गवाक्ष्याच्या पलीकडून नयनतीरानी मला घायाळ करशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
प्रेमवीरानी नेहमी निडर असावे मग लोकांच्या नजरा चुकवीत तू वार का करावे
मी निधड्या छातीने तुझ्यासमोर आहे एकाच रामबाण कधी सोडशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
शीतयुद्धात कधी प्रश्न सुटत नसतात
त्यात बरेचसे तीर आपल्यालाच बोचत असतात
मनाच्या अश्वावर आरूढ़ होऊं
कधी सामोरे मला जाशील का
अशी मनात धुमसत राहू नकोस
आग लावलीच आहेस तर एकटीच जळत राहू नकोस
एकदाच अशी पुढ्यात येउन द्वंद्व कधी करशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
युद्धात आणि प्रेमात बरेच कही साम्य असते
म्हणुनच दोघाना सर्व काही क्षम्य असते
मी समर्पनास तयार आहे ,
तुझ्या प्रेमात कधी अमर मला करशील का
ज्य़ा युद्धाचा शेवट गोडच असतो असे कही करशील का
जयदीप भोगले
१२.१०.२००२
No comments:
Post a Comment