Thursday, April 24, 2014

येळकोट येळकोट ….जय मल्हार !!!



नाविन्य , औत्सुक्य , भव्यता  या तिहेरी धाग्यात जेव्हा काही विणले जाते आणि त्यातून जी कलाकृती बनते , ती नेहमीच कलासक्त माणसाचा आणि अगदी अरसिक मनाचा सुद्धा  ठाव घेतल्याशिवाय  राहत नाही . या धर्तीवर आपली लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच काहीतरी घेऊन येते . मग अगदी  सारेगमप  असो , मराठी पाउल पुढे ते थेट विनोद या तीन अक्षरी शब्दाला नया है  म्हणून हसायला लावणारी   फु बाई  ,. या प्रत्येक कार्यक्रमात  ही तीन वैशिष्ट्ये  आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात …
आता काही दिवसापूर्वीच अजून एक असाच प्रोमो मी  पाहिला आणि  थोडा थबकलो … पिवळ्या रंगात  संबळाच्या आवाजात एक भारदस्त आवाज आला जेजुरीचा राणा  तू येळकोट  मल्हारी …।
तर सगळ्या प्रस्तावनेचा प्रयोजन असं  की  १८ मे  पासून  जय मल्हार ही मालिका झी वाहिनीवर येतेय असं  ऐकलय असं  वाचलंय . आता पुन्हा तेच तीन गुण   ,

नाविन्य … असा प्रयोग  मराठी मालिकेत झाला नाही . तसा पुरुष नायक असलेल्या  मालिकेचे या टी  वी ला वावडेच असते म्हणा… पण ह्याचा हिरोच जर आमचा मल्हारी मार्तंड आहे तर अजून काय सांगू ? .आणी खंडोबा आपला कुलदैवत आहे, पण आपल्या कुलदैवता बद्दल माहिती असतेच असे नाही  त्यामुळे कथा  नवीन आहे हे वेगळे कशाला सांगावे  

औत्सुक्य…. प्रोमो वरून तर  उत्कंठा वाढती आहे . खंडोबा ची  भूमिका कोण करताय  ? त्याची कहाणी काय .आपण जेजुरी ला जातो,  पण जुने जेजुरी कसे  होते …

भव्यता … वर्तमानपत्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्वात महागडी मालिका असेल,  त्यामुळे ही मालिका भव्य असावी कारण प्रोमो तर नक्कीच भव्य वाटतोय .  पौराणिक व ऐतिहासिक काळ  दाखवताना जर भव्य नसेल तर त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे ती भव्य असेल अशी आशा  तरी झी मराठीकडून  नक्कीच करू शकतो .

 आजकाल झी मराठी होणार सून , जुळून येती  मुळे  प्रसिद्धीच्या   शिखरावर असल्यामुळे, कांचनगंगा शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकाला जसे एवरेस्टच  गाठावे लागते, तसे काही या मालिकेकडून अपेक्षित आहे हे मात्र नक्की .

मी लहान असताना आलेले 'भारत एक खोज' मला एकदम निराळे वाटले होते. तसा काहीतरी अनुभव ही मालिका देऊन जाईल का?
सासू सुनाच्या ओशट  प्रेम आणी  अश्रूंच्या पुरातून वाचवून  ही मालिका  टी वी ला थोडे  रांगडेपण देईल का ? स्वयपाक घरातील राजकारण आणी मागच्या परसात हैदोस घालणाऱ्या , पुढच्या पावलाच्या मालिकांची   ही  हकालपट्टी करेल का ?
 असे बरेच प्रश्न माझ्या मनात तर आहेत . त्याची उत्तरे मिळायला थोडा वेळ तर लागेल . पण  तितके वाट पाहण्याची  सवय आपल्याला जाहिरातींनी  लावलेलीच आहे .
 त्यामुळे एखादी आवडीचा कार्यक्रम पाहताना जसा मी दबा  धरून बसतो तसाच जय  मल्हार पाहण्यासाठी  बसतोय  …

तुमच्यापैकी सुद्धा माझे  काही मित्र  अशी वाट  नक्कीच पाहत असाल …

 पाहू या तर मग येळकोट मल्हारी मार्तंडचा ….

जयदीप भोगले
23 .04.14


Sunday, August 25, 2013

क्षितिजापल्याड भरारी मारणारा .. उंच माझा झोका पुरस्कार

मित्रांनो . वाहिनीवरच्या कार्यक्रमाबद्दल कमेंट करण्याचा छंद असून कित्येक दिवस काही लिहू शकलो नव्हतो. कार्यक्रम किती भिकार ...बटबटीत होता  हे लिहून  उगाच गूगल ची भाषांतर परीक्षा घेण्याचे मी गेले कित्येक दिवस टाळत होतो . पण चांगल्या कार्यक्रमाची स्तुती करण्यासाठी माझ्या laptop ने दिलेला त्रास . गुगल काकांनी दिलेली तोकडी मदत सुद्धा मला खूप उत्साह देऊन जाते .. आणि मग त्यात जर रविवारच्या संध्याकाळी maggi खात खात एका अविस्मरणीय कार्यक्रम पहायला मिळाला तर ..
गेले कित्येक दिवस पुढचे पाउल म्हणत म्हणत १०० वर्षापूर्वीचा सासू सून वाद ..पाहून मी मराठी वाहिन्या पाहाव्या की नको या विचारात पडलो होतो. पण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीने मला सकारात्मक विचार करायला भाग पडले.
गेले कित्येक दिवस गाजत असलेली “उंच माझा झोका” ही मालिका , मालिका न ठेवता त्यातून प्रत्येक घरात नांदणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करून, त्यातून  एक पुरस्कार सोहळा करण्याचा संकल्पना करणाऱ्या झी मराठी वाहिनीचे अभिनंदन.
मनोरंजन वाहिनी ही सामाजिक बांधिलकी, जबाबदारी  जपणारी सुद्धा असू शकते याचे हे उत्तम उदाहरण.
सामाजिक बांधिलकी जपणे हे फक्त सह्याद्री वाहिनी पुरतेच मर्यादित आहे का काय असे मला वाटत होते पण कदाचित या प्रश्नांचे यथोचित उत्तरच झी मराठी ने या पुरस्काराने दिले आहे.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीशक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे आणि ‘कतरिना’ वादळात फसलेल्या आपल्यासारख्या तरुणायीला, स्त्री प्रत्येक क्षेत्रात तेवढीच मोठी वादळवाट बनवतेय हे समोर आणायचे स्तुत्य काम या पुरस्काराने केले असे मला वाटून गेले
पुरस्कार मिळणाऱ्या माधुरीताई असोत की कब्बडी मध्ये जग जिंकून येणारी दीपिका जोसेफ असो प्रत्येक पुरस्कार महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिरकणी ला दिला आहे असे मला वाटत होते.
प्रत्येक पुरस्कार मिळताना आपण या जगात किती छोटे आहोत याची कुठेतरी चुटपूट मला लागत होती.
कार्यक्रमाची बांधणी पुरस्कारांच्या प्रत्येक हिऱ्याला न्याय देऊन बनवलेली होती . नाहीतर मनोरंजन या नावाखाली आजकाल चित्रपटातील तांत्रिक पुरस्काराना जशी कात्री मारली जाते , एन्ड क्रेडीट मध्ये चित्रपटात मेहेनत केलेल्या माणसाना जसे नकळत डावलले जाते तसे कुठेही वाटले नाही. हे सुद्धा खूप आवडले .
या कार्यक्रमाच्या ब्रेक मधल्या जाहिराती सुद्धा अतिशय योग्य आणि पुरस्काराला साजेश्या होत्या हे सुद्धा कौतुकास्पद म्हणावे लागेल.
मग सोसायटी चहाची असो की dove साबणाची J ..
पण होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी गर्दी करणाऱ्या महिला या सुवर्णक्षणी का गर्दी करत नाहीत हे कुठेतरी कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये असलेल्या तरुण महिलांच्या सहभागावरून वाटून गेले. कदाचित याच कारणामुळे आपल्या समाजात भवानी शक्ती उपासनेसाठी वर्षातून नउच दिवस का? याचे उत्तर मिळते .
मनोरंजन वाहिन्यामुळे आपण गाणे गावे, नाच करावा किंवा अभिनय करावा असे वाटणाऱ्या लहान मुलींना  सोबत बसून, प्रत्येक क्षेत्रात काम करून वलय हे निर्माण करता येऊ शकते  असे कुठेतरी या पुरस्कारातून दाखवून दिले.
गांधी सिनेमा हा जसा प्रत्येक गांधी जयंती ला आवर्जून पाहिला जातो तसा हा पुरस्कार दर वर्षी तितकाच आदराने पाहावा आणि प्रत्येकाने त्यातून प्रेरणा घ्यावी हीच या पुरस्कार सोहळ्याची  खरी पावती ठरेल...


    


Tuesday, February 26, 2013

अवधूत गुप्तेची ची ओपन हार्ट हाताळणी ...खुपते तिथे गुप्ते


कार्यक्रम-खुपते तिथे गुप्ते
वाहिनी-झी मराठी
वेळ- बुधवार गुरुवार ९.३०
पहावा का नाही- न चुकता  पहाणे
मित्रांनो, माझा आवडता छंद चांगले कार्यक्रम ऐकणे आणि पहाणे. ( आणी त्यावर लिहून आपले मत ठोकून देणे J)
झी मराठी वर सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते त्यातलाच एक ...
तसा हा या कार्यक्रमाचा ३ रा सीजन आहे बहुतेक . हिऱ्याला जसे पैलू पडावेत, चंद्र जसा कलाकलाने अधिक सुंदर व्हावा किंवा आपली आवडती मैत्रीण किशोर वयातून तारुण्यात येताना अधिक सुंदर आणि अधिक हवी हवीशी वाटावी या प्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक हवा हवासा वाटतो आहे .
मुलाखतवजा ग्रेट भेट , संवाद , Rendezvous अशा कार्यक्रमच्या यादीत हा कार्यक्रम कधी जाऊन बसला ते कळलेच नाही . मार्केटिंग च्या भाषेत आपण यादीत जाऊन सुद्धा आपल (positioning ) वेगळे ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि ते या कार्यक्रमाचे यश आहे असे मला वाटते.
हा कार्यक्रम पाहताना मला तराजू आठवतो ... दोन पारड्यात दोन तितकीच तुल्यबळ व्यक्तिमत्व असूनही पारडे कधी इकडे झुकवावे आणि कधी तिकडे अशा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गुप्ते साहेब कार्यक्रम हाताळत असतात.
अवधूत गुप्ते तर माझ्यासाठी हा एक प्रवास आहे . झी च्या पहिल्या सारेगामा च्या पर्वा पासून ते खुपते तिथे गुप्ते च्या तिस-या पर्वापर्यंत त्याच्यातील परीपक्वता उतरोत्तर वाढत गेली पण मिश्कीलपणा कुठेच कमी झाला नाही . मला judge म्हणून त्यांनी मारेलेल्या “ टांगा पलटी घोडे फरार” सारख्या नवीन ट्रेडमार्क कमेंट आणि खुपते तिथे मध्ये आपल्या समोरच्या व्यक्तीच्या वयाला अनुसरून त्यांच्या आयुष्याची काही पाने चाळण्याचा प्रयत्न दोनीही तितक्याच अभिनव आणि “ अवधूत” ब्रान्ड वाटतात
कार्यक्रमाची भक्कम बाजू अवधूत असल्यामुळे मुलाखती साठी समोर कोण आहे याला फार महत्व द्यावे असे वाटलेच नाही. करोडपती मध्ये जसा अमिताभ , वहिनी  कुठलीही असो समोर आदेश भौजी असले की प्रत्येक वहिनी मनमोकळ्या गप्पा मारणारच.... तसेच अवधूत दादा, विनय आपटे असो की की फटाकडी सोनाली कुलकर्णी . प्रतेयक संवाद तितकाच मुलखात देणाऱ्या पाहुण्याच्या  रंगात रंगून जातो.
कार्यक्रमात नेहमीच सांगितल्याप्रमाणे त्यांचा जादूचा फोन ही या कार्यक्रमाची खासियत ...
मग रोहिणी हत्तंगडी यांचा कस्तुरबा गांधी बरोबर झालेला फोन की अजून कोणाचा प्रत्येक फोन तितकाच वेगळा.
मास्क सिनेमा मध्ये जसा मास्क हा फक्त मास्क लावणाऱ्या व्यक्तीसारखा वागतो ,फक्त अधिक उजळ अधिक जादुई ...तसेच खुपते मधला सेलिब्रिटी…. 
 जसा आहे तसाच समोर येतो, फक्त…  अधिक उजळ होऊन
कार्यक्रमाचा वाद्यवृंद उगाच जिथे तिथे म्युझिक वाजवू पाहत नाही ही सुद्धा जमेचीच बाजू
हिंदी सारेगामापा चा विजेता जसराज जोशी याच कार्यक्रमात चमकून गेला होता
दाटून कंठ येतो हे गाणे त्याने इतके भावपूर्ण म्हटले होते की फयाज यांच्या डोळ्यात कधी पाणी आले व आमच्या आईच्या सुद्धा कळलेच  नाही .
थोडक्यात आजकालच्या predicted जगात काहीतर न ओळखता येणारे कार्यक्रम कमीच. यात हा कार्यक्रम नक्कीच गणता येईल
सो ... हृदयाला भिडणारा संवाद आणि थेट हृदयप्रिय कलाकारांबरोबर म्हणूनच म्हणतो हे काही जणू नाजूक ओपन हार्ट करण्याजोगे आहे ..
तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण..... पहायला विसरू नका J
  
जयदीप भोगले
२६ . २. २०१३ 



Thursday, February 21, 2013

सिनेमा सिनेमा !!!!

सिनेमा सिनेमा !!!!

मित्रानो !!!
फार दिवसांनी काही लिहावे वाटत आहे .
आता मी लिहिले नाही म्हणजे लोकसत्ता आला नाही किंवा झी मराठी पहिले नाही अशी चुटपूट तुम्हाला
नक्कीच वाटणार नाही . पण माझा खरडणे बऱ्याच जणांना बरे वाटायचे ( कोकणस्थी “बरे” म्हणजे  चांगले !!!)
असो !!! ताकाला जाऊन भांडे लपवण्यापेक्षा मुद्द्याला हात घालतो
सिनेमा सिनेमा !!! म्हटलं की ज्या लोकांना चंदेरी दुनयेची आवड आहे त्यांना लगेच “ पाहिलेला पहिला सिनेमा “ पाहिलेला -- बालक पालक ( बी पी), वीकेंड ला पाहिलेला सिनेमा अस समोर येऊ शकते. 
मी  लहानपणापासून सिनेमाचा फार शौकीन!!!
सिनेमा चांगला किंवा वाईट हे ठरवण्यासाठी एकदा तो पाहावा लागतो हे वाटणारा
नुसती टायीम्स चे स्टार आणि मसंद च्या पसंदी बरोबर माझी पसंद जुळवून घेणे म्हणजे दुकानात जाऊन साडी घेणाऱ्या बाईसारखे झाले . तुमच्यावर चांगली दिसेल म्हंटले की भिकार साडी सुद्धा घ्यायची आणि पाकीट हलके करायचे .

तर सांगायचा मुद्दा असा लहानपणापासून मी वेगवेगळ्या प्रकारे सिनेमा पहिला.वेगवेगळ्या गावाला …  विचार केला  लिहावी त्याची  गम्मत … 
गावातला  सिनेमा
मी लातूर मध्ये राहायचो घरात सिनेमाची खूप आवड . पप्पा कधीही दौऱ्यावरून आले की म्हणायचे चला सिनेमाला त्यावेळी जाम खुश व्हायचो कारण पप्पांबरोबर बाल्कनी वर बसायला मिळायचे. 
पण खरी मजा यायची सिनेमा मित्रांबरोबर पाहायला. मी गल्ली मध्ये राहायचो आणि आमचे सगळे मित्र कडके त्यामुळे कायम बाल्कनी सोडून थर्ड क्लास ला एकाला स्पोन्सर करून सिनेमा पाहावा लागायचा . आणि मग पुढच्या सीटवरून टपोरी पोरात सिनेमा पहायचे वेगळे थ्रिल असायचे . त्या फायटिंग ला शिट्ट्या . “ लघवी ची गाणी”) म्हणजे गाणी चालू झाली कि खालचा क्लास कायम बाहेर जायचा मला ते आजतागायत कळले नाही पण त्यामुळे जरा गर्दीत उकाडा कमी व्हायचा.
पुढची पब्लिक श्रीदेवी माधुरीला दाद द्यायला चिल्लर उडवायची . ते जाम आवडायचा पण बरेच दिवस कधी तसल माझ धाडस झाला नाही .. मग मी सैलाब सिनेमात पहिल्यांदा १ रुपयाची चिल्लर २० २० पैशाची पाच नाणी उडवली आणि काहीतरी जग जिंकल्याचा अनुभव घेतला. पण हे धाडस पन्नास वेळा अंधारात आपल्या बाजूला कोणी नाही हे पाहून केलेले त्यामुळे अजून धमाल . आजही हमको आज कल है ऐकला कि माझा पाहिलं धाडस समोर याते.
मल्टीप्लेक्स संस्कृतीत कदाचित असभ्य वागणुकीबद्दल आपल्याला बाहेर काढण्यात सुद्धा येऊ शकेल पण “वाजले कि बारा” पाहताना फेटा उडवण्याची धमाल जशी एखद्या रांगड्या गाड्याला येते तीच  चिल्लर उडवायला येते हे सभ्य लोक काय समजणार.
 ते गर्दीत जाऊन काढलेले तिकीट  . डोअर कीपर च्या ओळखीने तिकीट , लेडीज ला विनंती करून काढलेले तिकीट,.शाळेतल्या मैत्रीनीला भीत भीत विचारून आपले काढलेले तिकीट , पावसात उभा राहून काढलेले हम सिनेमाचे तिकीट.आणि ब्ल्याक ने काढलेले तिकीट. यामुळे सिनेमा तिकीट काढण्यापासून थ्रिल्लिंग असायचा . पहिल्या दिवशी पहिला शो आणि त्याला मिळालेले तिकीट कदाचित पहिल्या पगारापेक्षा मला आवडलेले आहे . कारण हाउसफुल शो मध्ये आपण एक आहोत याचा आनंद . चुकून माकून एखादा दुसरा मित्र विना तिकीट परत जात असला तर कोण आनंद!!!

विडीओ पार्लर सिनेमा
१९८५ ९० पर्यंत आमच्याकडे ५ ते ७ रुपये बाल्कनी असायची तरी आधी सांगितल्याप्रमाणे कडकीनंदन लोकांमुळे दीड रुपयात नव्या सिनेमाचा आनंद छोट्या पडद्यावर मी विडीओ पार्लर ला घ्यायचो यात आधी गाणी सुद्धा लागायची अर्धा तास आणि नंतर सिनेमा. आमच्या गावात नवीन सिनेमा रिलीज ला VIDEOला यायच्या. त्यामुळे व्ह्यल्यू फॉर मनी असा काहि म्हणतात तसा काहीतरी वाटायचा
२ चार वेळेला मी पाहिलेला अनाडी १०० डेज सुपरहिट झाल्यामुळे मी VIDEOला पाहिलेले सिनेमा सुपरहिट होतो अशी अंधश्रद्धा हि मी बाळगून होतो पण रूप कि रानी चोरो का राजा पाहिल्यावर माझा हा भ्रमाचा भोपळा फुटला .
अशाच या पार्लर मध्ये मला JACKY चेन , बॉंड यांची ओळख झाली आणि मी इंग्रजी सिनेमे पाहतो अशी आमच्या वर्गात कुख्याती व्हायला लागली( मराठी मध्यम!!!) . मी गल्लीत राहायचो आणि अभ्यासात पहिल्या पाचात असायचो तरी माझा नेहमी मागच्या बाकड्याचा ग्रुप होता . कॉलनी मधल्या पुस्तकी किड्यांना  “ स्कॉलर GANG” ला मी वाया गेलो आहे असे वाटायचे पण मी टर्मीनेटर ची स्टोरी सांगताना हीच पोर चोरून चोरून ऐकत बसायची. मी तिथे भाव खाऊन जायचो.
अशा पद्धतीने मी ज्यावेळी इंजिनीरिंग ला गेलो त्यावेळी  माझा सिनेमा थोडा बदलला!!!
केरळ चा सिनेमा
आमच्या कॉलेज च्या क्लब मध्ये ६ रुपयात सिनेमा दाखवायचे आणि ऑडी मध्ये खुर्च्या नवत्या मग आम्ही वर्तमानपत्र घेऊन जायचो आणि पाहायचो
पण आपल्या मित्रामध्ये पाहिलेला सिनेमा असा रॉयल वाटायचा. मग मी आईने दिलेली सतरंजी नेऊन थोडी राजेशाही बैठक सुद्धा बनवू लागलो . सगळी आमची पोर असा राजेशाही बसायची
आमच्या रागिंग मध्ये तेजाब आला होता तेव्हा आम्हाला पूर्ण स्टोरी विथ संवाद लिहायला सांगितली होती सिनिअर्सनी!!! तो तेजाब जगावेगळा होता
“ तेरी जिंदगी और मौत के बीच का फसला मुन्ना के चाकू कि धार से ज्यादा नाही है “ हा डायलॉग अजूनही मला तितकाच स्पष्ट आठवतो.
डॉल्बी तेव्हा नवीन प्रकरण होता . आम्ही क्राऊन नावच्या टाकीज ला पहिल्यांदा इंडिपेंडन्सडे पहिला त्यावेळी असा आवाज आयुष्यात पहिल्यांदा ऐकला होता आणि ३० रुपये सिनेमला सुद्धा पहिल्यांदा दिले होते.
कॉलेज पासून सिटी ३० किमी लांब होती  त्यामुळे रात्रीचा शो पाहायला आम्हला जीप करावी लागायची
एका महिंद्र जीप मध्ये आम्ही १० जन बसायचो “पुन्हा कडकी” त्या शो ला आम्ही जीप शो असा नाव ठेवलेले. शुक्रवारी २ तरी जीप जायच्या.
दिल से , सत्या ,दिल तो पागल  हे जीप शो ने पाहिलेलं काही सिनेमे
आम्ही शनिवारी ज्यावेळी जायचो तेव्हा एक हिंदी एक इंग्लिश असा सिनेमा पाहायचो नंतर थोडी ब्रांडी आणि मग पान आणि मग कॉलेज ला बस ने परत .
हा लोडेड सिनेमा सुद्धा जाम लक्षात राहायला.

पुण्याचा सिनेमा
कॉलेज नंतर नोकरीच्या शोधात जेव्हा पुण्यात आलो त्यावेळी नारायण पेठेत बस्तान मांडला एकदम
आयडियल जागा . विजय , अलका , प्रभात , डेक्कन चार चार टाकीज चालण्याच्या अंतरावर
इथे मी जाम इंगर्जी सिनेमे पहिले आणि तितके मराठी सुद्धा
दादा कोंडके च्या वाढदिवसाला पाहिलेला सोंगाड्या “ ४५ वर्षानंतर सुद्धा हाउस फुल जी मजा आली होती ती कदाचित कुठल्या दुसर्या मराठी सिनेमाला आलेली
मग सिटी प्राईडचा खूळ आला होता . स्क्रीन १ स्क्रीन २ . सिनेमाच्या न लक्षात राहणाऱ्या वेळा असा काहीतरी होता.
पण राहुल ला पाहिलेला लगान , डेक्कन ला पाहिलेला गदर आणि विजय चा GALDIATOR मनात घर करून गेलेले

दिल्लीचा सिनेमा
मल्टीप्लेक्स चे पीक आता भरपूर आले होते WAVE सिनेमा PVR वगैरे ही नाव पचनी पडली होती
सिनेमाला आधी जाऊन तिकीट काढायचे असते . बुकिंग करायचे असते. सेटर सीट्स . मैत्रीण असली कि कॉर्नर सीट असली काय भानगड असते जमाय्लागली होती
माझ्या लहानपणी अख्या वर्षात पाहिलेल्या सिनेमाचा तिकिटाची बेरीज दळभद्री पॉपकोर्न ला द्यावी लागत होती.
पण यात सुद्धा मी माझे दोन मित्र दर शनिवारी सिनेमाला जायचो . पॉपकोर्न टब घ्यायचो .आणि या मैत्रीमुळे बंटी आणि बबली , ब्लड डायमंड असे सिनेमे कायम लक्षात राहिले
सिनेमाची वेळ नऊ पासून ११ पर्यंत वाढलेली होती .

मुंबईचा सिनेमा
अस सगळ करून मी मुंबईच्या चंदेरी दुनियेत आलो . वाटला मुंबईत म्हणजे सिनेमाची मजा
पण नंतर कळले कि आपण पेपरात वाचलेले स्टर्लिंग, प्लाझा , रिगल पुष्कळ लांब असतात सिनेमा आपल्या सबर्ब मध्ये जवळ कुठे असतो हे त्या १०० सिनेमा थियेटर च्या यादीतून हुडकायचे असते
तीन दिवसात पाहिला तर पाहिला नाही तर तो शो नसायची शक्यता असू शकते
ऑफिस मधून यायला उशीर होत असल्यामुळे ११ चा शो पेक्षा ११.१५ चा शो असतो का रात्री हे BLACKBERRY वर चेक करावे लागते
सिनेमा अनुभव या जाहिरातीखाली १००० रुपये सुद्धा तिकीट असू शकते.

आजचा सिनेमा 

पूर्वी मी उभा राहून सुद्धा आवडीने सिनेमा पहिला. आता झोपून पाहता येतो ( थोडक्यात पाहता पाहता झोपून सुद्धा जाता येते इतका सिनेमा भिकार असू शकतो)
ऑन लाईन जाऊन तिकीट बुक करता येते कारण तुम्हाला तुमची सीट बुक करता येते.
पण याला गर्दीतून तिकीट मिळून शेजारी आपला मित्र भेटणे . आपल्या कॉलेज ची मुलगी तिकीट काढताना दिसल्यावर ती शेजारी येईल का ही प्रार्थना करणे असले अनुभव फक्त जुन्या कप्प्यात राहून गेले आहेत
१०० करोड चे गणित ,अगणित टाळ्या पेक्षा सिनेमा निर्मात्याला जास्त आकर्षक वाटू लागले आहे याला वाढलेल्या थियेटर ची संख्या , सिनेमाची तिकिटे , लोकांचे सुट्टी च्या दिवशी सिनेमा पाहण्याचे प्रमाण हे कारण आहे  ..
पण २५ आठवडे झालेला साजन जेव्हा हार घातलेल पोस्टर पाहून अजून एकदा हाउस फुल व्हायचा तोच आता २०० कोटी कमावलेला एक था... होतो का? होईल का ?
आजकाल एस एम एस ने फोडलेला सस्पेन्स -जुन्याकाळी पेपर मध्ये “ सुरवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका” या जाहिरतेपेक्षा गतिमान झाला आहे.
सिनेमा पाहून आलेला माणूस जुन्या चकाळात गुणगुणत असलेल्या गाण्याने , घरात पाउल ठेव्तानाच्या वेळेमुळे किंवा आपल्या शेजाऱ्याने पाहिल्यामुळे पकडला जायचा.
आता या प्रकारची भीती नाही सिनेमाची उत्सुकता नाही ( प्रमोशन कैक प्रमाणात वाढून सुद्धा)
सिनेमाचा थ्रिल राहिला आहे का नाही मला नेहमी प्रश्न पडतो . हा विचार एक अंगी असू शकेल. कदाचित आजचा कॉलेज कुमार जास्त प्रकाश टाकू शकेल.

पण तरीही मी वेळात वेळ काढून सिनेमाच्या वेळा पन्नास वेळा पडताळून ( इतका मी लॉग टेबल सुद्धा पहिला नाही  इतका ) सिनेमा पाहतो
इंग्लिश विन्ग्लीश, आणि प्रेमाची गोष्ट जेव्हा मी हाउस फुल शो ला पहिला त्यादिवशीपासून असा काहीतरी लिहावा असा मनात होता
त्याला आज  गुगल काकांनी शब्द दिले ...

प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही सिनेमा असतो आणि तो तुमच्या सुद्धा असणार . त्यामुळे कुठेतरी जरा सिनेमा राईड मारून पहा.. नक्की मजा येईल


जयदीप भोगले
२१ . 0२ . १३ 

Friday, October 12, 2012

अचानक

अचानक
डोळ्यांची साथ आज नसणार अचानक
मनाच्या सफरेची वाट संपणार अचानक
गाठ पडली स्वप्नात अलवार जरीही
पहाटेच्या हाकेने रात्र सरणार अचानक

रेशमी केसांचा ढग का जाई अचानक
हास्याचा पुष्कर जसा विरतो अचानक
इशाऱ्यांची भाषा उमजली जरीही
निरोपाचा शब्द का खटकतो अचानक

या नात्याचा शोधू नको किनारा सखे तू
नाव माझी दर्यात तुला दिसेलही अचानक
खलाशी मी असे स्वप्नातल्या जगाचा
पुनवेची लाट सांगेल माझी खुशाली अचानक

भेट ही अचानक विरह ही अचानक
शेवटच्या गावी का झाली सुरवात ती अचानक
शब्दाची भरती आता ओसरे जरीही
भावनांची लाट तरी उचंबळते अचानक

Friday, July 27, 2012



असूया 


सूया  आणि  प्रीती  दोन   मैत्रिणी  
.
एक  बागडे   फुलासंगे  एक   जणू ती  काट्यावाणी  

गाणे  एकीच्या  आयुष्यात तर  एकीच्या  डोळ्या  सदैव   पाणी 

मोकळे  आकाश   महाल  प्रीतीचा  असूयेची  हवेली  सदा  विराणी
 
कटू  सत्य  प्रीतीला  भावे  .खोट्या  सुधेची  असूया  दिवाणी
 
प्रीती  जगते  मरतानाही  . असूया  जगुनी  अश्मावानी 

एक  मनाला  आरसा  दावे  एक  म्हणते  पहा  चोरुनी 

प्रीती  हसत  हलाहल  पचवी  . असूया  मरते   कट्यार  घेउनी 





जयदीप भोगले



Monday, April 9, 2012

वेगळेपण

काही कविता कुणा कवीच्या जुन्या कवितेने प्रेरित होऊन केलेली असते
काही जणांना हे अन्नू मलिक ने  केलेल्या संगीत दिग्दर्शनासारखे वाटू शकते .ही कविता माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर यांना सलाम करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या इतके उत्तम नक्कीच जमणार नाही पण कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न !!!!
 कुणाला आवडली तर दाद जरूर द्या



प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुझा फक्त वेगळं बाकी सगळ्यांचं सेम असतं


कधी हसून असतं तर कधी गप्प बसून असतं 
ओपन वाटले तरी कुठेतरी लपून असतं


कधी ते गुलाबाचं फुल असतं तर कधी पाळण्यातले हसरे मुल असतं 
बोल्ड वाटले तरी जगाला कसा घाबरून असतं

कधी ते सिंड्रेला होतं तर पावसात कधी माझी अम्ब्रेला होतं
दूर वाटले तरी हळूच कसं आपलंसं होतं

कधी शब्द असतं तर कधी गाण्याचे बोल असतं
जीव जरी माझा पण त्याचा जणू प्राण असतं


जयदीप
६ एप्रिल २०१२


वेगळेपण 

Wednesday, February 22, 2012

मृगजळ



मृगजळाच्या या वाटेवरती तृषार्त मी राहिलो
उजेडाच्या भ्रमात जणू मी अंधारात नाहलो 
त्या क्षणांची वाट पाहुनी दिवस असे लोटले
आयुष्य पुढे निघून गेले मी मागे राहिलो
गुलाब तो  मग काटे सुद्धा असतील हे मी जाणिले
सुवासाच्या शोधात जणू मी कस्तुरीमृग जाहलो 
मृगजळाचा भास होता आता मी जाणिले 
डोळ्याच्या भोवऱ्यात अडकून मी अश्रूत मी वाहलो 

जयदीप भोगले
२२ फेब्रुवारी 2012

Monday, February 6, 2012

कामवाली बाई


कदाचित ही कविता वाचल्यावर मी किती स्त्रीसहीष्णू  आहे याची तुम्हाला कल्पना येईल .. :) 

सध्याच्या काळात कामवाली बाई हा कदाचित शेअर बाजार आणि राजकारणाइतकाच महत्वाचा विषय होऊन बसला आहे 
या व्यक्तीमुळे मला एकदा असे वाटले की, कामवाली बाई आणि त्याचा अर्थकारणावरील प्रभाव असा लेखच लिहून मोकळे व्हावे 
पण मग विचार केला हा जर लेख आमच्या घरच्या रेश्मा ने वाचला तर झाडू पोछा आणि पुरुष असा लेख मला लिहावा लागू शकतो .. असो

ही कविता सर्व सुनांना आणि तमाम महिला वर्गाला अर्पण ..कदाचित आपल्या मनातले माझ्या लेखणीत उतरले असे वाटले तर दाद जरूर द्या ..







कामवाल्या  बाईवर  माझे  अचानक  प्रेम  बसले
आणि  प्रेम  केले  तेव्हाच  तिचे  कामाचे   खाडे . दिसले
रोज २  पोळ्यांचा  घास  ही मी  भरवला 
पण  मझ्या  हातचे  पोळलेले   डाग    तिला का   नाही  दिसले ?
तिचा  फोन   घेताना  नवऱ्याचा फोनही  कट  केला 
पण  इनकमिंग  कॉल   असल्यामुळे  लोकांना  त्याचे  बिल  नाही  दिसले ...
स्वप्नामध्येसुद्धा   बाई  काम  करताना  दिसते 
पण  जागे  झाले  की  ती  येणार  नाही  एवढेच  मात्र  कळते 
जगी  माझ्या  मैत्रिणीनो,...   घरी  नाते  तेव्हाच  टिकते 
३०  दिवस  बाई  ज्यांच्या  घरी  कामावर  येते 
पण  हे  सुख  कधी  येणार  कळतच  नाही 
 . प्रेम  करत  मी  बिचारी  एकटीच  फसले

Friday, December 16, 2011

सवयीचा गुलाम



मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे
           गुन्हेगार ती माझ्यापेक्षा ,
 एकटेच मी का मरावे
जर  मी अपराधी बेधुन्धीचा 
मग पाण्याने सुरा का बनावे 
देव म्हणतो श्रद्धा ठेवा
मग दगडात त्याने का लपावे
मीरेला जर विष देती दुनिया
कृष्णा तुझसी का पूजावे
सवाल माझा सवयीला या,
श्वासाला का सवय म्हणावे ?
असेल जर ती सवय जगाची
श्वास आणि जग मग बंद पडावे .
मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे


जयदीप भोगले 
१५.१२.२०११ 

Tuesday, March 8, 2011

उलझन या सुलझन



लग्न कदाचित स्त्री च्या आयुष्यातला सर्वात रोमांच आणणारा क्षण .. कदाचित हे आरेंज मंरेज साठी जास्त लागू पडेल ..
पण जेव्हा स्त्री आपले सर्व आप्तेष्ट सोडून एका नवीन संसारात जाते त्यावेळी लग्न कुठल्या पद्धतीन झाले त्याला कदाचित काही महत्व आहे ..
अशा लग्नाच्या आधीच्या रात्री नव वधू च्या मनात काय विचार येत असतील हे या हिंदी कवितेत लिहण्याचा प्रयत्न मी केला होता
ऐन तारुण्यात , पुरुषाचा जन्म घेऊन अशी कल्पना करणे मला खरच खूप अवघड गेले .. कवितेचा प्रासाद तितका चांगला आहे का नाही ते आपण ठरवाल .. पण मला हि कविता  माझा एक वेगळा प्रयत्न म्हणून खूप जवळची आहे .. आवडल्यास प्रतिक्रिया .. न आवडल्यास चर्चा  नक्की आवडतील ..

जे डी



किस सोच मे पडी है आज तू 
जा रही है कल परदेस
पराया हो जाएगा बाबुल का घर
अपनाना है पिया का देस




कितनी ख़ुशी की है यह घडी
पर समय क्यों नहीं बताती है ये 'घडी'
विचारमंथन में अटकी हूँ मै
दुल्हन का अहसास जी रही हूं मै

हर्षोल्हास में है  रिश्ते मेरे
पर जीवन की शुरवात है मेरी
हर्षित पराये क्यों है सारे
लहरा रही फुल की मालाएं
चमक रही है साड़ी दिशाएं 
लाडोरानी थी इस घर की मै
संवारना होगा मुझे पहनके लाज का भेस

एक सपने जैसी है कल की भोर 
मंगल वादन होगा चारो ओर
सात फेरे कल चलूंगी मै
जिसके दम पे जीवन यात्रा आरम्भ करुँगी मै

सुशोभित होंगे सारे
सजायेंगे मुझे मेरे अपने प्यारे
मेहँदी भी कल रंग लाएगी
मोती की माला भी चमक जायेगी
पर क्या जीवन का हल होंगे ये सारे
इस प्रश्न ने किया है मन में प्रवेश 

एक अजनबी के साथ
बसर करना है मुझे 
परमेश्वर की प्रतिमा होगा क्या वह
या मानूंगी मै पति परमेश्वर उसे
सुहाने सपने सभी के मन को प्यारे
पर सपने यूँही सच होते है क्या सारे 
क्या इसका मुझे हो सकेगा अंदेश ?

स्वर्ग का सपना सभी को रहता है
पर स्वर्ग आज तक किसने देखा है
यह आजमाना है मुझको
जब मै करुँगी मै एक नया गृहप्रवेश 

एक जीवन की शुरवात है ये
ये है एक मेरे मन की बंदिश
एक स्त्री को तरल मन का सन्देश
दुल्हन बनूँगी मै 
हो जाएगा देस .... परदेस 
पराया होता ही है बाबुल का घर
अपनाउंगी  मै पिया का देस 

जयदीप भोगले 
२९/०६/९९


Thursday, March 3, 2011

..वॅक्सीऩ (कथा )



वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक पोलिसाच्या चेह-यावर दिसत होती .
'मला अभिनव सपकाळ ला भेटायचे आहे' ती उद्गारली ...
 बाई त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही  मीनलकडे न बघता हवालदार म्हणाला  .. पण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर  आहे .. बाई कशाला त्या नागाला भेटता आहात ..खुनी आहे तो आणि ते सुद्धा तीन तीन 
पाणीप्रश्न , भ्रष्टाचार , नवीन सिनेमे ,इकडे लक्ष द्यायचे सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या वार्ताहराने इकडे यायचे आणि उगीच फुकट वेळ घालवायचा .. शासनाचा आणि तुमचा .. 
बर आता तुमच्या शासनानेच पत्र दिले आहे ना... मग सोडता का मला मीटिंग रूम मध्ये ? बर तुमच्या झडती वगैरे फोर्म्यालिटी  करून घ्या .. तसे आम्हाला आमचे पेन हे शस्त्र पुरेसे असते साहेब आणि मी शस्त्र बाळगत नाही ..
घुगे बाई , बाईंची झडती घ्या आणि त्यांना मीटिंग रूम मध्ये बसवा आणि त्या अभिनव सपकाळ ला आणा आणि हो... बेड्या तशाच ठेवा लई बाराचा आहे तो .
परब हवालदार दुरून मीनलचा  आढावा घेत, तंबाकू चोळत  कोठावळे हवालदाराला म्हणाला ..' आयला बाई वरपासून खालपर्यंत कसा आयटम बॉम्ब आहे आणि म्हणते की माझ्याकडे काही शस्त्र नाही ' 
मीटिंग रूम मध्ये दोन लाकडी खुर्च्या आणि एक मोठे टेबल होते दोन खुर्च्यामध्ये बरेच अंतर .. एक छोटा ६० चा दिवा आणि तो जवळजवळ १५ फूट उंच त्यावर सुरक्षा टोपी आणि जाळी लावलेली ..
एक पंखा ... आयुष्याची शेवटची घटका मोजत असल्यासारखा फिरत होता 
..बाई बसा .. आणि हो नुसते बसा आरोपीच्या जवळ वगैरे जायचे नाही .. तशी ऑर्डर आहे ... 
साहेब मी एक जबाबदार नागरिक आहे .मला माझे काम करायचे आहे ..मी गप्पा मारयला नाही आले सपकाळ कडे ..मीनल पोलाईट अशी हळुवार बोलली . ' नाही म्हटले नियम सांगितलेला बरा'... परब टोपी सावरत म्हणाले .
अभिनव आला .. मिनलच्या बरोबर समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला ...
 हातात बेड्या .. चौकडा शर्ट , जीन्स , चौकोनी मेटल फ्रेम  चष्मा. ..पोलीस कोठडीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळे  थोडीशी खुरटलेली दाढी ..५ फुट १० इंच उंची .. सोल्जर कट केस कापलेले ...स्थिर दृष्टी आणि
 चष्मा नाकाला खाली आल्यानंतर थोडेसे वर करण्याची सवय . कुठल्याही माणसाला हा बाहेर भेटल्यास हा एक हुशार सी ए  किंवा इंजिनीअर आहे असेच वाटले पाहिजे आणि टी डी एच कॅटेगरी मध्ये येणारा असल्यामुळे 
ब-याच मुलीनाही तो हवा हवा वाटेल असा ... हा मनुष्य खुनी .. काही पटत नव्हते
एम एस सी बायो केमिस्ट्री फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव सपकाळ खुनी ... काही मनाला पटत नव्हते म्हणून आले ..' हाय 'आय अॅम...'.... मीनल जोग ना? अभिनव उद्गारला ..
तुम्हाला माझे नाव कसे माहिती? मीनल थोडी आश्चर्याच्या धक्का लागून न दाखवता म्हणाली .. अहो माझे शिक्षण तुम्हाला माहिती .. मार्क माहिती .. मग मला तुमच्यासारख्या पब्लिक फिगर  चे नाव नको माहिती ?
पण मी एक वार्ताहर आहे दर वर्षीचा युनिवर्सिटी चा  निकाल मला माहित असतो .. आणि तडफदार लोकांबद्दल माहिती ठेवणे हा माझा छंद आहे .. अभिनव पुटपुटला ..
असो अभिनव मला तुझी कहाणी ऐकायची आहे ... मला अजूनही विश्वास बसत नाही की असे काही घडले असेल .. मी अॅडवोकेट परांज्प्यानाही ओळखते त्यांना मी ही केस समजावून सांगते .. 
जर जगातून एक हुशार माणूस  या सिस्टीमच्या हलगर्जीपणामुळे जाणार असेल तर माझी लढ्याची तयारी आहे ...
थ्यांक यु मीनल तो एकेरीवर आला ...खरे म्हणजे एक खुनाला फाशी आणि दोन  खुनाला तर नक्कीच मिळणार म्हणून मी अशा सोडून दिली होती .. पण तू आलीस आणि आधार वाटला .. फील सो रील्याक्सड ..
पण अभिनव यात तू अडकलास कसा .. आय मीन सिस्टीम मध्ये पाणी मुरते पण कुणालाही ती खुनासाठी नक्कीच पकडत नाही ...
मीनल मी एम एस सी झालो आणि काहीतरी करावे जगाला काहीतरी द्यावे याने झपाटून उठलो .. मी एका ग्यारेज मध्ये एक छोटी प्रयोगशाळा चालू केली .. रात्रंदिवस तिथे पीपेट आणि ब्युरेट माझे मित्र बनले ..
एक शोधाने मी झपाटून गेलो होतो. जेवायची शुद्ध नव्हती. आणि तो दिवस उजाडला .. मी माझे रिसर्च पूर्ण केले होते ... प्रयोग यशस्वी झाला होता...
कुठला शोध ?  ' अभिनव ने इकडे तिकडे पाहत हळूच मीनल ला सांगितले याबद्दल कुणाजवळ सुद्धा बोलयचे नसेल तर मी सांगतो कारण सध्या हे फक्त मलाच माहित आहे ..
मीनलची उत्कंठा वाढत होती ...ट्रस्ट मी आणि तुझ्याकडे कदाचित ऐकून घेणारे आणि पोहचणारे अजून कुणी आहे असे मला वाटत नाही ..
अभिनव हळूच म्हणाला .. मी एक ..वॅक्सीऩ तयार केले आहे ...... कसले .?..अॅन्टी वायरस ...  जे  कुठल्याही वायरसपासून  तुम्हाला प्रोटेक्ट करेल ..तुम्हाला मुक्त करेल अशी संजीवनीच समज ना...
मीनल आवक होऊन त्याकडे पाहत होती ... अॅन्टी जीवाणू  औषधे ..वॅक्सीऩ  आहेत पण हे जरा विचित्र आणि अभिनवच होते ...
हे मग तू कुणाला प्रेजेंट का  केले नाहीस . त्यातच प्रोब्लेम झाला मीनल ...आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला
मीनल ला काही समजेना .. तिने शांत राहूनच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला ..एक पाच मिनिटानंतर त्याने पुन्हा बोलायला सुरु केले 
मी गिनिपिग वर ते प्रयोग केले पण मला माणसावर तो प्रयोग  करायचा होता . मी माझ्यावर तो केला असता पण त्यावेळी जर काही घडले तर उपाय करायला कुणी असायला हवे म्हणून मी माझ्यावर केला नाही.
एके दिवशी मी रात्री मानखुर्द हून परत येत होतो .. स्टेशनवर उतरलो .. सामसूम होती ..एक तरुण मुलगा मला दिसला ... तो चालत होता त्यावेळी मी म्हणालो सेक्टर २१ ला जाताय का ? तो म्हणाला नाही १९ ..
मी म्हणालो आपण बरोबर चालत जाऊ या का ? मला कुत्र्यांची जाम भीती वाटते ... मग आम्ही चालता चालता कळले की तो कॉल सेंटर मध्ये कामाला होता ...
मग त्याला मी माझी कथा सांगितली आणि हळू हळू जर प्रयोग यशस्वी झाल्यास त्याला रीतसर मानधन देण्याची कबुली दिली .. मुलगा तयार झाला  ... तो माझ्याबरोबर  आला .. मी रूम वर आलो आणि त्याला बसायला सांगितले हळूच मी सिरींज आणि फ्रीजमधून ..वॅक्सीऩ  काढले ... छाती धडधडत होती ...त्याला दिले आणि त्याला हळू हळू अंधारी यायला लागली .. मी त्याला विचारले कसे वाटते आहे ? तो म्हणाला खूप झोप येते आहे ..
मग हळूच त्याच्या खिशाकडे माझे लक्ष गेले .. मला एक हाताने वळलेली सिगरेट दिसली .. मला त्यात हशीश होते हे कळायला वेळ लागला नाही .. 
मी त्याला बाहेर पोहचवले आणि घरी जायला सांगितले .
सकाळी उठलो तर रस्त्यावर बरीच गर्दी होती पाहिले तर रात्रीचा मुलगा होता .. तो मरून पडला होता ... मला कळून चुकले होते .. की त्याच्या ड्रग घेण्यामुळे ..वॅक्सीऩ  ने काम केले नव्हते आणि कदाचित ड्रग ओवरडोस मुळे त्याचा मृत्यू झाला होता ..
मी घाबरलो आणि तिथून निघून गेलो ... कदाचित मी खून केला आहे असेच लोक समजतील म्हणून मी ती जागा सोडली ... काही ..वॅक्सीऩ बरोबर घेतल्या ..
सेक्टर ४९ मध्ये घर घेतले .. तीन महिन्यानंतर पुन्हा प्रयोग चालू केले एका गायीवर आणि कुत्र्यावर केले आणि ते यशस्वी ठरले .. पुन्हा मला माणसाची गरज होती जो याला तयार होईल ..
एकदा पनवेलहून रात्री येत होतो ... उतरलो आणि चालू लागलो ... गाडी सायडिंग ला जाणार होती .. अचानक मला लेडीज डब्यात एक वेडसर बाई दिसली .. तिने मला पाहताच वडा पाव वडा पाव असे ओरडायला चालू केले..
मला वाटले हीच एक संधी आहे .. ही काही ड्रग घेणारी .आजारी दिसत नाही . वेडाचा सबंध मेंदूशी ... मी हळूच माझ्याजवळ असलेले चिप्स काढले आणि तिला दिले ..
ती अधाशासारखी तुटून पडली .. मी हळूच सिरींज आणि ..वॅक्सीऩ  काढले .. आणि तिला दिले .. २० मिनिटानंतर तिला चक्कर यायला लागली .. माझ्या ..वॅक्सीऩ  दिल्याचा अर्धा प्रयोग यशस्वी झाला होता.
हातावर एक फोड आला होता.. मला प्रयोग यशस्वी वाटला ...आणि नंतर अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली ... मी तिला ओब्सर्व करायला सुरु केले ...तिचा श्वास  बंद पडू लागला होता..
अचानक तिच्या डोक्याला ती   झटके देऊ लागले .. आणि ती बहुतेक गतप्राण झाली ..
दोन्ही वेळी माझ्या ..वॅक्सीऩ मुळे काही न होता त्यांच्या आजारामुळे मला अपयश आले होते ..मी घाबरून पळ काढला पण सिरींज तिथे होते ..
काही महिन्यानंतर पोलिसांनी मला पकडले आणि आता मी कोठडीत आहे .. 
मीनल चे डोके सुन्न झाले होते दोन तास कधी संपले ते तिला कळले नाही .. ती तडक तिथून उठली  आणि चालू लागली..
तुम्ही तरी विश्वास ठेवाल वाटले होते .. अभिनव आशेने म्हणाला ...पण तिने परत मागे पाहिले नाही ..
दोन दिवसांनी ती परत पोलीस चौकीवर आली .. यावेळी ती जास्त निर्विकार आणि ठरवून आल्यासारखी वाटत होती ...
तिने पुन्हा फोर्म्यालिटी केल्या .. परवानगी मिळवली .. अभिनव यावेळी जास्तच भयानक वाटत होता .. त्याला कदाचित थर्ड डिग्री मिळाली होती .. रक्त साकळल्यासारखे  वाटत होते.
त्याच्याकडे पाहून  तिने एक स्मित केले आणि म्हणाली .. अभिनव आय अॅम विथ यु .. मी दोन दिवस विचार  केला नेटवर माहिती काढली ...तुझा शोध जगापुढे पोहचवणे आवश्यक आहे ... मला सांग मी कशी मदत करू शकते .. मी माझ्यावर प्रयोग करायला तयार आहे .. पण अभिनव म्हणाला मला बेड्या आहेत .. आणि ..वॅक्सीऩ  घरी आहे .. पोलिसांनी घर सील केले आहे ...
ती म्हणाली ते माझ्यावर  सोड .. मी उद्या परत येईन .. तुझी सुटका माझ्यावर लागली .. आणि जगाच्या पुढे शास्त्रज्ञ आणण्याचे क्रेडीट माझे ...दोघांनी एक स्मित केले 

सेक्टर ४९ च्या खोलीकडे मीनल गेली ... आढावा घेतल्यावर कळले .. पोलिसांनी दरवाजा सील केला होता पण खिडकी नीट बंद नव्हती तिने हळूच ती उघडली .. फ्रीज समोर होते . वार्ताहराच्या जीवनातला सर्वात थरारक क्षण ती अनुभवत होती . तिने खिडकीला हलवले आणि दोन गज गळून पडले .. मुंबईच्या पावसाने आणि खा-या हवेने तिचे काम सोपे केले होते .. खिडकी गंजलेली होती ..
तिने आत चढून व्याक्सिन आणि सिरींज घेतली पर्स मध्ये टाकली .
दुसरा दिवस एक ऐतिहासिक ठरणार होता .. तिला झोप येत नव्हती .. कसे बसे झोपून सकाळी १० वाजता तिने पोलीस चौकी गाठली ...
परब कोठावळे हवालदार आता मीना जोग ला जणू ओळखायला लागले होते .. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी झडती वगैरे झटपट होऊन गेली ...
आधी मीटिंग रूम च्या शेजारी उभ्या राहणा-या    कॉन्स्टेबल  घुगे  बाई इकडे तिकडे टंगळ मंगळ करत होत्या  .
अभिनव आला ... आज तो बराच बारा दिसत होता .. डोळ्यात कसली तरी चमक वाटत होती . तो तिथे बसला ..
मीना जोग ने कन्सेंट बरोबर लिहून आणले होते .. हा प्रयोग ती स्वखुशीने करत आहे हे त्यात नमूद होते ... पण कुठे ना कुठे अभिनव वर विश्वास बसला होता ..
तिने अभिनवच्या मार्गदर्शनाने व्याक्सिन सिरीन्ज्मध्ये घातले आणि आपल्या उलट्या हातावर च्या शिरे मध्ये हळूच सोडले .. अर्ध्या तासासाठी चक्कर येणार हे तिला माहित होते .. यामुळे ती चक्कर आल्यावर निषींत होती ..पण अभिनव ने तिला विचारले ... आता कसे वाटते आहे ?
 ती म्हणण्याच्या अगोदरच तो म्हणाला आता तुला हळू हळू सुन्न वाटू लागेल आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल..',मीना  आयुष्याच्या  शेवटच्या क्षणी सगळ्यांना  असेच होते'  अभिनव थंड पणे उद्गारला 
 ... हे वाक्य ऐकताच तिला धक्का बसला .. तिन हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरीर अधू वाटू लागले होते. अभिनवच्या चेह-यावर एक आसुरी आनंद यायला लागला होता ... अत्यंतबेडरपणे त्याने हसायला चालू केले 
आणि म्हणून लागला ' इनिस्पेक्टर सांवत ने मला सांगितले होते की त्यांच्या चौकीत आता आलेला खुनी फासावर गेल्यावर  सुटका होते .. तू २ ३  लोकंना विनाकारण आपल्या विकृत मनोवृत्तीने मारुन टाकले आता बघू कसे मारशील ?'
 मी बाहेर कुत्री गाई माणसे मारली .. मी म्हणलो होतो ना त्यांच्यावर प्रयोग केला ....
मी मनाशी ठरवले होते .. 'आयला   पोलीस कोठडीत मारण्यात एक वेगळेच थ्रील आहे' ...आणि या वाक्याने मीनल ने हंबरडा फोडला .. पोलीस गोळा झाले .. सिरींज पाहिल्यावर मीनल जगणार नाही हे त्यांना कळून चुकले होते..
३ खून करणा-या नराधम अभिनव ला चौथ्या खुनानंतर सुद्धा  एकदाच फाशी होणार होती .. कदाचित मनोरुग्ण म्हणून त्याला असायलम मध्येच जिवंत ठेवावे लागणार होते ..
परब यांना मी शस्त्र बाळगत नाही या मीनल च्या वाक्यावर खूप वाईट वाटले .. आणि त्यांनी मनाशी म्हटले बाई तुम्ही शस्त्र नाही  ठेवले पण एका खुन्यावर विश्वास ठेवला ..खुन्यावर विश्वास ठेवला  

जेडी 
३ मार्च २०११ 

या कथेतील ठिकाण आणि पात्र या सर्व काल्पनिक आहेत ..कृपया यावरून कुठलाही ग्रह माणू नये किंवा विचार करू नये 

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...