Monday, October 4, 2010

निरोप

अखेरची ही साद तुला सखे
तुझा गाव सोडतो आहे
तू नसशील परी मन तुझा निरोप घेऊ पाहे
       
आता दिसणार नाही ती साउली
       फ़क्त स्वप्नात शोधणार आहे
       आयुष्याच्या उंब-यावर जणू तुझी वाट पाहणार आहे


मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल   झाली
आता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे

तू काचेच्या महालात मी फुलांच्या कुंपणात आहे
दोघे जणू मुक्त पण मन बंदिवान आहे
   
आता विचार नको प्रिये काय होते काय होणार आहे
   जुनी पाने गळतात  तेव्हा नवीन पालवी येणार आहे

  जयदीप भोगले   
१० मे २००२

No comments:

Post a Comment

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...