद्दल माहिती ठेवणे हा माझा छंद आहे .. अभिनव पुटपुटला ..
असो अभिनव मला तुझी कहाणी ऐकायची आहे ... मला अजूनही विश्वास बसत नाही की असे काही घडले असेल .. मी अॅडवोकेट परांज्प्यानाही ओळखते त्यांना मी ही केस समजावून सांगते .. 
जर जगातून एक हुशार माणूस  या सिस्टीमच्या हलगर्जीपणामुळे जाणार असेल तर माझी लढ्याची तयारी आहे ...
थ्यांक यु मीनल तो एकेरीवर आला ...खरे म्हणजे एक खुनाला फाशी आणि दोन  खुनाला तर नक्कीच मिळणार म्हणून मी अशा सोडून दिली होती .. पण तू आलीस आणि आधार वाटला .. फील सो रील्याक्सड ..
पण अभिनव यात तू अडकलास कसा .. आय मीन सिस्टीम मध्ये पाणी मुरते पण कुणालाही ती खुनासाठी नक्कीच पकडत नाही ...
मीनल मी एम एस सी झालो आणि काहीतरी करावे जगाला काहीतरी द्यावे याने झपाटून उठलो .. मी एका ग्यारेज मध्ये एक छोटी प्रयोगशाळा चालू केली .. रात्रंदिवस तिथे पीपेट आणि ब्युरेट माझे मित्र बनले ..
एक शोधाने मी झपाटून गेलो होतो. जेवायची शुद्ध नव्हती. आणि तो दिवस उजाडला .. मी माझे रिसर्च पूर्ण केले होते ... प्रयोग यशस्वी झाला होता...
कुठला शोध ?  ' अभिनव ने इकडे तिकडे पाहत हळूच मीनल ला सांगितले याबद्दल कुणाजवळ सुद्धा बोलयचे नसेल तर मी सांगतो कारण सध्या हे फक्त मलाच माहित आहे ..
मीनलची उत्कंठा वाढत होती ...ट्रस्ट मी आणि तुझ्याकडे कदाचित ऐकून घेणारे आणि पोहचणारे अजून कुणी आहे असे मला वाटत नाही ..
अभिनव हळूच म्हणाला .. मी एक ..वॅक्सीऩ तयार केले आहे ...... कसले .?..अॅन्टी वायरस ...  जे  कुठल्याही वायरसपासून  तुम्हाला प्रोटेक्ट करेल ..तुम्हाला मुक्त करेल अशी संजीवनीच समज ना...
मीनल आवक होऊन त्याकडे पाहत होती ... अॅन्टी जीवाणू  औषधे ..वॅक्सीऩ  आहेत पण हे जरा विचित्र आणि अभिनवच होते ...
हे मग तू कुणाला प्रेजेंट का  केले नाहीस . त्यातच प्रोब्लेम झाला मीनल ...आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला
मीनल ला काही समजेना .. तिने शांत राहूनच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला ..एक पाच मिनिटानंतर त्याने पुन्हा बोलायला सुरु केले 
मी गिनिपिग वर ते प्रयोग केले पण मला माणसावर तो प्रयोग  करायचा होता . मी माझ्यावर तो केला असता पण त्यावेळी जर काही घडले तर उपाय करायला कुणी असायला हवे म्हणून मी माझ्यावर केला नाही.
एके दिवशी मी रात्री मानखुर्द हून परत येत होतो .. स्टेशनवर उतरलो .. सामसूम होती ..एक तरुण मुलगा मला दिसला ... तो चालत होता त्यावेळी मी म्हणालो सेक्टर २१ ला जाताय का ? तो म्हणाला नाही १९ ..
मी म्हणालो आपण बरोबर चालत जाऊ या का ? मला कुत्र्यांची जाम भीती वाटते ... मग आम्ही चालता चालता कळले की तो कॉल सेंटर मध्ये कामाला होता ...
मग त्याला मी माझी कथा सांगितली आणि हळू हळू जर प्रयोग यशस्वी झाल्यास त्याला रीतसर मानधन देण्याची कबुली दिली .. मुलगा तयार झाला  ... तो माझ्याबरोबर  आला .. मी रूम वर आलो आणि त्याला बसायला सांगितले हळूच मी सिरींज आणि फ्रीजमधून ..वॅक्सीऩ  काढले ... छाती धडधडत होती ...त्याला दिले आणि त्याला हळू हळू अंधारी यायला लागली .. मी त्याला विचारले कसे वाटते आहे ? तो म्हणाला खूप झोप येते आहे ..
मग हळूच त्याच्या खिशाकडे माझे लक्ष गेले .. मला एक हाताने वळलेली सिगरेट दिसली .. मला त्यात हशीश होते हे कळायला वेळ लागला नाही .. 
मी त्याला बाहेर पोहचवले आणि घरी जायला सांगितले .
सकाळी उठलो तर रस्त्यावर बरीच गर्दी होती पाहिले तर रात्रीचा मुलगा होता .. तो मरून पडला होता ... मला कळून चुकले होते .. की त्याच्या ड्रग घेण्यामुळे ..वॅक्सीऩ  ने काम केले नव्हते आणि कदाचित ड्रग ओवरडोस मुळे त्याचा मृत्यू झाला होता ..
मी घाबरलो आणि तिथून निघून गेलो ... कदाचित मी खून केला आहे असेच लोक समजतील म्हणून मी ती जागा सोडली ... काही ..वॅक्सीऩ बरोबर घेतल्या ..
सेक्टर ४९ मध्ये घर घेतले .. तीन महिन्यानंतर पुन्हा प्रयोग चालू केले एका गायीवर आणि कुत्र्यावर केले आणि ते यशस्वी ठरले .. पुन्हा मला माणसाची गरज होती जो याला तयार होईल ..
एकदा पनवेलहून रात्री येत होतो ... उतरलो आणि चालू लागलो ... गाडी सायडिंग ला जाणार होती .. अचानक मला लेडीज डब्यात एक वेडसर बाई दिसली .. तिने मला पाहताच वडा पाव वडा पाव असे ओरडायला चालू केले..
मला वाटले हीच एक संधी आहे .. ही काही ड्रग घेणारी .आजारी दिसत नाही . वेडाचा सबंध मेंदूशी ... मी हळूच माझ्याजवळ असलेले चिप्स काढले आणि तिला दिले ..
ती अधाशासारखी तुटून पडली .. मी हळूच सिरींज आणि ..वॅक्सीऩ  काढले .. आणि तिला दिले .. २० मिनिटानंतर तिला चक्कर यायला लागली .. माझ्या ..वॅक्सीऩ  दिल्याचा अर्धा प्रयोग यशस्वी झाला होता.
हातावर एक फोड आला होता.. मला प्रयोग यशस्वी वाटला ...आणि नंतर अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली ... मी तिला ओब्सर्व करायला सुरु केले ...तिचा श्वास  बंद पडू लागला होता..
अचानक तिच्या डोक्याला ती   झटके देऊ लागले .. आणि ती बहुतेक गतप्राण झाली ..
दोन्ही वेळी माझ्या ..वॅक्सीऩ मुळे काही न होता त्यांच्या आजारामुळे मला अपयश आले होते ..मी घाबरून पळ काढला पण सिरींज तिथे होते ..
काही महिन्यानंतर पोलिसांनी मला पकडले आणि आता मी कोठडीत आहे .. 
मीनल चे डोके सुन्न झाले होते दोन तास कधी संपले ते तिला कळले नाही .. ती तडक तिथून उठली  आणि चालू लागली..
तुम्ही तरी विश्वास ठेवाल वाटले होते .. अभिनव आशेने म्हणाला ...पण तिने परत मागे पाहिले नाही ..
दोन दिवसांनी ती परत पोलीस चौकीवर आली .. यावेळी ती जास्त निर्विकार आणि ठरवून आल्यासारखी वाटत होती ...
तिने पुन्हा फोर्म्यालिटी केल्या .. परवानगी मिळवली .. अभिनव यावेळी जास्तच भयानक वाटत होता .. त्याला कदाचित थर्ड डिग्री मिळाली होती .. रक्त साकळल्यासारखे  वाटत होते.
त्याच्याकडे पाहून  तिने एक स्मित केले आणि म्हणाली .. अभिनव आय अॅम विथ यु .. मी दोन दिवस विचार  केला नेटवर माहिती काढली ...तुझा शोध जगापुढे पोहचवणे आवश्यक आहे ... मला सांग मी कशी मदत करू शकते .. मी माझ्यावर प्रयोग करायला तयार आहे .. पण अभिनव म्हणाला मला बेड्या आहेत .. आणि ..वॅक्सीऩ  घरी आहे .. पोलिसांनी घर सील केले आहे ...
ती म्हणाली ते माझ्यावर  सोड .. मी उद्या परत येईन .. तुझी सुटका माझ्यावर लागली .. आणि जगाच्या पुढे शास्त्रज्ञ आणण्याचे क्रेडीट माझे ...दोघांनी एक स्मित केले 

सेक्टर ४९ च्या खोलीकडे मीनल गेली ... आढावा घेतल्यावर कळले .. पोलिसांनी दरवाजा सील केला होता पण खिडकी नीट बंद नव्हती तिने हळूच ती उघडली .. फ्रीज समोर होते . वार्ताहराच्या जीवनातला सर्वात थरारक क्षण ती अनुभवत होती . तिने खिडकीला हलवले आणि दोन गज गळून पडले .. मुंबईच्या पावसाने आणि खा-या हवेने तिचे काम सोपे केले होते .. खिडकी गंजलेली होती ..
तिने आत चढून व्याक्सिन आणि सिरींज घेतली पर्स मध्ये टाकली .
दुसरा दिवस एक ऐतिहासिक ठरणार होता .. तिला झोप येत नव्हती .. कसे बसे झोपून सकाळी १० वाजता तिने पोलीस चौकी गाठली ...
परब कोठावळे हवालदार आता मीना जोग ला जणू ओळखायला लागले होते .. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी झडती वगैरे झटपट होऊन गेली ...
आधी मीटिंग रूम च्या शेजारी उभ्या राहणा-या    कॉन्स्टेबल  घुगे  बाई इकडे तिकडे टंगळ मंगळ करत होत्या  .
अभिनव आला ... आज तो बराच बारा दिसत होता .. डोळ्यात कसली तरी चमक वाटत होती . तो तिथे बसला ..
मीना जोग ने कन्सेंट बरोबर लिहून आणले होते .. हा प्रयोग ती स्वखुशीने करत आहे हे त्यात नमूद होते ... पण कुठे ना कुठे अभिनव वर विश्वास बसला होता ..
तिने अभिनवच्या मार्गदर्शनाने व्याक्सिन सिरीन्ज्मध्ये घातले आणि आपल्या उलट्या हातावर च्या शिरे मध्ये हळूच सोडले .. अर्ध्या तासासाठी चक्कर येणार हे तिला माहित होते .. यामुळे ती चक्कर आल्यावर निषींत होती ..पण अभिनव ने तिला विचारले ... आता कसे वाटते आहे ?
 ती म्हणण्याच्या अगोदरच तो म्हणाला आता तुला हळू हळू सुन्न वाटू लागेल आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल..',मीना  आयुष्याच्या  शेवटच्या क्षणी सगळ्यांना  असेच होते'  अभिनव थंड पणे उद्गारला 
 ... हे वाक्य ऐकताच तिला धक्का बसला .. तिन हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरीर अधू वाटू लागले होते. अभिनवच्या चेह-यावर एक आसुरी आनंद यायला लागला होता ... अत्यंतबेडरपणे त्याने हसायला चालू केले 
आणि म्हणून लागला ' इनिस्पेक्टर सांवत ने मला सांगितले होते की त्यांच्या चौकीत आता आलेला खुनी फासावर गेल्यावर  सुटका होते .. तू २ ३  लोकंना विनाकारण आपल्या विकृत मनोवृत्तीने मारुन टाकले आता बघू कसे मारशील ?'
 मी बाहेर कुत्री गाई माणसे मारली .. मी म्हणलो होतो ना त्यांच्यावर प्रयोग केला ....
मी मनाशी ठरवले होते .. 'आयला   पोलीस कोठडीत मारण्यात एक वेगळेच थ्रील आहे' ...आणि या वाक्याने मीनल ने हंबरडा फोडला .. पोलीस गोळा झाले .. सिरींज पाहिल्यावर मीनल जगणार नाही हे त्यांना कळून चुकले होते..
३ खून करणा-या नराधम अभिनव ला चौथ्या खुनानंतर सुद्धा  एकदाच फाशी होणार होती .. कदाचित मनोरुग्ण म्हणून त्याला असायलम मध्येच जिवंत ठेवावे लागणार होते ..
परब यांना मी शस्त्र बाळगत नाही या मीनल च्या वाक्यावर खूप वाईट वाटले .. आणि त्यांनी मनाशी म्हटले बाई तुम्ही शस्त्र नाही  ठेवले पण एका खुन्यावर विश्वास ठेवला ..खुन्यावर विश्वास ठेवला  

जेडी 
३ मार्च २०११ 

या कथेतील ठिकाण आणि पात्र या सर्व काल्पनिक आहेत ..कृपया यावरून कुठलाही ग्रह माणू नये किंवा विचार करू नये 

Tuesday, March 1, 2011

इंजिनीअर ची गोष्ट

मित्रांनो , कधी कधी वैफल्य फ्रस्ट्रेशन चांगली रचना घडवून आणते याचा मला प्रत्यय आला .
ही कविता मी दोन भागात जवळ जवळ ६ महिन्याच्या गॅप मध्ये लिहिली .. पुण्यात आलो तेव्हा सुरवातीला अट्टहास म्हणून आणि नंतर साफ्टवेअर मध्ये मंदी म्हणून नोकरी मिळत नव्हती .. म्हणजे तसा योग नव्हता ..
आणि मग मला एक माझ्या अवस्थेचे विडंबन लिहावे वाटले ..ते लिहले ... पहिला भाग नुसता निगेटिव आहे आणि नंतर अगदी सहा महिन्यानंतर मला एका कंपनी मध्ये नोकरी मिळाली आणि त्याच दिवशी याचा अर्धा भाग पूर्ण केला जो एकदम उमेदीचा होता 
कविता हिंदी मध्ये केली होती आवडली तर प्रतिक्रिया नक्कीच पहायला आवडेल ..

एक लड़के ने आज अखबार देखा
तो नौकरी का एक इश्तिहार देखा
लड़के के मुह पर चमक सी आई
कहा ' बहुत दिनों के बाद फ्रेशर की कोई अॅड आई '
     
इंजिनीअर था वो होनहार था
बस एक साल से बेकार था 
आज का दिन मानो त्यौहार था
तो क्या हुआ की खाने का आज इतवार था 

उसने झट से दाढ़ी बनायीं
दो तीन बार डिग्री झटकाई
कहीं से तो एक कमीज लायी 
और कहा' बहुत दिनों के बाद फ्रेशर की कोई अॅड आई '

गया वो दौड़ के उस जगह पर
पर भीड़ लगी हुई थी वहां पर
उसने रेजुमे की कॉपी टेबल पर रखवाई
तो रिसेप्शनिस्ट ने कहा अरे ?
अभी तो है रिजल्ट की सुनवाई 
तुने अर्जी लेट से तो रखाई 
मगर कोई सिफारिश नहीं लायी 
वो बोला चलो , इसी बहाने कंपनी देखने की तो नौबत आई 
और कहा' बहुत दिनों के बाद फ्रेशर की कोई अॅड आई '

वापस अपने घर जाने देखा
पर पेट था सुखा सुखा 
तभी उसने एक वड़ापाव वाला देखा
दबी आवाज में वो बोला ' एक वड़ापाव देना यार'
   वड़ापाव वाला गुराया ' खाना नहीं खाया  या आया है बुखार '
तो लड़का बोला अरे मै इंटरव्यूव  देने आया था
कुछ सपने लेकर आया था
यहाँ तो जगह पहले से भर गयी 
क्या ख़ाक फ्रेशर की अॅड  आई 

वड़ापाव वाला बोला
अरे यार क्यों हो बेकार ?
वड़ापाव की ठेली दाल और पब्लिक को पुकार
कमाएगा हजार हजार .
इंजिनीअर बोला मै ' इंजीनिअर ' हूँ 
देश का होनहार हूँ 
अगर ठेला ही डालना था 
तो भला इंजिनीअर क्यों बनना था 

अरे मगर ये डॉक्टर ने ठेली लगायी है
तो इंजिनीअर की क्या औकाद आई है
मैंने तो क्लिनिक भी इस ठेली के बाजू में लगायी है
अगर वडे से पेट दर्द हुआ दवाई भी रखाई है
बेकार रहने में तेरी क्या भलाई है 

तभी लड़का चौंक गया
कहा ' मै अकल का अँधा था बन गया '
तुने मेरी आँख खुलवाई 
तेरी ठेली पे कोई वेकंसी  है मेरे भाई ?
अरे .. मैंने रिज्यूमे की कापी भी है लायी 

वड़ापाव वाला चिल्लाया 
अरे गधे तू कभी सुधरेगा या नहीं
नसीब ऐसा तेरा कभी खुलेगा नहीं
तू बिखारी भी बन जाएगा 
क्या किसी बिखारी के लिए भीख मांगेगा ?
जब तक खुद कुछ नहीं करेगा
पैसे के लिए मारा मारा फिरेगा
जब तू क्यु में  खड़ा रहेगा
क्यु में ही मरता जाएगा
कभी खुद बिजनेस करेगा 
अपने लिए  क्यु बनवाएगा ..
शायद खुद  फ्रेशर का इश्तिहार देगा ...

इंजिनीअर के बात अब समझ में आई
उसने डिग्री पे वड़ापाव रखाई
और मन ही मन में कहाँ  
' आज फ्रेशर की चमकती किस्मत है आई '
कोई डिग्री को रद्दी में ले लो भाई 
सब बेकारों को बधाई हो बधाई 

जेडी
१५/०१/२००२  
आणी २६ /०६/ २००२  





Monday, February 28, 2011

अमर चित्रकथाकार .. अजरामर झाले


http://www.afaqs.com  यांच्या संकेतस्थळावरून 

 प्रसिद्ध चित्रकथाकार , अंकल पै .. म्हणजेच अनंत पै यांचे २५ फेब्रुवारी ला तीव्र हृदय विकाराने निधन झाले .. आणि त्यांनी ८१ वर्षी आपले  अमर चित्रमय जीवन यात्रा संपवली ..
अनंत पै हे भारतातील अग्रणी कथाकारांपैकी एक आणि ज्यांनी हिंदू  पौराणिक कथा , लोककथा यांना शहरी बाल गोपाळापर्यंत नेण्याचे मोलाचे कार्य केले .. आजीआजोबाना पारख्या झालेल्या नातवांना अमर चित्र कथेमधून  आपल्या संस्कृती आणि पौराणिक साहित्याचे दालन त्यांनी खुले करून दिले .इंग्रजी माध्यमाच्या प्रसरामुळे भारतीय कथा कालबाह्य होऊ लागल्या होत्या  त्यावेळी असा प्रयत्न आपल्या साहित्याबद्दल   नितांत  प्रेम असलेला व्यक्तीच करू शकतो. 
नुकताच त्यांना व्यंगचित्रकथाकाराचा जीवन गौरव पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला . पण हे कर्णाच्या औदार्याबद्दल सामान्य जणांनी कौतुक केल्याजोगेच आहे .
पै यांनी १९६७ साली इंडिअन बुक हाउस च्या सौजन्याने अमर चित्रकथा मालिका सुरु केली आणि नव्याने आपल्या थोर पुरुषांची लोक कथांची आणि पौराणिक समृद्धीची गोष्टीरूप चित्रे मुलांसमोर आणली ..
आणि या अमर चित्र कथेची संकल्पना त्यांच्या मनात येण्याची मोठी गमतीदार वाटणारी गोष्ट आहे .. एकदा पै यांनी एका क़्विज कार्यक्रमात पहिले कि मुले ग्रीक पुराणकथा आणि इजिप्तच्या लोककथांवर आधारित प्रश्न जास्त उत्तमरीत्या हाताळत होते त्याची उत्तरे देत होते आणि त्यांना भारतीय कथांबद्दल अगदीच माहिती नव्हती .. यात आपल्या कथा चांगल्या नाहीत असे नव्हे तर त्या मुलांपर्यंत पोहचत नाहीत हे  त्यांना कळून चुकले .. सर्व साहित्य बोजड आणि कादंबरीरुपात असेल तर त्याबद्दल आकर्षण हे मुलांना वाटणारच नाही आणि आपसूकच ते इतर साहित्याकडे आकर्षित होतील ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती  आणि त्यांनी पौराणिक चित्र कथांना अमर केले .
अमर चित्र कथेच्या जन्माआधी त्यांनी टाईम्स मध्ये इंद्रजाल कॉमिक्स मध्ये ही काम केले . मानव या कॉमिक्स चा प्रयत्न सुरवातीला  त्यांच्याकडून यशस्वी होऊ शकला नाही.
आता अमर चित्रकथा २० भाषांमध्ये वर्षाकाठी ३० लाख प्रती वितरीत करते नव्हे तर कदाचित किमान ३० लाख लहानग्यांना आपल्या संस्कृतीबद्दल त्यांच्या शब्दात जवळ आणण्यचे काम करत आहे ..
http://www.amarchitrakatha.com/ 
कर्नाटकात जन्मलेल्या पै यांना वयाच्या अवघ्या दुस-या वर्षी पोरके व्हावे लागले होते .. त्यामुळे आजी आजोबांच्या आणि वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीरूप कथांची मायेची उब काय असते हे त्यांना कधी समजले नाही पण त्यांनी सर्व भारतीय मुलांना ती उब ती मजा काय असते हे आपल्या अमर चित्र कथेमधून सांगितले ..
अशा महान कार्य करणा-या काकांना मानाचा मुजरा .. 
 आपल्या  सर्वाना यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती अमर चीत्र्काठेच्या  संकेत स्थळावर नक्कीच  मिळू शकेल. पण आपण अनेकदा जगातल्या पुष्कळ चांगली कार्ये  आपल्या कामाच्या रगाड्यात विसरून जातो त्यामुळे  हा लेख लिहावा असे वाटून गेले ..
      जेडी ..



Thursday, February 24, 2011

उ:शाप (कथा )

नुकताच  इंजिनीरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता  आर ई सी त्रिची मध्ये अॅडमिशन मिळाल्यामुळे जामच खुश होतो .. तसे पुण्याच्या वी आय टी मधून ती कॅनसेल केल्यामुळे पुणेरी शालजोडीतून बरेच मिळाले होते .कोथिंबीर वडी आणि मिसळ सोडून कुठे तो सांबर भात खायला जाणार आहेस .. पुणेरी मुलींची सर येणार आहे का ? वगैरे मी म्हणालो ' मायला ' तिथे कमीत कमी काळी सावळी ललना पाहायला तरी मिळेल इथल्या पुणेरी स्कार्फ मध्ये ललना आहे का .. 'चल ना' कसे कळणार त्यामुळे मला काही गम नाही
.
१९ वर्षात आल्यामुळे एखादी मैत्रीण असावी हे नेहमीच वाटे पण नेहमी मनात मांडे खाणे इतकाच धंदा ..
कॉलेज ला गेलो  काही दिवसात माझा वाढदिवस जवळ आला २३ ऑक्टोबर ... बर १९९६ मध्ये मोबाईल वैगरे विरळेच आणि असले तर कॅमुनिकेशन च्या सेमिनार मध्ये बघायला मिळायचे .. एस टी डी चे रेट अचाट असायचे त्यामुळे पत्रांची वाट पहावी लागायची .. फुटकळ कार्ड आल्यानंतर सुद्धा इतका आनंद व्हायचा  की की सांगू .....
 तर २३ ऑक्टोबर... सकाळ झाली मुलांनी विश केले . घरचे फोन येऊन गेले .. दुपारी जेव्हा जेवायला होस्टेल वर आलो तर एक ग्रीटिंग आले होते .. नाव कुणाचे नव्हते ...ग्रीटिंग उघडल्यावर सुद्धा फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या एक स्मायली काढले होते .. मला अंदाज येईना .. की माझा वाढदिवस इतका कुणाला माहिती? ...कारण लहानपणी मित्रांना जोपर्यंत माझा आज वाढदिवस आहे हे सांगितल्याशिवाय कळायचे नाही .. आणि लहान गावात ग्रीटिंग वगैरे फॅड अजून यायचे होते .. मला आठवी पर्यंत बिस्कीट चे पुडे आणि पेन्सिल याच्याशिवाय काही गिफ्ट मिळाले नाही ..आणि आज हे निनावी ग्रीटिंग .. मित्रांना खाद्य मिळाले .. एकाने मग लिंबाच्या रसाने काहीतरी त्यावर लिहले असेल इतके डोके लाऊन ग्रीटिंग अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला ..
श्रीकांत म्हणाला लपंडाव सिनेमा सारख्या तीन फुल्या सुद्धा नाहीत आणि तीन बदाम सुद्धा ... मी म्हणालो हा सिनेमा नव्हे ..
मग सगळे करमचंद बनून ग्रीटिंग कुणाचे यावर तर्क वितर्क करू लागले ... मग निखील ने एक नामी आयडिया काढली... स्टॅम्प कुठला आहे तो पहा मग आम्ही पोस्टाच्या स्टॅम्प  शोधणे हे सर्वात अवघड काम करू लागलो ..
मग एकाने भिंग आणले आणि पुसटसे काहीतरी लातु असे काहीतरी दिसले आणि मग कळले की आपल्याच गावाहून आले .. मग उधार घेऊन रात्री १/४ चार्ज झाल्यावर मित्रांना फोन झाले पण पत्ता लागेना 
पण इतके कळले की आपण एकाच्या लिस्टवर जरूर आलो ..

मग  दिवस गेले ( दिवसामागून )  नाताळच्या सुट्ट्या मध्ये घरी आलो एका कप्यात आपल्याला ग्रीटिंग देणारी व्यक्ती कोण याचा विचार होताच ...
मग एके दिवशी एका फॅमीली फ्रेंड च्या घरी गेलो त्यांची मुलगी नुकतीच १२ वी ला गेली होती .. तिची विचारपूस आणि मग आर ई सी ला कसे जायचे ते सांगितले .. ती गालातल्या गालात हसत होती .. तिला म्हटले की की झाले मग तिने सांगितले की माझी एक मैत्रीण तुमच्या घराच्या शेजारी राहते मग मी कोण वगैरे विचारले आणि तिने सांगितले की  रीमा ... मी म्हणालो ती होय  हां .. फार घाशीराम कोतवाल आहे ती फार अभ्यास करत राहते मला आठवले की मी जितका १० वी मध्ये अभ्यास करायचो ती सातवीत करायची .. माझ्याकडे अभ्यासाला येऊन बसायची आणि मला टी वी पहा , झोप ये .. असले व्हायचे जाम राग यायचा ... 
मग तिला विचारले हं  तिचे काय ?    तिला एक मुलगा आवडतो .. मी म्हणालो आयला काय सांगतेस?
 .. मी म्हणालो ती कोणाला आवडेल? .. कारण ती अतिशय काळी होती ..तिचे लग्न होईल तिचा स्वभाव चांगला असेल वगैरे ठीक पण किशोर वयातल्या पहिल्या प्रेमासाठी तिची कुणी निवड करणे खरेच कठीण होते .. याला ' सो  मिन' म्हणा की वस्तुस्थिती  पण असेच  काही होते
ती माझी मैत्रीण वगैरे कधीच नव्हती पण शेजारी , हुशार , अति अभ्यासू ( घाशीराम ) म्हणून मला ती चांगलीच माहिती होती .. ... 
मग मिनू  ने सांगितले कदाचित तिला तू आवडतोस  म्हणजे जरा पाणी जास्तच डोक्यावरून चालले आहे .. ती वर्गात अभ्यास करत नाही . दहावीला मेरीट येऊन १२ विला चांगल्या कॉलेज ला सोड पण बी एस सी ला प्रवेश मिळणे कठीण .. मला वाईट वाटले पण वाईट वाटले तरी यात मी तडजोड नक्कीच करू शकत नव्हतो .. मला जरा हुरळून गर्व सुद्धा झाला .. की आपल्याला भाव आला वगैरे ... 
मग काही दिवसांनी मी धाडस करून तिच्या घरी गेलो .. तिच्या डोळ्यात कामातून गेल्याच्या सर्व झलका दिसत होत्या ..
मी उगीच काकू आहेत का वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला .. पण तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता ... तिला मी मग उसने अवसान होऊन विषय काढला .. २० व्या वर्षी असली हाताळणी करणे कठीण आहे पण मग हळू हळू तिने अभ्यासाला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे वगैरे सांगितले .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. पण मला डोक्यावरून पाणी जाताना दिसत होते .. पिच्छा सोडवायचा एवढाच विचार होता .. मन वैगरे खोली मोजलीच नव्हती .. मी तिचा निरोप घेतला . आता त्यांच्या घरी सुद्धा चुकून जायचे नाही हे ठरवले होते . एकतर्फी प्रेमाची कत्तल करून मी विजयी वीर होऊन मित्रांना पीछा छुडाया  वगैरे सांगत होतो ..
काही वर्ष लोटली .. एफ एम एस ला आलो दिल्ली मध्ये .. दिलफेक स्वभावामुळे चिकार मुली आवडल्या पण प्रेम वगैरे जमले नाही .. २५ आली होती जरा परिपक्व जालो होतो .. कुठेतरी प्रेम शोधावे म्हणून विचार करत होतो
आपण दिसायला चांगले आहोत .. हुशार आहोत बोलयला बरे आहोत वगैरे डोक्यात ठेऊन मला प्रेमाच्या दुनियेत एखादी फटाकडी नाही तर छानसी तरुणी नक्कीच भाळेल असे उगाच वाटायचे .. 
प्रेमात दिसण्याला , पैशाला , स्वभावाला काही महत्व नसते कदाचित लग्नाच्या विश्वात असेल .. हे मला कधी कळलेच नाही ...
आणि कॉलेज मध्ये एक तमिळ मुलगी मला आवडाय लागली .. ती माझी प्रोजेक्ट मेट होती नंतर आमच्या होस्टेल वर यायची आणि मग .. तीच हवी हवीशी वाटाय लागली .. मला दिसणे , स्वभाव असल्या सगळ्या गोष्टींचे हसू यायला लागले .. कारण मी गोरा ती कुरूप यात मोडणारी. मी रोड ,ती बेढब  मी शांत ती तापट असले सगळे भिन्न प्रदेश एकत्र येऊ पाहत होते .. पण मला कदाचित फक्त आमचा सहवास आमची मैत्री आमचे मनप्रत्येक गोष्ट घडल्यानंतर तिची साथ इतकेच दिसायचे .. यात शारीरिक आकर्षणाला थारा नव्हता ..
आणि एक दिवस अचानक  हळू हळू ती माझ्याशी अचानक तुटक वागू लागली .. मला कळेचना का ? मी पुष्कळ प्रयत्न केले .. पत्र जाऊन  मोबाईल चा जमाना आला होता .. कित्येक एस एम एस केले पण तिने मोबाईल उचलणे बंद केले 
मी अस्वस्थ होऊ लागलो .. आणि एकदा परीक्षेच्या दिवशी तिने मला सांगितले .. मूव ऑन यार .. तू फक्त मित्र होतास .. आणि आता  तुझ्या अशा वागण्यामुळे मला मित्र सुद्धा वाटत नाहीस .. मला तुझी भीती वाटते 
तू अभ्यासावर लक्ष दे आयुष्य तुझ्या पुढे आहे ... माझ्या डोळ्यातले पाणी आपोआप बाहेर येऊ लागले ...
मी केलेली एकतर्फी प्रेमची कत्तल आता माझच खून करू पाहत होती ..मला प्रत्येक दिवशी  तरुणपणात रंगावरून डावलून, भावनांना महत्व न देणा-या माझी आठवण झाली ..
कदाचित त्या गर्वाचा शाप मला लागला होता .. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन फक्त मनापासून प्रेम करणा-या मला अगदी तिच्यापेक्षा डाव्या मुलीकडून नकार मिळाला होता ...माझे अभ्यासातले लक्ष उडाले होते ..
पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणारा रवी आता अस्ताला लागलेल्या सूर्यासारखा भासत होता ...माझ्याबरोबर  प्रत्येक गोष्ट जवळ जवळ रीमाबरोबर घडल्यागत होत होती ...
शाप ही संकल्पना खरी आहे का काय मला भासू लागले ... दिवसामागून दिवस लोटले ... अचानक आईने विचारले एक फोटो आहे पाहतोस का ? मुलगी छान आहे ... 
आणि काही दिवसांनी रविचे एका सुरेख   मुलीशी लग्न झाले आणि बहुतेक शापाला ... उ:शाप  मिळाला  

Thursday, February 17, 2011

प्लॅनचेट-(कथा )

या गोष्टीला एक १५  वर्ष झाली असतील ... मी इंजिनीरिंग च्या फर्स्ट इअर ला होतो .. आमचे कॉलेज एक मोठा कॅम्पस होता .. १२०  एकर चा  ..त्यावेळी रॅगिंग ही बरेच असायचे .. डिसेंबर चे दिवस 
आमचे पहिल्या युनिट टेस्ट चे दिवस होते . परीक्षा कधी असणार केव्हा होणार सर्व डेट बोर्डावर लागल्या होत्या .. आणि युनिट टेस्ट नंतर आम्हाला नाताळ च्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यावेळी इंटरनेट रिजर्वेशन वगैरे भानगड नव्हती त्यमुळे रीतसर २ तास कुरतडून ,चिडून, घामेघूम होऊन आम्ही आमची तिकिटे  १५ दिवस अगोदरच काढली होती .. नेत्रावती एक्स्प्रेस . कॉलेज ला अडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदाच घरी जाणार असल्यामुळे ते तिकीट रोज एकदा उघडून दहा वेळा पाहून पाहून होत होते .. उगाच वाटायचे की कदाचित लवकर दिवस संपतील आणि तो दिवस जवळ येईल ..असेच दिवस अभ्यासात, रॅगिंग सहन करत  मी टेस्ट ची वाट पाहत होतो .. अभ्यास करत होतो का नाही ( आठवत नाही ) न बोललेले बरे 
शुक्रवारचा दिवस तो ..  केरळ मध्ये असल्यामुळे थंडी वगैरे नव्हती पण थंड गार वारा नारळाच्या झाडांमधून येऊन ओशट वाटत होता ... आम्हाला शनिवार रविवार सुट्टी होती .. इंजिनीरिंग ची मुले अभ्यास किती करतात याची कल्पना सगळ्या इंजी नरांना  असेलच ...असो . तर आम्ही सगळी मित्र मंडळी शुक्रवार असल्यामुळे एकत्र  ३२४ रूम मध्ये होतो .. मी निखील श्रीकांत गौरव सुनील कश्यप आणि हं संतोष असे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो .. सुरवातीला रॅगिंग,नंतर येणारे सिनेमे , डंब शेरॅट आणि हळू हळू रात्र झाल्यानंतर मुलांचा आवडीचा विषय ( मुली नाही ) भुतांच्या गोष्टी चालू झाला . मग राजस्थान मध्ये दुधू च्या हाय वे वर कसे चकवे असतात 
भानामती, करणी, आजोबांच्या भूत पाह्लेल्या दंत कथा याला उत येऊ लागला.
 हळू हळू .. सगळेजण जवळ जवळ सरकून हळूच शालीमध्ये शिरून आखडून घेऊन सगळ्यांची हवा टाईट होते आहे हे दाखवू लागली ..
मग मधेच मुन्नालाल मीना एकदम रात्री १.३० वाजता अळोके पिळोखे देत रात्री उठला आणि त्याने आमच्या रूममध्ये डोकावून त्याच्या टिपिकल स्टाइल मध्ये विचारले  ' आज सोना नाही क्या .. ये घाटी लोग बडे पढ रहे है .. ..मग संतोष ने एक शिवी हासडत त्याला सांगितले. हमने किताब क्या ?  फुल्या फुल्या ...xxx .. तो  रात्री ज्या कारणाने उठला होता त्यासाठी तडक बाथरूम च्या दिशेने पळाला.. एक हशा पिकला.
मग एक विषय निघाला प्लानचेट .. त्यावर चर्चा झाली .. श्रीकांत नागपुरी भाषेत' साले मजाक मत करो इधर पहले ही कबसे मुतने जाना है लेकीन जा नाही राहा हु' मग त्याला फट्टू वगैरे चिडवून झाले .. सगळ्यांनी मग उसने अवसान आणून सार्वजनिक मुत्र विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला .. आणि रूम मध्ये येताच  लाईट गेले      
केरळ मध्ये पावर कट नेहमीचे होते पण आजचा पावर कट जरा जास्तच सिचुएशन ला साथ देणारा होता . मग निखील .. " शीट यार मेरेको पढने का था " तितक्यात गौरव डोक्यावर मेणबत्ती घेऊन " कही दीप जले कही दिल  करत आला .. आणि मग संतोष ने एक बॉम्ब टाकला .. तुम्हाला माहित आहे मला प्लॅनचेट  येते? .. मग थोडा हशा .. कोणी... सही मे? क्या ?मजाक मत कर... असे सर्व उद्गारवाचक प्रश्न चिन्ह दाखवीत सगळेच अचंभित झाले होते 
मग त्याने एक कॉईन आणले एका पेपरवर ए ते झेड  अक्षरे १ ते ९ आकडे  एका ठिकाणी येस एका ठिकाणी नो असे काढून एक पट तयार केला .. सगळ्यांना हे नवीन होते  त्यामुळे त्याला हे जमते हे हळू हळू वाटायला लागले होते. मग ती मेणबत्ती पटाच्या मधोमध ठेऊन तो डोळे मिटून कॉईन वर हात ठेवून ध्यान धरून बसला .. सगळे शु शु करत गप्प बसून अंधुक प्रकाशात तो अनुभव घेऊ लागले .. २.३० वाजले होते 
मग अचानक संतोष चा हात लवकर लवकर फिरू लागला .. कदाचित कोणी तरी स्पिरीट आले होते वाटते ..
मग त्याने सांगितले तुझे नाव सांग ... त्याने ...हळू हळू एका एका अक्षरावर नाणे नेऊन सांगायला सुरवात केली 
त्याचे नाव अनप्पा आहे हे कळले ..आम्हाला वाटले केरळ मध्ये पंजाबी भूत थोडीच येणार .. ट्रेन चे तिकीट तर मिळायला हवे ना ... 
मग संतोष म्हणाला  आता याला हवे ते विचार मग आम्ही हळू हळू आम्हाला जी माहिती आहे ते विचारायला चालू केले आणि ब-याच वेळा उत्तर खरे येऊ लागले .. आम्हाला आश्चर्य आणि भीती एकत्र वाटू लागली 
मग आम्ही उगीच त्याला जे आम्हाला नक्की माहिती आहे ते विचारावे आणि भुताची परीक्षा घ्यावी असे ठरवले ...
मी आणि श्रीकांत यांनी हळूच म्हटले याला विचारू आम्ही घरी कधी जाणार? .. १७ डिसेंबर ची तिकिटे झालेली होती १७ ला टेस्ट संपणार होती तरीही विचारले ..
त्याने हळू हळू कॉईन फिरवायला चालू केली .. आकड्यावर कॉईन आली .. १ आणि नंतर मी कंटाळलो म्हणून उठायला लागलो तोच श्रीकांत म्हणाला अबे ये ३ पे क्यो आ रहा है ? 
त्याच्या मते आम्ही १३ ला घरी जाणार होतो .. पण परीक्षा १३ ला चालू होणार तर कसे १३ ला जाणार बर सर्व मुले मध्यमवर्गातून असल्यामुळे टेस्ट नक्कीच देणारी होती .. आम्ही पुन्हा एकदा विचारले तरीही तेच उत्तर आले १३ डिसेंबर .. चार वाजले होते .. सुनील पेंगाय लागला होता .. संतोष म्हणाला अरे स्पिरीट गेले चार वाजल्यानंतर ते थांबत नाही .. गौरव म्हणाला... क्यो उसको  ३.५६  दादर लोकल  पकडना रहता है भाजी बेचने ? संतोष म्हणाला मैने ऐसेही सिखा है  मानना है तो ठीक .. 
मग सगळे त्याचा विचार करत करत कधी झोपलो कळले नाही .. हळू हळू दिवस लोटले .. टेस्ट जवळ आली होती .. पहिलीच परीक्षा असल्यामुळे उत्कंठा आणि भीती दोन्हीही होती ..
सिनिअर- ' फेल हो गया तो बहुत पिटेगा अशी दमदाटी करून अजून टेन्शन देत होते .
. १३ डिसेंबर आला ... पहिला पेपर मेकॅनिक्स होता पेपर बरा होता ..पास नक्की होऊ खात्री झाली .. पेपर १२ वाजता संपणार होता ..
मी १५ मिनिटे लवकर पेपर दिला आणि होस्टेल वर येत होतो .. अचानक दोन तीन मुले होस्टेलच्या जिन्यावर पळताना दिसली .. लगबग नेहमीची नव्हती .. मी सुद्धा वर पळालो आणि १०- १२ मुले ३३३ रूम च्या समोर उभी होती मी पळालो .. पहिले ते दृश्य ना विसार्ण्यासारखे आणि भीषण होते .. एक मुलगा पंख्याला लुन्गीने लटकला होता जीभ बाहेर आली होती .. होस्टेल वार्डन  सुद्धा पळत आले सगळयांना त्यांनी हाकलायचा प्रयत्न केला  पण कुणीही  जागचे हलले नाही . मी थोडे पुढे जाऊन पाहिले की कोण मुलगा आहे आणि धक्का बसला .. माझ्या शेजारी , बेंच वर बसणारा अजित नावाचा मल्याळी मुलगा होता .. त्याने लटकून आत्महत्या केली होती.
त्या नंतर त्याच्या खोलीत असणा-या दोन रूममेट ना हलवण्यात आले .. त्या रूम मध्ये उदबत्त्या लावल्या होत्या ..त्या उदबत्त्याचा वास मला अजूनही काटा आणतो 
हळूच सगळी मुले होस्टेल वर आरडा ओरडा करायला चालू झाली की आम्हाला इथे राहाचे नाही .. परीक्षा पुढे ढकला आमची मनस्थिती ठीक नाही .. मग प्रीन्सिपोल आले आणि त्यांनी परीक्षा पुढे ढकलून नाताळच्या सुट्टीनंतर ५ जानेवारीला ठेवल्या ..
सगळे जन ब्यागा  भरून तयार झाले होते .. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळ जवळ सर्व होस्टेल रिकामे झाले होते .. आम्ही आमचे १७ तारखेची तिकिटे कॅनसेल करून जनरल डब्यात बसून नेत्रावती एक्स्प्रेस ने प्रवास चालू केला
आम्ही सगळे त्या प्लॅनचेट च्या भुताच्या भाकीतामुळे सुन्न झालो होतो .. त्याची भुताटकी कुणाचा प्राण घेऊन आम्हाला घरी पाठवणार होती हे कळले असते तर कदाचित हे कधीच होऊ दिले नसते .
संतोष अचानक म्हणाला यार गलती झाली ... मी प्लान चेट चे नाटक केले होते त्या दिवशी भूत फीत कोणी आले नाही .. मला माहित होते की आपण १७ ला जाणार म्हणून मी १३ ही तारीख ठोकून दिली होती ...
मग बाकीची उत्तरे?? .. बस  क्या यार आपण दोस्त लोक ना आपल्याला एकमेकांच्या गोष्टी माहित नसतात का.. हसावे का रडावे तेच कळेना ..  
या अगम्य जगात बरेच योगायोग होतात तसा हा भयानक योगायोग झाला होता .. मला राहून राहून अजित त्याचे पालक , परीक्षांचे टेन्शन का अजून काही असे अनेक प्रश्न येत होते...
थोड्याच वेळात सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या चालू केल्या ... ' आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू ' आणि आमच क्षणिक सुतक मागे पडले ...

.जयदीप भोगले
.


Monday, February 14, 2011

बकुळीची फुले


तुझ्या डोळ्यांच्या दुनियेत आज मला सगळे विसरावे वाटते
आठवलेच तर आपल्या पहिल्या भेटीच्या आईसक्रीम ची चव अनुभवावी वाटते
क्षण न क्षण नेहमीच अवीट  राहिला 
तू जवळ नसताना सुद्धा श्वास तुझाच राहिला
माझ्या रागाला तुझ्या प्रेमाची फुंकरच  आवरू शकेल
तुझ्या किनाराच  माझ्या मुक्त लाटेला  सावरू शकेल 
आज ना ती  सुवासिक बकुळीची फुले नाहीत  गुलाब आणले 
बस हृदयातील  दोन शब्द कवितेत माळून तुला वाहिले 

जयदीप भोगले
१४.०१.२०११ 

Friday, February 11, 2011

स्वप्नाचे कल्पनेला पत्र


लाडके 
चिरायू राहा, तुझ्याच अस्तित्वाने माझे जग आहे .. तूच माझ्या मृतिक्केत रंग पेरले आहेस ..एक स्वप्न डोळ्यात रंगते आहे  एक आशा पापणीत जगते आहे .
मला खात्री होती तू माझे ऐकशील ..कदाचित माझ्या आगीत तितकी धग होती 
सखे तू  माझ्या साक्षीस रहा माझी कहाणी तुझ्या शब्दात वहा.... माझे नेहमी ऐकलेस कधी आपल बोलून पहा 
किती रिक्त चेह-यांना तू प्रभा दिलीस .किती निद्रस्थ मनांना तू पंचमाची साथ दिलीस . किती भुक्त कायांना  जाणीवेची कात दिलीस .
तर काय झाले जर कोणी सोबत नाही. असेही नाही कि कुठल्या आशेचा हात नाही .तुझ्या काळजापेक्षा दुसरे काही खास नाही .  
माझ्या घरट्यात ये हवे ते तुझे आहे 
सत्याशिवाय इथे सर्व काही स्वर्गसुख आहे .ही कल्पनेची नगरी आहे ..इथे सार-याची यारी जिगरी आहे .
 इथे थोडा वेळ पहुडून जा एक मैफल दिवाणी जगून जा . काही तुझ्या बाजूचे तरंग असतील तर तिच्या पासून लपून जा ..
सुटून जाईल प्रीतीचे मळभ अचानक  विखरून जाईल स्वप्नाचा पहारा 
. नजरेच्या प्रत्येक कटाक्षात तूच दिसतेस .. मनातली प्रत्येक गोष्ट तूच जाणतेस .
अजून एक करशील एकटे मन दिसले तर वेडे पिसे समजू नको ..अजाण त्या मनाला जाणूनबुजून टाळू नको
आशा गप्प असेल पण मनात सुखरूप असते .. सावलीला सुद्धा भिऊन नेहमी गप्प राहते,
  आता तुला  त्यात एक घरकुल थाटायचे आहे आशेच्या या कट्ट्याला सुगंधी करायचे आहे.
मी काही स्वप्न रंगवली होती जेव्हा दूर दूर पर्यत आपली अशी कुणी नव्हती ..तेव्हा तू एक चित्र रेखाटले होतेस ते आपले समजून मी  मनात टांगले होते . 
कित्येक क्षण तुझ्या समवेत ते चित्र न्याहाळत माझे  हास्याचे रंग कुंचल्यात भरत मी विसरलो कि ते चित्र तुझेच होते .
 पण मन माझे वेडे कोकरू  अडखळले कधी कधी लागे बावरू ..
पण एक उपकार आहे माझ्यावर माझे डोके होते नेहमीच तुझ्याच खांद्यावर .. आता बावरून सखे साथ कधी सोडू नको ..
एवढेच सांगतो तुला  तू आणि मी हीच साथ खरी आहे . बांधू एक बांध  आता कारण  आपल्यामध्ये दरी आहे .

मित्रांनो , काही ब्लॉग वाचता वाचता अचानक एक छान कल्पना वाचण्यात आली .. उर्दू होती .. जुबां ए गोया म्हणून ब्लॉग आहे त्याचे रसग्रहण करून काहीतरी चितारले आहे .. त्या कल्पनेचे आभार .
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या 


जयदीप भोगले 
११.०२.११ 

वादा


वादा है अपने आप से एक वादा ना तोडना है
झूठा ही सही दिल से एक वादा जरूर करना है

चेहरे की कसक से खींच गए हम एक भंवर में 
भीगा ही सही बहाव को एक साहिल से अब जोड़ना है

पत्थर और फूल को एक तराजू में तोलने का गजब हम से हो गया
शीशे को आईने में बदलेंगे ऐसा सबब कुछ करना है

अब वादा एक सच है या इस ख्वाब को तोड़ देना है
रगों में बहता है जो खून उसी को बस एक शायरी में बदलना है

जयदीप भोगले
१०/०२/२०११ 

Wednesday, February 9, 2011

चेहरा



सावालीसम  बदलून जाई
कधी तेजात कधी तमसेत न्हाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

        नात्यांच्या कधी बंधनात
कधी माणुसकीच्या कोंदणात 
ख-या खोट्याच्या तराजूत जेव्हा 
मन तो तोलून पाही.
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

स्मित आणि हास्य पाहावे
कधी अश्रुंचे दास्य सहावे 
फुल आणि काट्यात अलगद
सुगंधात तो हरवून जाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

दर्पणात  कधी  बिम्बित होऊन
 चेहरा कधी स्वतःला न्याहाळी
मुखवट्यात मी का हरवलो? 
का नशीब असे हे आपुले भाळी 
पाठ फिरवून पुन्हा नव्याने
नवा मुखवटा उचलून घेई
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

जयदीप भोगले
९/०२/२०११


Friday, January 14, 2011

नाट्य प्रभाकराचा अस्त .

.मित्रांनो इतके दिवस खूप हलके फुलके लिहले समीक्षा लिहल्या .. काल रात्री विचारात पडलो होतो कि उद्याचे पोस्टिंग काय असावे  तोच चोवीस तास वर बातमी वाचली .. के जेष्ठ नाटककार श्री प्रभाकर पणशीकर यांनी शेवटचा अंक संपवला ...अतिशय वाईट वाटले .. आणि मी विचार केला, एका कलाकाराला त्याचा कलेच्या उपासने बद्दल दिलेली मानवंदना हीच त्यांना दिलेली श्रद्धांजली होय ..
प्रभाकर पणशीकरांच्या नाट्य क्षेत्राच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या कामगिरीबद्दल काही मी लिहावे बोलावे इतका मोठा मी नक्कीच नाही पण ते गेले आणि तो मी नव्हेच , इथे गवतास भले फुटतात अशी मोजकीच त्यांची नाटके माझ्या डोळ्यासमोर अवतरली ..दोन मिनिट शांतता एका कलाकाराच्या श्रद्धांजलीसाठी न वाहता आपण त्यांच्या साठी केलेला टाळ्यांचा कडकडाट , त्यांचे संवाद जेमतेम कळूनही लहानपणी  दिलेली दाद ही आठवणे म्हणजेच खरी श्रद्धांजली होय .
मला अजूनही आठवते की फिरता रंगमंच आणि त्यातून येणारे  राध्येश्याम महाराज कप्तान परांजपे असे सिनेमा पाहिल्यासारखे वाटायचे .. इतक्या लवकर ते कपडे बदलू शकत हि असतील पण इतक्या बेमालूम पणे एखाद्या व्यक्तिरेखेत शिरायचे हेच मला नवल वाटायचे .. किंवा आता मला अचंभ वाटतो .. मला आज कळत्या वयात मी तो मी नव्हेच नाट्यगृहात पाहू शकलो नाही 
याची नेहमी चुटपूट लागते .
  • भटाला  दिली  ओसरी 
  • तो  मी  नव्हेच 
  • इथे  ओशाळला  मृत्यू 
  • अश्रूंची  झाली  फुले 
  • थ्यांक यु  मि.ग्लाड 
  • जेव्हा  गवताला  भाले  फुटतात 
या सारखी एका पेक्षा एक नाटके त्यांनी केली,  यातली मी फक्त दोन पहिली .. दोन नाटकांच्या जाहिराती पेपर मध्ये नियमित वाचल्या .

नाट्यसंस्थेसाठी नाट्यसंपदा स्थापून केलेले योगदान असो, की अविरत रसिकांच्या  टाळ्याचा बालेकिल्ला सर करत केलेल्या भूमिका असोत त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांना नेहमीच सलाम.
या पोस्ट चे शीर्षक प्रभाकराचा अस्त जरी दिला असेल तरी हा सूर्य पुन्हा आपल्या केलेल्या प्रचंड कामामुळे नेहमी तळपत राहील यात शंका मुळीच नाही .

अशा थोर व्यक्तीमुळे काम करण्याची नेहमीच प्रेरणा मिळत राहील .. त्यामुळेच मी म्हणतो .. इतका थोर मी नव्हेच ... तो मी नव्हेच 
 
जयदीप भोगले

Thursday, January 13, 2011

चला बाई जाऊ - होम मिनिस्टर पाहू

कार्यक्रम - होम मिनिस्टर जाऊ बाई जोरात
वाहिनी- झी मराठी 
वेळ- ६ वाजता मकर संक्रांति पासून 
का पाहावा - खाली वाचा 
का  पाहू नये - टी वी बंद असेल , दुरुस्तीस दिला असेल ,किंवा आपल्याच घरी शुटींग चालले असेल तेव्हा  

रसिकहो , आणि नियमित टी वी पाहणं-या माझ्या मित्रांनो,   झी मराठी ... ( आलं का पुन्हा तुमचं झी मराठी ..असे कदाचित तुम्ही म्हणत असाल ) पण काय करणार काही गोष्टींना  पर्याय नसतो 
आणि जसे  पर्याय निर्माण करावा म्हणून उगीच लोकसत्ता आणि म टा सोडून  दैनिक भम्भेरी , नसत्या उचापती असे वृत्तपत्र आपण  वाचत नाही तसेच मला, नव्हे  महाराष्ट्राच्या ब-याच टी वी दर्शकांना झी मराठीला पर्याय सापडत नाही असे माझे मत आहे .. कदाचित हे आत्यंतिक असू शकेल पण जसे एखाद्या मराठी बाईला पैठणीपेक्षा काही चांगले असू शकते असे वाटत नाही ( कदाचित असू ही शकेल ) तसे मला झी मराठी बद्दल वाटते .
असो पैठणी वरून आठवले की बांदेकर भाऊजी यांनी अवघ्या महाराष्ट्राच्या वनिता समाजाला , महिला मंडळाला पैठणी चा नजराणा दिला नवे तर रोजचा रतीब च लावला ..आता मला सांगा दुधाचा रतीब असतो तसे पैठणीचा रतीब.. काय अजब होते नाही.. याच खेळाने आता काही दिवस अल्पविराम घेतला होता  तो पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर येतो आहे एका नव्या दिमाखात .. होम मिनिस्टर जाऊ बाई जोरात ...

आणि या वेळी याच्या प्रोमो मध्ये छोटे भाऊजी आहेत असे दिसते .. त्यांचे नाव आहे निलेश साबळे, निलेश साबळे महाराष्ट्राचा सुपर स्टार नंतर फु बाई फु मध्ये जाऊन आता जाऊ बाई जोरात म्हणतो आहे .. मी म्हणलो जाऊ हां जाऊ  ..

साडे माडे तीन .. हो शो साडे माडे तीन करत लवकर कटला .. त्यानंतर असले नंबरी कार्यक्रम येऊ लागतात की काय अशी भीती वाटली होती पण परवाच संध्याकाळी प्रोमो पाहिला आणि हायसे वाटले. आता होम मिनिस्टर आधी साडे सहा ला यायचा आता सहा वाजता येणार आहे एवढेच .. आता करमणूक आणि पैठणी यासाठी अर्धा तासाची तडजोड महिलांनी नक्कीच शक्य आहे .. 
भाजी आधी चिरायची किंवा त्याचे मोठे तुकडे करून लवकर चिरायची इतकीच तडजोड आहे ..  

होम मिनिस्टर हा कार्यक्रम हलका फुलका, आगळा वेगळा आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही .. त्यातील महिला वर्गाची घेतलेली फिरकी .. त्यांनी घेतलेले नाव ( ते घेतले की मला पु लं च्या असा मी असामी मधील हिंद मातेचा उखाणा आठवतो आणि हसू येते ) एकदा एका बाईने याच कार्यक्रमात पाच पांडवांची नावे सांगा म्हंटल्यावर .. कौरव अशी सुरवात केली होती..

अशी प्रासंगिक विनोदची फोडणी , भाउजीनी घेतलेली फिरकी , त्यामधले निरर्थक वाटणारे पण तितकेच क्रियेटीव्ह  खेळ , नातेवायीकांचा घोळका अशा कितीतरी गोष्टी या शो ला मालिकांपेक्षा लज्जतदार बनवतात .
( महिला वर्गाला मालीकापेक्षा काही चांगले आहे असे म्हटल्यामुळे जाहीर माफी )

आता फक्त सस्पेन्स हाच आहे की जाऊ बाई जोरात आहे तरी काय .. जुनी रेसिपी  नवीन प्लेट मध्ये की सर्वच नवीन ?. पुलाव का फोडणीचा भात ? मटणाचे कबाब का मटणसदृश सुरण कबाब?... हे प्रत्यक्ष आल्यावर ठरवावे लागेल . फक्त इतकेच सांगतो अपेक्षा ही आधीच्या चांगल्या काळाची बहिण असते  त्यामुळे जाऊ बाई जोरात .. जोरदार असेल असे अपेक्षित आहे 
आणि संक्रांतीला तीळ गुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणत असल्यामुळे उगीच कटू मत व्यक्त करून कारले कशाला खायला घालू ..

तर गड्यानो मी उद्या जाणार जोरात आणि तुम्ही ...

जयदीप भोगले

Wednesday, January 12, 2011

इंतज़ार और तूफ़ान

जब  तूफ़ान  में  किसीका  इंतज़ार  होता  है 
तो  एक  पैगाम  भी  साहिल  बन  जाता  है 
ना  सफ़र  पता  है  ना  मंजील 
बस  पैगाम  का  सहारा  ही  नाव  का  किनारा  बन  जाता  है 

एक  तिनका  भी  किसी  के  प्यार  का 
       इंतज़ार  में  कश्ती  बन  जाता  है 
उसीसे  आती  है  तूफ़ान  से  लड़ने  की  उमीदे 
लहरों  का  सामना  भी  उसीसे  आसान  हो  जाता  है 


एक   नजर  के  खातिर  मीलो  पार  हो  जाते  है 
      जब  उनकी  आखों  में  प्यार  का  इकरार  नजर  आता  है 
      एक  ख़त  के  भरोसे  कट  सकती  है  जिंदगी 
      एक  ख़याल  मुलाक़ात  का  उनका  दामन  बन  जाता  है 

जब  कोई  ख़त  के  लिए  तड़पता  है 
उसके  जिंदगी  का  लम्हा  भी  तूफ़ान  बन  जाता  है 
इंतज़ार  होता  है  एक  लब्ज़  का 
उसका  ना  होना  क़यामत  बन  जाता  है 


जयदीप भोगले
२००५


Thursday, January 6, 2011

रसिकेंद्रासाठी आणि टी वी विश्वमित्रांसाठी आलेल्या अप्सरा ...






वाहिनी - झी मराठी
कार्यक्रम- एका पेक्षा एक - अप्सरा आली
वेळ- बुध गुरु - ९.३० रात्रौ
पाहावा की नाही - अवश्य



 नृत्य हा सर्वांनाच आवडीचा असा कलाप्रकार आणि त्या वर आधारित अनेक कार्यक्रमांचे आलेले पीक आपणाला परिचित आहेच . प्रत्येक वाहिनी हिंदी मराठी अगदी मल्याळी सुद्धा लावावी आणि आपल्याला कुठेना कुठे तरी झलक मिळेलच .. आता हे सादरीकरण किती भडक, किती तालबद्ध, आणि करणारी व्यक्ती यावर अवलंबून असते आणि आपला रिमोट याच्या दर्जावर आपले काम करत असतो म्हणजे काम आपण करतो तो तसे वागतो ..
झी मराठी वाहिनीने अतिशय उत्तम नृत्य दाखवून एका पेक्षा एक ( नावाला सार्थ ) असा कार्यक्रम गेले चार पर्व लोकांपर्यत आणला .. लोकांना कदाचित भार्गवी , आणि अमृता अजूनही आठवत असतील ..
आता आपल्याला या आठवत असतील तर आपल्या आठवणी पुसून टाकायला आणि त्यावर अजून हळुवार अशा अनुभवांची ( फक्त दर्शनीय ) अनुभूती करून द्यायला नऊ अप्सरा येत आहेत ..
त्या एक आठवड्यापूर्वीच आपल्यासमोर आल्या म्हणा पण काही विश्वामित्र जर इतर वाहिन्या बघण्यात गुंग असतील तर माझी प्रतिक्रिया त्यांच्या क्रीयाशिलातेसाठी कदाचित फायद्याची होईल .
एका पेक्षा एक- अप्सरा आली असे नाव घेऊन आलेल्या या तारकांच्या नृत्यास्पर्धेला पहिल्याच भागात प्रतिसाद मिळेल अशी खात्री झाली. 
फुलवा खामकर,मयूर वैद्य आणि दीपाली विचारे या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आपल्या कौशल्याचे आणि अनुभवाचे धडे या ललनांना देणार आहेत .. त्यामुळे सुंदर दिसणारी अप्सरा थिरकताना अजून किती खुलते हे काही वेगळे सांगायला नको .
आता या अप्सरा आहेत तरी कोण ? नेहा  पेंडसे  , गिरीजा  ओंक , मृण्मयी   देशपांडे , उर्मिला  कानेटकर , नेहा  जोशी , स्मिता  तांबे , आरती  सोलंकी  आणि   सोनाली  खरे  या अष्टललनासमवेत एक वादळ येत आहे ...एक सौंदर्याचा झंझावात येत आहे आणि तो म्हणजे नटरंगी नार ... सुरेखा पुणेकर ...

आता या नऊ ललना नौरासंपैकी आवडता आणि रसरशीत असा शृंगार रसाने नटलेला असा कार्यक्रम सादर करणार असतील तर लोकांच्या उड्या पडणार नाही तर नवलच ...

पण आता आपण बाकी गोष्टी जरी पहिल्या तर या सर्व ब-यापैकी चांगल्या नृत्य करणा-या आहेत, उत्तम दिसण-या आहेत आणि झी मराठी मालिकांच्या एक एक रत्न आहेत  ..

मध्यमवर्गीय भीती आणि अपुरे धाडस म्हणून कित्येक दिवस पुण्यात येऊन सुद्धा मी नटरंगी नार पहिला नव्हता .. पण सुरेखा पुणेकर यांना जेव्हा या शो मध्ये पहिले तर दिलखेचक म्हणजे काय  ..नयनबाण म्हणजे कसा असतो याचा  प्रत्यय मला आला .. आणि यावर दिपाली यांनी विचारलेला प्रश्न -- ' सुरेखाताई ( त्यांच्या)  आपण जेव्हा नाचता ,तेव्हा प्रत्यक व्यक्तीला आपण त्याला इशारा करता आहात, त्याच्या डोळ्यात पाहता आहात असे का वाटते ?' कदाचित इतकी उच्च प्रश्नार्थी दाद कदाचित कुणाला मिळते किवा कोणी दिली असेल ..

सचिन ये नेहमीप्रमाणे या कार्याक्रमचे प्रमुख आणि महागुरू आहेत . त्यांनी पाहिलेली चित्रपट सृष्टी त्यांचा अभ्यास, त्यांची शायरी हे सर्वच या नृत्यांगनाना एक मोलाचे मार्गदर्शन ठरत असले पाहिजे ..

आणि माझा आवडता एकदम कोकणस्थ टोमणे देणारा ( याला कुणीही जातीयवाद म्हणू नये ) पुष्कर श्रोत्री याचे सूत्रसंचालन करतो आहे .. त्यामुळे तबला पेटी आणि घुंगरू असे त्रिकुट असते तसेच 
नऊ नवतरुण आणि सुरेखा पुणेकर यांसारख्या चिरतरुण नृत्यांगना , यांचा ताल सांभाळणारे तीन दिग्दर्शक , पुष्कर श्रोती यांची चपखल सांगत ज्यावेळी झी मराठी सारख्या रंगमंचावर येत असेल तर सोने झाल्याशिवाय राहत नाही.

रसिकहो , म्हणूनच सांगतो , आपण त्याच त्याच बातम्या बघून कंटाळला असाल , एक धड मालिका नाही.. म्हणून चरफडत असाल , मुलांच्या कोडकौतुकाला विटला असाल तर काही अस्सल असे मनोरंजन घेऊन इंद्रपुरीतून नाही तर किमान मुंबपुरीतून आपल्यासाठी एका पेक्षा एक अप्सरा आल्या आहेत १०-१२  आठवडे येत राहतील .. पाहायला विसरू नका
दाद द्यायला विसरू नका

चक्षु चाणाक्ष 
जयदीप भोगले  

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...