Sunday, July 5, 2020

मला उमजललेले गुरू"



गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात गुरुबद्दल कृतज्ञ होण्याचा दिवस..

आपण जे काही आहोत ते आपल्याला कुणी तरी केलेल्या संस्कारामुळे ,कधी जाणतेपणाने असतील किंवा कधी नकळत होणाऱ्या अनुभवाने सुदधा असतील ,त्याची एक आठवण ठेवून त्याबद्दल आभार मानायचा दिवस.

' आजकालच्या secret  असू देत किंवा  बुद्ध धर्माची ' lotus sutra' असू देत " Gratitude" या संकल्पने ला सर्वात जास्त महत्व दिले आहे .या धर्तीवरच की काय आपल्या संस्कृती मध्ये  सुदधा व्यासपूजन व गुरुपूजन, त्याबद्दल असणारी  कृतज्ञता व्यक्त  करावी म्हणून हा दिवस राखून ठेवला आहे.

गुरू म्हणजे शिक्षक जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो मग ते पहिले पाऊल टाकायला शिकवणारी आई असेल की, पहिल्यांदाच रस्ता ओलांडायला शिकवणारे बाबा असतील . पहिली बाराखडी शिकवणाऱ्या आपले गुरुवर्य की अगदी आपल्या सध्याच्या व्यावसायिक  जीवनात आपले न भावणारे वरिष्ठ असो यांचे अपल्यावर कळत नकळत संस्कार होत असतात त्यातून आपण घडत असतो.
गुरू  आपल्या संपर्कात येणारा मूर्त माणूस सुदधा असतो किंवाआपली कर्मभूमी, आपल्या अवतीभवती असणारा समाज, अगदी निसर्ग हा सुदधा आपल्या वर गुरुप्रमाणे संस्कार  करतच असतो व तो सुदधा कधी आपल्या गुरूस्थानी जातो हे कळत नाही त्यांना सुदधा धन्यवाद देण्याचा दिवस.

 ज्योतिष शास्त्रात सुदधा गुरू ला फार वरचे स्थान दिले आहे आणि असे म्हणतात गुरू ज्या स्थानावर दृष्टी टाकतो ती शुभच असते  आणि म्हणूनच गुरु ही व्यक्ती असो की अमूर्त शिकवण, ती वयक्तिक रित्या कशीही असो ती जेव्हा गुरुस्थानी येते ती कायम आपल्याला नवीन काहितरी देऊन जाते . मग कधी काय करावे असेल तर कधी काय करू नये सुदधा..

गुरू शिष्य नात्यात बऱ्याच वेळा किंवा नेहमीच म्हणा शिष्याला जास्त प्रकाशझोत मिळतो मराठीमध्ये "Limelight"... आणि मग लोकांची गाडी वळते अरे याचा गुरू कोण ?? मग काही जण त्याला अमूर्त स्वरूप देतात व काही द्रोणाचार्य रूपी मूर्त व्यक्ती कडे नतमस्तक होतात.  सर्व ठिकाणी त्याच्या प्रत्येक वळणावर त्याला असंख्य गुरू भेटतात  व या सर्व गुरूस्थानी असणाऱ्या लोकांना स्मरण्याचा हा दिवस.

 त्यामुळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जर आपल्याला प्रश्न पडला असेल माझा गुरू कोण ?? आजकाल गुरू शिष्य परंपरा नाहीच उरली .. गुरू असं काही म्हणावं असं काही कुणी मला समोर येत नाही... त्या सर्व जणांना आपला लहानपणापासून ते आत्तापर्यंत  डोळे बंद करून तुमच्यात बदल घडवणारे आईवडील असो की अगदी  कायम वेळेवर धावून आपल्याला वक्तशीरपणा शिकवणारी मुंबई लोकल असेल ही सुद्धा गुरुस्थानी मानून कृतज्ञ व्हायला हरकत नाही .
आणि ज्यांना आपले प्रमुख गुरू वंदनीय असतील त्यांना वंदन करून काही गुरुवर्य जे तुमच्या आठवणीत मागे पडले असतील त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञ व्हायला हवे

कारण एक कृतज्ञ  शिष्यच आपल्या गुरुला सर्वोत्तम बनवतो .


जयदीप भोगले
5 जुलै 2020

Friday, February 14, 2020

जोडीदार आणि ड्रेस ची निवड



मला नेहमी जोडीदार शोधणे आणि ड्रेस घेणे यात साधर्म्य वाटले आहे . हा काही जणांना अगोचर पणा किंवा how mean ?? how insensitive  असं वाटू शकतं पण कल्पकतेला  मर्यादा असू नयेत… नाही का ?? म्हणून हा शब्दप्रपंच…
ड्रेस घेताना आपण ब्रँड , कलर, कपडा व फील, ट्रेंड,किंमत, कुठे मिळतो आणि फिट व कम्फर्ट या सर्व  कंगोऱ्याचा विचार करत असतो . सगळे लोक या गोष्टी उघड बोलत नसतीलही पण जोडीदार निवडताना  याचा कळत नकळत  विचार होत असतो
: ब्रँड - कुठल्या कॉलेजचा ,शहर ,IIT IIM  या गोष्टी ला काहीजण प्राधान्य देतात . गावाकडचा वाटतो... बांद्रा मध्ये राहतो ... पेठेत राहतो ... अरण्येश्वर ला बंगला आहे   या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे ऐनवेळी काहीतरी गडबड आहे असं जाणवायला लागते
रंग -हा कपडा व जोडीदार हुडकण्याचे एकदम हुकमी माप .. या मध्ये हा रंग नाही का ?? असे विचारणारे लोक जोडीदार सुद्धा काळा, गोरा ,लक्ख गोरा ,सावळा, उजळ,  तरतरीत असले डोक्यात ठेवून आपलं ठरवत असतात
यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वधू वर या सगळ्या मध्ये हे सर्व मापदंड लागू असतात हे मला इथे विशेष सांगावे वाटते..
कपडा व फील .. जोडीदाराची भाषा ,  शिक्षण झालेले माध्यम जात धर्म जन्मगाव असले तक्ते म्हणजे कपडा व फील सिलेक्ट केल्यासारखे आहे.. रंग छान आहे पण कपडा 100 टक्के कॉटन नाही असं म्हणण्यासरखं असतं
 ट्रेंड आणि किंमत -आता आज valentine day   असल्यामुळे हा मापदंड जास्त जवळून हाताळावा असं मला उगीच वाटतंय
वधू किंवा गर्लफ्रेंड हुडकताना ट्रेंड हा लोकांना एकदम नवाच हवा असतो .. जितकं मॉडर्न तितकं महाग असतं .. महाग असलं की परवडत नसतं .. अगदी धाडस केलं तरी हे मॉडर्न प्रकरण आपल्या एरियात कसं वागवायचं हा एक मोठा प्रश्न असतो .. एकदम हटके हे तितकंच हटलेलं सुद्धा असू शकतं तरी एकदम चम्या दिसतो .. एकदम काकुबाई वाटते... बाबा आजम के जमानेकीं वगैरे असल्या उपाधी आपण ऐकल्या असतीलच ...
: कुठे मिळतो - हा प्रकार जरा नवीन वाटला तरी सुदधा तितकाच महत्वाचा निकष ठरवला जातो
आपल्याला आवडणारा पॅटर्न आपल्याला परवडेल अशा किमतीत निवडणंयाचं कसब प्रत्येकाला अवगत नसतं तसं आपल्या कोष्टकात बसणार जोडीदार कुठं मिळतो हे सुदधा हुडकण्याच एक तंत्र असतं
फर्ग्युसन पेक्षा SP बरे .. मिठीभाई व जेवीयर्स पेक्षा रूपारेल किंवा साठे म्हणजे हुशार असेल  असल्या गोष्टी आपल्या आपल्या गावप्रमाणे आपण केल्या असतीलच...

: कम्फर्ट आणि फिट-    प्रत्येक माणूस वरच्या निकषा मध्ये इतका गुरफटून जातो की घेतल्यावर कळते अरे याचं फिट गडबड आहे फिट वाटतंय पण मी कम्फर्टेबल नाही
आणि सगळ्या मध्ये इथं नडतं
बरेच लोक वाचताना हे म्हणत असतील सुदधा…” मी फिट ला जास्त महत्व देते कम्फर्ट महत्वाचा आहे हे मला माहीत आहेच”
पण विचार केला तर लक्षात येईल ब्रँड कलर ट्रेंड या सर्व गोष्टी मध्ये दिवसेंदिवस लोक फिट आणि कम्फर्ट विसरत चालले आहेत  .. यालाच अंतरंग असं काहीतरी म्हणतात . म्हणुन आपल्याला पूर्वी एखादा खुजा आणि एक उंच काळी व गोरी आनंदाने सहजीवनाची 50 वर्ष पूर्ण केलेली दिसतील व ट्रेंडी आणि ब्रँड वाली लोकं something is missing   म्हणून नाक मुरडताना दिसतात.
: त्यामुळं प्रत्येक जोडीदाराने निवड करताना बाकी सगळं सोडून आपण कसे आहोत आपलं कुटूंब कसं आहे हे विचारात घेऊन बेस्ट फिट निवडलं की ते कायम हवं हवं वाटतं आणि
जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसण्यापेक्षा असणं जास्त समाधानाचं असतं चिरकाल टिकणारं राहतं
Valentine Day  च्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
14 02 2020

या विषयाला हलकं फुलक मानानु कपडे व जोडीदार यांची निवड याची तुलना केल्यामुळे राग मानू नये Tangent मध्ये तर नक्कीच जाऊ नये

Thursday, January 30, 2020

रॅट रेस

विंचू आणि इंगळी
चावली की कळते
नादी नका लागू
हे चावल्यावरच वळते
तरीही विषाची परीक्षा
मन करत राहते नेहमी
अमृत मिळेल म्हणून
गाडी त्याच वाटेवर पळते
कुणी म्हणते स्पर्धा
कुणी म्हणते रॅट रेस
नावं असतात निराळी
एकाला विंचू  दुसऱ्याला इंगळीच मिळते

जयदीप भोगले
30 जानेवारी

Wednesday, January 22, 2020

पत्रकाराचे मनोगत



जपून लिहू जपून लिहू
 तावून आणि सुलाखून मोजके पण कसून लिहू
 ताबा नाही सोडायचा आणि शब्द नाही खोडायचा
शब्द जरी सापडला अर्थ तपासून लिहू
जपून लिहू जपून लिहू

: अंधाराची भीती तुम्हा पण उजेडाचाही नको ताप
तुमच्या स्वैर  वागण्याला नसे कधी मोजमाप
वाचा नाही फोडत आता  मूकपणाने लिहू
जपून लिहू जपून लिहू

जपून तुम्ही म्हणायचे आणि झोकून आम्ही द्यायचे
शब्दछल हवा कुणा सत्य जगा द्यायचे
शब्द जरी जपले.. रान पेटवून  लिहू
जपून लिहू जपून लिहू

जयदीप भोगले
22 जानेवारी 2020

Tuesday, October 29, 2019

दर्यादिली



रफ्तार की दहलीज पे हवा ने  कहा
ठहर जाने पे भी मिलता है ये जहाँ
खामोश लब्जो से भी कही जाती है कहानी
जलजले मे   सोच डुबाने की  महारथ  कहां

आंधियो का वजुद बस कुछ पलो का  होता है
दर्यादिली  के ठहराव की उनको सोहबत कहा
तबाही और खोफ  मिटा सकते है लेकिन
साहिल  का साथ निभाने की उसमे कुरबत कहां

जयदीप भोगले
29 ऑक्टोबर 2019

Monday, October 21, 2019

हक्क



बजावला आज हक्क
पुन्हा एकदा ठेवला विश्वास लोकशाहीवर
एकदम कुंभ मध्ये शाही स्नान केल्यासारखं
मॉब सायकॉलॉजी म्हणा की अंधश्रद्ध आशा ग्वाहीवर
दाखविली बोटं सेल्फीमध्ये ...हो मी पण धृतराष्ट्र!!! म्हणून
आणि म्हणालो दूध तरी आम्हाला द्या ताव मारा तुम्ही सायी वर

मग आठवलं  आपल्याला  असलीच सवय झालीय
सहनशक्ती सुदधा आता एकदम कोडगी झालीय
सामान्य जनता म्हणून आपल्याला पाणी सुदधा विकत घायचं असतं
पक्ष कुठलाही आला तरी आपण असच झापड लावून जगायचं असतं

जयदीप भोगले
21 ऑक्टोबर 2019

Tuesday, September 24, 2019

व्हाट्सआप

ग्रुप कसा कॉलेज कट्ट्यासारखा असावा
सगळे जरी  नसले एकत्र तरी  भरल्यासारखा दिसावा
कट्टयावर कसा म्होरक्या कोणीच नसतो
कधी असतो हीरो कधी तोच बकरा बनतो
टेन्शनच्या आयुष्यात एखाद्या स्माईलसारखा दिसावा
ग्रुप कसा नेहमी कॉलेज कट्यासारखा दिसावा
जेव्हा नेहमी नेहमी  काहीच मित्र कट्ट्यावर सारखे दिसू लागतात
संशयाचे ढग नेहमी  वरती दिसू लागतात
त्याला दूर करायला सगळ्यांचा सहभाग असावा
ग्रुप कसा कॉलेज कट्ट्यासारखा असावा

हॅपी ग्रुप बर्थडे

Thursday, August 15, 2019

सिनेमा आणि देशभक्ती



देशभक्ती ही भावना लोकांच्या मनात ठेवायची ,वाढवायची ,आठवण करुन द्यायचं काम  भारतीय सिनेमा ने केले आहे . हा विषय नुसता काढला तरी किमान दहा सिनेमे आपल्या प्रत्येकाला आठवल्या शिवाय राहणार नाहीत
सिनेमा हा या भावनेचा वापर प्रसिद्दी व व्यावसाईक यश यासाठी करत जरी असेल तरी त्यांच्या या कामातून नकळत का होईना देशभक्ती हा विचार रंजक पद्धतिने का होईना लोकांपर्यंत पोहचतो या बद्दल सिनेमासृष्टी व सिनेमा वाहिन्या यांचे अभिनंदन करावं असं मला वाटतं
समाजाचा सांस्कृतिक सहभागाचा स्वातंत्र्यपूर्व काळा पासून देशभक्ती वाढवण्यासाठी नक्कीचं खूप उपयोग झाला आहे.
पोवाडे समर गीते मेळे संगीत नाटकं ते आता असणाऱ्या भव्य 3D सिनेमा यापर्यंत त्यांचे योगदान प्रत्येकाला विसरून चालणार नाही.

चीन च्या युद्धावर प्रकाश टाकणारा हकिकत
जय जवान जय किसान वर प्रकाश टाकणारा 'उपकार' असो विविध लक्षवेधी सिनेमातून हिंदी सिनेमा 1942 A love स्टोरी... ते 'उरी'  व 'केसरी' यापर्यंत फुलत आला आहे.
देशभक्ती व सामाजिक जाणिव याची बाजू सर्वात सुंदर पद्धतीने मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटातून मांडली असं मला नेहमी वाटतं । आता यात काही टीकाकार त्यांच्या चित्रपटात असलेले व्यावसायिक कंगोरे यावर टीका करू शकतील पण 50 वर्षांनंतर सुद्धा जर देशभक्तीपर सिनेमा असं आठवायचं असेल तर त्यांच्या सिनेमाचा वरचा क्रमांक कुणी नाकारू शकणार नाही

मराठी सिनेमा पण देशभक्ती पेक्षा सामाजिक प्रबोधन करण्याऱ्या चित्रपटात जास्त लक्षात राहिला असं मला नेहमी जाणवतं ।  लोकमान्य , फर्जंद , सावरकर असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर मराठी सिनेमा मधलं खड्ग छत्रपतीकालीन काळात जास्त यशस्वी व रममाण झालं असं मला नमूद करावं वाटतं। आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके, चाफेकर बंधू ,आणि कितीतरी मोठे क्रांतीप्रणते  महाराष्ट्रात होऊन गेले तरी व्यावसायिक यश मराठी देशभक्तीपर सिनेमाला मिळालं नाही .
याला कुठली कारणं आहेत व होती हा शोधनिबंधाचा विषय असू शकतो पण हा विचार तुम्ही एक मराठी म्हणून केला तर तुम्हाला ते जाणवून जाईल.
या  दिनानिमित्त केलेल्या उहपोहातून चित्रपट हे माध्यम नेहमी आपल्याला क्षणिक का होईना देशभक्ती च्या जवळ घेऊन जाते याबद्दल मला सर्व चित्रपट सृष्टी चे अभिनंदन करावे वाटते.
आपल्याला देशभक्ती म्हटलं की कुठले चित्रपट आठवतात याचा विचार एक भारतीय एक सिनेमा चाहते म्हणून नक्की करा
व  बाटला हाऊस च तिकीट बुक करा नाही मिळाले...

 नाहीतर झी सिनेमा वर केसरी आहेच तो पाहून सिनेमाच्या माध्यमातून थोडे देशभक्त होऊ या


73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
15 ऑगस्ट 2019

Wednesday, May 15, 2019

#रंपाट#

....

शिट्टी वाजवा ..पॉपकॉर्न मागवा
टॉकीजवर जाऊन तिकीट दाखवा
रंपाट सिनेमा येतोय गावात
थंडीच आणतोय उन्हा तान्हात
3 तास जगाला विसरून जावा
डोकं लावा की बाहेर ठेवून जावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
हसू नका नुसते गालातल्या गालात
मतदान आता झालं ना भावा
आय पी एल सुदधा मुंबईच्या नावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
टाईमपास पेक्षा डबल जोमात
सिनेमा तुम्ही टॉकीज ला पहावा
आवडला तर दहादा जावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
सुपर हिटच असतंय झी च्या नावात

जयदीप भोगले
15  मे 2019

Monday, May 13, 2019

चहाचा चाहता

जगात भारी  जगात भारी
हिच्या चहाची लज्जत न्यारी
चहा तोच आणि दूध तेच
पण हीच्या चहाची नवीन स्टोरी
अमृततुल्य आणि येवले काका
मी म्हणत नाही हिच्याकडून शिका
शिकून सगळं येत नाही दादा
Exclusivity ची असते मजाच न्यारी
कोणी म्हणेल याला स्तुती
कोणी म्हणेल माज
कोणी म्हणेल बायकोच्या गुलामीचा  हा नवीनच अंदाज..
कोब्रा नवरे करत नसतात कौतुक असे घरी
तेव्हाच समजा चहाची गोष्ट आहे एकदम खरीखुरी
खारी असो की बशीत मारी
हिच्या चहाची नवीन स्टोरी


अरे हुजूर वाह ! बोलीये

जयदीप भोगले
13 मे 2019

Tuesday, April 30, 2019

नजरिया



काश ये आसमां हमारा होता
तो जमीं का नजारा कूछ और होता

हमारे  मकाम के रास्ते हम उपर से ही खोज लेते
इस गली कुचे मे शायद गुमशुदा नही होता

जमीं की खूबसुरती उपर से ही देख लेते
यूँ बुतों के बाजार मे बेजार नही होता

इस सोच को पल भर एक बादल ने तोडा
जोरो से बरस के जमीं पे ला छोडा

जब टूटा तो जमीन के इंसां से जुडा
 नही तो आस्मान का खुदा बन गया होता

जयदीप भोगले
30 एप्रिल 2018
नेरुळ 2200

Tuesday, April 23, 2019

एक असतं पुस्तक...

अभ्यासू होतं वाचनालयात
कोऱ करकरीत हॉलमध्ये
होतं  धडधडतं हृदय  कॉफी टेबलवर
कधी रेंगाळत बुक स्टॉल मध्ये






   विद्रोह करतं कवितां करून
    वनिता बनतं नियतकालिकांमध्ये
न परवडणारा शब्दकोश होतं
स्वप्न रंगवतं प्रवासवर्णनामध्ये

सेकंड हँड असो वा फर्स्ट एडिशन
पालिकेच्या दिव्यात असो की थंडगार एअरकंडिशन
फर्स्ट असो की थर्ड डिव्हिजन
याचं नेहमी समतोल व्हिजन

उघडा किंवा बंद ठेवा
याचं मंदीर सर्वांना खुलं असतं
याची किंमत लोक पाहतात
आणि हे लोकांचे मोल ठरवतं

जयदीप भोगले
23 एप्रिल 2019


Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

Monday, January 21, 2019

बिझी

सध्या मी खूप बिझी आहे..

एकदम झापड लावलेल्या घोड्यासारखं
आणि ओझे वाहणाऱ्या गाढवागत सुद्धा
घोडा आहे म्हणून  आनंद नाही
आणि गाढव म्हणून घ्यायचं दुःख नाही

...कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम नाकासमोर चालणाऱ्या पांढरपेश्या सारखं
आणि एकदम नव्या कोऱ्या स्मार्टफोन सारखं सुद्धा
स्मार्ट असल्याचा कसला उपयोग नाही
आणि ठोंब्या असल्याची शिक्षा  सुदधा नाही

....कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम देवाच्या पेड रांगेत असलेल्या भक्तांसारखं
आणि टॅक्स बुडवणाऱ्या श्रीमंत चोरासारखं सुदधा
दर्शन मिळवायचे समाधान नाही
आणी चोर म्हणून  प्रायश्चित्त सुद्धा नाही
..
.कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम जन्मणाऱ्या बाळासारखं
आणि अखेरच्या श्वासाचा धनी
वृद्धागत सुद्धा
एकटं जगायचं  आत्ताच कळत नाही
आणि मिळवलेलं घेऊन मरायला कधीच मिळत नाही..

जयदीप भोगले
21 जानेवारी 2019

Monday, January 14, 2019

पतंग


पतंग होऊनि उडे अस्मानी
दुनिया बघते होऊन दिवाणी
सैर सपाटा पतंग करतो
परी, मांजा पकडे एक शहाणी
म्हणे कशी ती तू स्वछन्दी
पवन अश्व तो अन तू आनंदी

म्हणतो पतंग हळूच पामर
तुझाच मांजा ...मी  गं ..चाकर
उंच उडतो.. अन मिळते संधी
पण अस्मानी मी तुझाच बंदी
पतंग आहेत बहुत अस्मानी
पण दोर सांभाळी त्यांचीच राणी
जगास  भव्य  ते नाट्य दिसे
पण घरीच बनते त्याची कहाणी
सर्व पत्नी लोकांना सर्व पतंग सम पती  जमातीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
जयदीप भोगले
14 जानेवारी 2019

Thursday, January 3, 2019

लग्न (लग्नसराई साठी खास)

मी म्हणाले एकदा
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ ???
सगळे म्हणाले ..आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी म्हणाले..
आता त्याला हो म्हणून बसलीय
येवल्याची पैठणी आणि पेठयांची ठुशी घालून बसलेय
काही नवीन तुझ्याकडे असेल तर मला छान सांग पाहू..
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ???

भाऊ म्हणाला

लग्नानंतर आपला प्रियकर एकदम नवरा च बनून जातो
ताई सारख्या लोकांना चक्क "साली" म्हणू लागतो
डेमो एकदम असतो छान..  2 लेवल पेक्षा जास्त खेळून नको पाहू..
सगळे म्हणाले.. आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी आता म्हणाले आता काय करावे ??
बोहल्यावर  चढल्यावर मागे का फिरावे ?
पीएचडी पर्यंत शिकतेय आता ही सुदधा परीक्षा देऊनच पाहू.

सगळे म्हणाले आम्ही फसलोय तू तिथे नको जाऊ.

इतक्यात एक मला आजोबा आजी दिसले
आजीना माळून गजरा शेजारी जाऊन बसले

आजोबा म्हणाले

50 वर्ष झाली एकत्र ..पण अजून पुढं जायचं आहे
पॅरिस च आयफेल टॉवर दोघांना एकत्र बघायचं आहे
भांडण वाद आणि वैताग मी जरा बाजूलाच ठेवतो
कारण हिच्यासारखा चहा जगात कदाचित कुणाला येतो?

विश्वास आणि प्रेम असलं की जोडपं होतं मनमिळावू...

जयदीप भोगले
24 dec 2018

Sunday, November 18, 2018

प्रोजेक्ट जैतापूर

 ...

"खेड्याकडे चला" असं वाक्य कृत्तिका च्या कानावर पडलं.. कॉलेज ची वक्तृत्व स्पर्धा आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यासमोर चौकडा हाफ शर्ट घालून आवेशाने बोलणार अनिकेत होता . बोलके डोळे , खांद्यावर रुळणारे मोकळे केस , भुवयांच्या मधोमध शांती लावते तशी बाण असलेली टिकली आणि खळखळून हसणारे क्लोजप स्माईल असणारी कृत्तिका, हिची स्वप्न तिच्या डोळ्यात असणाऱ्या अनिकेतपेक्षा नक्कीच निराळी होती.
दोघे जेव्हा एकत्र झी मराठी पहायचे त्यावेळी "चमकत रहा" ची जाहिरात पाहून रंगत जाणारी स्वप्न तिची व अनिकेतच्या हातात प्रकाशवाटा व डोळ्यात वाढत जाणारा निर्धार दिसायचा.
ती नेहमी म्हणायची 12 वी नंतर मला मुंबईत जायच आहे,  MBA  करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, सगळं मोठं हवं .आपण खेड्यात आहोत म्हणून काय झालं? शहरात हुशार आणि मेहनती लोकांची कदर असते, पैसा मिळतो आणि.. हो खेड्यात असणाऱ्या नजरा सुद्धा नसतात बरका ??
आणि अनिकेत एक स्मित द्यायचा आणि म्हणायचा शहर म्हणजे त्या फुगणाऱ्या बेडकी सारखं झालय कधी फुटेल नेम नाही.. खेड्यात जर विकासाला चालना मिळाली तर एक वेगळ्या महाराष्टची निर्मिती होऊ शकेल . आपण चांगल्या समाजात जाण्यापेक्षा आपण जाताना लोकांना एक नवीन समाज देऊन जावा असं मला वाटतं. गांधीजीपासून ते प्रकाश आमटे यांनी लोकांनी मोठं म्हणावं म्हणून काम कधीच केले नाही .तेवढ्यात अनिकेतच्या आईच्या चहाने त्यांच्या भिन्न विचारांना समान पातळीवर आणले  मग दोघे हसले . कृतिका म्हणाली अहो समाजसुधारक साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण बाजूला ठेवावे लागतील 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आहे . आणि म्हणाली चल मी निघते.. बाबा आले असतील .
कृत्तिकाचे बाबा स्टेट बँकेत बदलीवर जैतापूर ला आलेले आणि अनिकेत चे बाबा 8 एकर कोरडवाहू जमिनीचे भूमिपुत्र .एकिकडे पहिल्या तारखेची वाट  बघणारे बँक अकाउंट आणि एकीकडे पावसाची वाट पाहणारे बळीराजाचे डोळे अशी अवस्था असताना या दोघांचे मैत्रीचे सूर कसे जुळले याचं सगळ्या जैतापुर ला आश्चर्य होतं. पण फ्युजनच हे एकदम मराठमोळे उदाहरण होतें.हळूहळू अभ्यासाच्या रात्री वाढू लागल्या, हसण्याचा आवाज बदलून डिस्कशनचा झाला दिवस सरले  परीक्षा संपली दोघे 12 चा शेवटचा पेपर देऊन बाहेर आले .अनिकेत म्हणाला चला चहा घेऊ या, ती म्हणाली नको.. मी घरी जाते .  त्यावर तो म्हणाला चल मी सुद्धा येतो बरेच दिवस झाले सिनेमा सुद्धा पाहिला नाही . टीव्ही लावला तर, झी मराठीवर प्रकाश बाबा आमटे आणि झी टॉकीजवर टाईमपास .इथं सुद्धा कृत्तिकाची परीक्षा टीव्ही वहिनी सुद्धा घेतेय असं चित्र होतं.तेवढ्यात कृत्तिकाचे बाबा बँकेतून आले आणि म्हणाले काय अनिकेत कशी गेली परीक्षा? तुमच्या परीक्षेच्या निकलाआधी आमची परीक्षा आम्ही पास झालो असं दिसतंय.  म्हणजे काका? मी समजलो नाही. अरे बँकेने माझी बदली मुंबईला केली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचंय . मग अनिकेतला कृत्तिका गप्प का याचं कारण लक्षात लागलं.मग 12 वी नंतर काय? ये मुंबई ला.. तिथे चांगली वसतीगृह सुद्धा असतात.you have  good future. नाही काका जैतापूर  च्या शेतकी कॉलेजचा राज्यात वरचा क्रमांक लागतो मी इथेच शिकायचं ठरवलं आहे अनिकेत उत्तरला. माझ्या भविष्यापेक्षा माझ्या गावचं, राज्याचं भविष्य मला जास्त महत्वाचं आहे.बाहेर जाताना तो कृत्तिका ला म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,आभाळाचा रंगावरून पावसाचा अंदाज बांधणारा तू जा. तुला तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण मुंबईतच होतील. टाईमपास पाहत होतीस ना टक लावून ?.अंग मला कळतं तुझ्या मनातलं.. पण टाईमपास एक कथा आहे आणि प्रकाश बाबा आमटे ही सत्यकथा.अव्यक्त असून दोघांना उमजणाऱ्या प्रेमाला स्वप्न आणि ध्येय याच्या क्रॉसिंगवर  थांबावे लागले.नेमका त्याच दिवशी आलेल्या वळवाच्या पावसाने दोघांच्या अश्रूंना लपवून टाकले. दिवस पालटले अनिकेत व कृत्तिका दोघे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले . त्याने शेतकी कॉलेज व तिने बेडेकर कॉलेज ला प्रवेश घेतला .मधल्या काळातल्या कोरड्या दुष्काळात हळूहळू दोघांचे जग वेगळे बनले. वक्तृत्व स्पर्धेची जागा आंदोलनाच्या भाषणाने घेतली . जलयुक्त शिवार, शेततळी, कोरडवाहू शेती प्रयोग असे वेगळे विचार जैतापूर ला वाहू लागले. अनिकेत चा 5 वर्षात अनिकेत दादा रूपांतर झाले.  मुंबईत  सुद्धा कृत्तिका एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रूजु झाली.एकाची जमिनीवर राहण्याची व एकीची गगनभरारी घेण्याची धडपड सुरू झाली.कृत्तिका खरंच चमकत रहा च्या जाहिरातीप्रमाणे तिच्या कंपनीमध्ये चमकत होती.रात्री उशिरा काम करून परत येताना आलिशान कार मध्ये कृत्तिका ला अधूनमधून जैतापूर च्या आठवणी यायच्या . "खेड्याकडे चला" हा आवाज घुमायचा पण नंतर पुन्हा “डेडलाईन” हा राक्षस  सगळ्या आठवणींना  मागे टाकायला भाग पाडायचा.
हळूहळू राजकारण हे ऑफिस आणि जैतापूर या दोन्हीकडे शिरकाव करत होते .एकीकडे समाजकारण आणि एकीकडे अर्थकारण या जगात योग्य राजकारण किती महत्वाचे आहे हे एका ध्येयवेड्या व एका स्वप्नवेडीला समजावत होते. खेड्याला योग्य न्याय हवा असेल तर योग्य  व्यासपीठ शहरात आहे, मंत्रालयात आहे हे विचार प्रोजेक्ट जैतापूर- चळवळ चालवणाऱ्या अनिकेतच्या मनात घर करत होते. राजकीय वर्तुळात सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख वाढत होती .कृत्तिका तिच्या कंपनी मध्ये शेतमालाच्या भावांमध्ये होणाऱ्या अवमूल्यनामुळे उद्विग्न होत होती . सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला खरा भाव न देता organic म्हणून माल दुप्पट नफ्याने विकणाऱ्या लोकांची तिला चीड येत होती .
या दरम्यान अनिकेतचे आमदार म्हणून निवडून येणे , वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याच्या प्रोजेक्ट चे होणारे कौतुक कृत्तिका च्या नजरेसही पडले होते. या गोष्टीचे कौतुक व आश्चर्य दोन्ही तिला होतेच पण काळाबरोबर त्यांचे मार्ग बदलले होते कदाचित फोन नंबर सुदधा...
 १२ वी मधला अनिकेत तिला नेहमी आठवायचा शेतकऱ्याबद्दल तळमळ आठवायची व सगळ्याचा उद्रेक होऊन तिने एक दिवस धाडस करून कोर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला व तिने शेतकऱ्यांच्या मालाला नीट भाव मिळावा यासाठी NGO स्थापन केली व तिचा सुद्धा पहिला प्रोजेक्ट होता.. प्रोजेक्ट जैतापूर .
त्याच दिवशी मुख्यमंत्रि महोदयांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आणि  अनिकेत ने कृषिमंत्री पदाची शपथ घेतली .वर्तमानपत्रात मथळा होता प्रोजेक्ट “जैतापूर चळवळीचे प्रणेते अनिकेत पाटील यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती”
.दोघांची स्वप्न व ध्येय प्रोजेक्ट जैतापूर या समान नावाने का होईना पुन्हा नव्याने कदाचित एका वाटेवर  आली होती.

जय
१८ ऑगस्ट २०१८

Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

Sunday, October 28, 2018

सोनेरी क्षण





पहिल्या प्रेमाच्या सोनसाखळीतून
 सुवर्णमहोत्सवी संसाराच्या नथीतून
 भरघोस बोनसच्या हिऱ्याच्या कुडीतून
सोनेरी क्षण असेच बनतात अतूट प्रेमातून

आईच्या साठवलेल्या स्त्रीधनातून
कधी सासूबाईंच्या लक्ष्मीहारातून
ओवाळणी दिलेल्या गुंजभर सोन्यातून
सोनेरी क्षण असेच दृढ होतात अतूट प्रेमातून

शीलंगणाच्या अक्षय वळ्यातून
 गुरुपुष्याच्या वाढणाऱ्या मण्यातून
दिवाळीच्या लाजणाऱ्या ठुशीतुन
सोनेरी क्षण असेच वाढतात अतूट प्रेमातून

कधी हिऱ्यातून कधी सोन्यातून
कधी शुभ्र अशा चांदीतून
सोनेरी क्षण सदैव टिकतात WHP च्या सोबतीतून


जयदीप भोगले
4 ऑक्टोबर 2018

Saturday, October 27, 2018

पंचिविशी ते गद्धेपंचिविशी भोवऱ्यात .....तुला पाहते रेl


सहासष्ट भाग झाले आज आणि मला वाटलं आता काहीतरी लिहायला हवंच ..
66 म्हणजे साधारण 3 महिने म्हणजे एक  क्वार्टर ( हे सगळं क्वार्टर च्या वेळी सुदधा चर्चित होतेय)
झी मराठी वर  तुला पाहते रे ही मालिका म्हणजे एक झंझावात झाली आहे.

गद्धेपंचिविशी ची प्रेमकथा पंचिविशी ते चाळीशीच्या चष्म्यातून कौतुकाने पाहिली जात आहे.
सगळ्या मालिका स्त्रीप्रधान असतात असं म्हटल जातं पण 377 कलम हटवल्याच्या  आनंदात म्हणून की काय ( जस्ट जोकिंग)  ही मालिका स्त्री आणि पुरुष पाहतायात  सुबोध भावेसाठी .

नवतारका गायत्री दातार( "सर" चा  गायत्री मंत्र म्हणणारी) व यांच्या मालिकेमधल्या प्रेमाबद्दल अनभिज्ञ असणारी अभिज्ञा... 'मायराजी" यांची कामं नक्कीच छान आहेत यात वाद नाही  पण मी जितक्या लोकांना विचारलं सगळे म्हणतात आम्ही ना
..सुबोध भावे ला बघण्यासाठी ही मालिका आवर्जून पाहतो.

प्रत्येक वयाची व स्त्री पुरुषांचं कारण वेगळं नक्कीच असेल पण जिव्हाळा मात्र सुबोध भावे साहेबांवर
माझी आई मध्येच सुरांचा ध्यास घायला लागली होती आता यालाच पाहते रे..

बायको टी वी वर न जाणारी झी 5 वर जाऊन न चुकता एपिसोड पाहतेय। रे आणि म्हणते मला... तू अचानक स्टबल लुक का ठेवतोयस?? ...😢😢

सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करून हैराण असलेला माझा मित्र तुला पाहतो रे ..।( हे नेटफ्लिक्स वगैरे सब झूट है)
परवा बसल्यावर म्हणाला माझ्या बायकोने मला सांगितलं "तुम्ही जे न चुकता तुला पाहते रे पाहताय हे मला काही समजलं नाही ...40 नंतर तुम्हाला असलं काही जमेल किंवा अशी कोणीतरी मिळेल या भ्रमात राहू नका "
तो म्हणाला अंग पण मी त्याला पाहतो रे... बायकोनं कपाळाला हात मारला
मला कुणीतरी सांगीतलं होतं की माणसे कथेवर प्रेम करत नाहीत तर करतात त्यातील कॅरेक्टर वर  ..
ते ज्यात असत ते पाहिलं जातंच !!!!
तुम्ही म्हणाल ....काहीही हा श्री ..☺️

तर प्रत्येक पुरुषात दडलेला विक्रांत सरंजामे यातल्या कथेमध्ये आपली कथा मिसळत असतो .त्याच्यासारखी तिखट जाळं पावभाजी खात असतो तिखट चालत नसताना सुद्धा...
हे सगळं झी मराठी ला कसं काय जमतं देव जाणे ???
पण गोंडस श्री नंतर 40 चा विक्रांत सरंजामे सुद्धा लोकांचा ताईत बनतो हे म्हणजे मुरलेल  लोणचे असते तसं  नाही का ??
 "ओल्ड वाईन "हे म्हणावं का नाही याबद्दल मी बराच विचार केला पण पुन्हा 377 कलमा बद्दल विचार केला... (जस्ट जोकिंग)
उद्या काय होणार हे बघायला लोक मालिका पाहतात असं म्हणतात पण इथं तर उद्या वाट्टेल ते होऊ दे पण एकदा पाहायला पाहिजेच अस काहीतरी मिश्रण तयार होतय अस मला वाटतंय...
याची कथा ,यातील बाकी कलाकारांचा अभिनय, या बद्दल मला काही सांगायला नकोच.. ते झी मराठी म्हणजे छानच असतं..😊
पण हे सगळं लिहिलंय हे उत्तर शोधावं म्हणून की लोक तुलाच  का पाहतायत रे ??

जयदीप भोगले (सरंजामे समजू नये)☺️☺️
27 10 2018

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...